Skip to main content

नोकरी : एक सोडणे

लेखक अद्द्या यांनी बुधवार, 08/06/2016 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
टीप : खाली जे काही लिहिलंय ते गेल्या काही दिवसातले माझे अनुभव आहेत आणि १००% सत्य आहेत. अगदी नावेही बदललेली नाहीएत माणूस जसा जसा मोठा होत जातो, फक्त वयाने नाही , मनाने मानाने आणि पैशाने , तेव्हा स्वतःची काही तत्वे काही नियम स्वतःच तयार करत असतो . समाजाचे नियम असतातच पण काय बरोबर काय चूक याचे , पण प्रत्येकाचा स्वतःचा असा वेगळा हिशोब असतोच. आता तो हिशोब दुसऱ्याला पटतो कि नाही हा नंतरचा मुद्दा. यापूर्वी हा विचार फारसा करायचो नाही , पण गेल्या काही दिवसातले आलेले अनुभव इथे सांगावे वाटले म्हणून हा फाफट पसारा . तर, " बास झालं बाहेरच्या गावात राहायचं नाटक.

ताल व सुसंगती

लेखक वैशाली अर्चिक यांनी बुधवार, 08/06/2016 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
मला वाटते लहानपणापासून तालाचे आणि आपले नकळत नाते जुळत असते. बाळाला झोपवताना एका विशिष्ठ लयीत वर खाली होणारी मांडी, अंगाई म्हणताना पाठीवर थोपटताना दिलेला ताल ह्या सर्व गोष्टी बाळाला शांत करतात ह्या त्यातील स्पर्शामुळे व लयीमुळे. बरेचदा मी असे ऐकले आहे की बायकोची झोपमोड होते जर का नवऱ्याने घोरण्याची लय बदलली तर ! काय असतो हा ताल किंवा लय? ज्याला इंग्रजीत आपण rhythm म्हणतो. एका विशिष्ठ वेळेने परत परत होणारी गोष्ट म्हणजे ताल. प्रामुख्याने ह्याचा संबंध आपण फक्त संगीताशीच लावतो. पण असे नाहीये. आपल्या आजूबाजूला हा ताल सगळीकडेच सापडतो. आपल्या छातीत होणारी धडधड ही तालबद्ध असणेच हिताचे असते.

आंबा इडली

लेखक नूतन सावंत यांनी बुधवार, 08/06/2016 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर आंबा पाककलाकृतींचा बराच पूर आलाय त्यात माझी ही एक लाट..हमखास यशस्वी कालाकृती. सगळी भाचरुंडं लहान असताना रत्नागिरीला माहेरी गेलं की,न्याहारी ,जेवणात काहीतरी नवं करावं लागायचं.त्याआधी एक ट्रिप आजोळी गुहागरला व्हायचीच.तिथे आंबे महामूर.येताना आंब्या-फणसाची भेट ठरलेलीच. अजूनही माझ्याकडे आजोळाहून आंब्याची पेटी येतेच,गेले तरी आणि नाही गेले तरी. भाचरुंडं माझ्या घरी आली कि मी माहेरी गेले कि माझा खवय्या भाचा मेन्यूकार्ड तयार करत असे,त्यात,सकाळच्या नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यांचे बेत ठरवलेले असत.

गिरिस्थानांची सम्राज्ञी ............उधगमंडलम (उटी)

लेखक शान्तिप्रिय यांनी मंगळवार, 07/06/2016 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
आमची गिरिस्थानांची राणी असलेल्या उटीला भेट देण्याची इच्छा या उन्हाळ्यात पूर्ण झाली.त्याबद्दल संक्षिप्त वृत्तांत देत आहे. काही फोटू जालावरून साभार मैसूर हून बंदीपूर मार्गे निघून आम्ही दुपारी ३ च्या आसपास उटी मध्ये पोहोचलो. बंदीपूर हे कर्नाटकातील व व्याघ्र प्रकल्पाचे ठिकाण आम्ही दुपारी त्या भागात प्रवास करत असलेने आम्हाला फक्त काही सुंदर हरिणांचे दर्शन झाले याशिवाय काही वानरे आणि मोर आणि रान डुक्करे दिसली . बंदीपूर नंतर तामिळनाडू राज्यातील मदुमलाई व्याघ्र प्रकल्पाचा चा भाग सुरु होतो. येथेही आम्हाला काही वानरे (ग्रे लंगूर) दिसली.

खड्डा कोंबडी! (बेगर्स चिकन व्हेरिएशन)

लेखक आनंदी गोपाळ यांनी मंगळवार, 07/06/2016 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
चीनच्या क्विंग डायनॅस्टीच्या काळात म्हणे कुण्या भिकार्‍याने एक कोंबडी चोरली. कोंबडीचा मालक याच्या पाठी लागला म्हणून त्याने ती नदीकाठच्या चिखलात पुरून ठेवली. संध्याकाळी कोंबडीभोवती चिखलाचा गोळा वाळलेला होता, तो याने तसाच कोंबडीसकट जाळात टाकून शेकला. अन नंतर तयार झालेल्या कोंबडीच्या दरवळाने तिकडून जाणारा सम्राट स्वतः आकर्षित झाला, अन त्याने त्या अद्भूत चवीवर खुष होऊन कोंबडी शिजवायची ही पद्धत म्हणे शाही डिश म्हणून जाहीर केली. कोंबडी स्टफ करून, लोटस लीफ मधे गुंडाळून, मग चिखलाचा थर देऊन निखार्‍यात भाजणे ही बेसिक कृती.

न्युयॉर्क शहर व परिसरात मिपाकट्टा

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 07/06/2016 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
न्युयॉर्क शहर व परिसरात कोणी मिपाकर आहेत काय ? सद्या न्युयॉर्कमध्ये काही काळ माझे वास्तव्य आहे. शहर व परिसरात मिपाकर असल्यास भेटायला आवडेल. शक्य असल्यास कट्टा करू या. *********************************************

कट्ट्याचा कार्यक्रम

तारीख : १९ जून २०१६. वेळ : सकाळी ११ वाजता. भेटायची जागा : Newport पाथ स्टेशन समोरील Newport Mall च्या Entrance जवळ.

'चार नगरांतले माझे विश्व' - जयंत विष्णु नारळीकर

लेखक उल्का यांनी सोमवार, 06/06/2016 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
(मी कधी कोणत्या पुस्तकाचे समीक्षण लिहिले नाही आहे. हा पहिलाच प्रयत्न आहे. आजच हे पुस्तक वाचून संपवले. ते मला खूप भावले आणि तुमच्यापर्यंत पोहोचवावेसे वाटले, म्हणुन लिहायचा प्रयत्न करतेय. पुस्तकाचा आवाका प्रचंड आहे. मी मला जितकं झेपेल तितकंच लिहू शकेन. बघा जमलंय का?) एखादे पुस्तक एकदा वाचले की पुरेसे ठरते तर एखादे पुस्तक पुन्हा एकदा अभ्यासपूर्वक वाचावेसे वाटते. जयंत विष्णु नारळीकर यांचे आत्मचरित्र 'चार नगरांतले माझे विश्व' हे एकदा वाचून पुरेसे ठरत नाही. ह्या पुस्तकासाठी त्यांना २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. हे ५३३ पानांचे जाडजूड पुस्तक लेखकाचे जीवन आपल्यापुढे उलगडून ठेवते. बरं!