Skip to main content

सोबती

लेखक अन्या बुद्धे यांनी शुक्रवार, 03/05/2019 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
मनापासून बोलतो मनापासून ऐका वागावे कसे माझ्याशी फिटतील सर्व शंका चाललो पुढती तरी त्यात ना अर्थ काही नका येऊ मागुती मी कुणी नेता नाही तुम्ही पुढे मी मागे चित्र असे दिसले जरी मी नव्हे अनुयायी गोष्ट ही आहे खरी रहा आसपास माझ्या मार्ग चालू सोबतीने परस्परांचे मित्र होऊ जोडुनी आपली मने -अनुप

' गोव्यातील गणेशोत्सव '

लेखक mukund sarnaik यांनी शुक्रवार, 03/05/2019 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
गोवा हे राज्य विवीध समृध्दतेने व हिरवाई ने नटलेले राज्य या राज्याची खासियत म्हणजे हिथले समुद्र किनारे.इथे विवीध जातीचे धर्माचे लोक एकत्र राहतात.त्याचबरोबर इथे सर्व सण संभारभ मोठ्या धुमधड्याक साजरे होत असतात.पण हिथे दिवाळी सारखाच मोठ्या धुमधड्याक सार्वजनिक तसेच घरोघरी वाड्यावाड्यावर साजरा केला जाणारा उत्सव म्हणजेच ' गणेशोत्सव '.

विहीर खोदण्याचा विचार

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 03/05/2019 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
विहीर खोदण्याचा विचार... डोळ्यांतील उजेड कमीकमी होऊ लागला हसण्यातील सच्चेपणा संपू लागला तेव्हा मी विहीर खोदण्याचा विचार करू लागले.... जमिनीला भेगा, उन्हाच्या झळा पाण्याची पातळी इतकी खोल इतकी खोल.... कि आतला लाव्हाच दिसू लागला! विहीर खोदल्यावर पाणीच लागेल हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले? डोळ्यांतील उजेड संपताना, संपू द्यावा उन्हात हसू हरवताना, हरवू द्यावे दुष्काळात विहीर खणू नये जमिनीला कष्ट देऊ नयेत ..... इतकेच काय पावसाचीही वाट पाहू नये आता, डोळ्यातील क्षीण उजेडाला फसवू नये संपू पाहणाऱ्या हसण्याला धरून ठेवू नये..... विहीर खोदण्याचा विचार मात्र.....?? विचार काही माझ्या आधीन नाह

माझं "पलायन" ७: पहिली आणि शेवटची हाफ मॅरेथॉन ईव्हेंट

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 02/05/2019 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
७: पहिली आणि शेवटची हाफ मॅरेथॉन ईव्हेंट डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

सरफरोश...

लेखक चिनार यांनी गुरुवार, 02/05/2019 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
सरफरोश सिनेमाला वीस वर्ष पूर्ण झाल्याचे वाचनात आले. साहजिकच वीस वर्षांपूर्वी आपण काय करत होतो हा विचार डोक्यात आला. पण त्यात काही विशेष सांगण्यासारखं नाही. आणि आणखी वीस वर्षांनी हा प्रश्न पडल्यावरही उत्तर हेच असणार ह्यात शंका नाही. असो. तर ९९ साली सरफरोश रिलीज झाला त्यावेळी मी आठव्या वर्गाची वार्षिक परीक्षा दिली होती. उन्हाळ्याच्या सुट्ट्या नुकत्याच सुरु झाल्या होत्या.टीव्हीवर सरफरोशचं ट्रेलर बघितल्याचं मला पक्कं आठवतं. ट्रेलरमध्ये आमिरचे वडील त्याच्या कपाळावर टिळा लावतात तो प्रसंग आवर्जून दाखवयाचे. आता त्यादरम्यान (आणि त्यानंतरही!) देशभक्तीपर सिनेमाचं बॅटन सनी देओलच्या हातात होतं.

पाणीपुरीची पुरी

लेखक आरती. यांनी गुरुवार, 02/05/2019 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
IMG_20190130_144015 साहित्य: पाव किलो - बारीक रवा मीठ - 1/2 टी स्पून खायचा सोडा - 1/4 टी स्पून तेल - 1 टीस्पून पुर्या तळण्यासाठी 1 टेबलस्पून तेल पाव किलो रव्यापासून 42 पुऱ्या झाल्या कृती: रवा, मीठ, सोडा आणि तेल मिक्स करून थोड थोड पाणी घालुन पीठ घट्ट मळुन घ्या. हे पीठ एका भांड्यात झाकुन अर्धा तास झाकुन ठेवा.

चेकमेट

लेखक चाफा यांनी बुधवार, 01/05/2019 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
" स्मित, आज पुन्हा दिसला मला तो" अनामिकेच्या आवाजात कंप होता, फोनवरही तिची मन:स्थिती कळत होती. " डोन्ट वरी, तू गोळी घेतली नाही का आज? " सस्मितने काळजीनं विचारलं " सारख्या कसल्या गोळ्या, तुम्हाला सगळ्यांना पटत का नाहीय, अरे खरंच आहे तो, आणि एक दिवस नक्की तो मला मारणार" " शांत होते का राणी, मी डॉक्टर गोखल्यांना फोन करतो, तू गोळी घे पाहू, तोवर त्यांना घेऊन मी येतोयच" " हो हो घेते गोळी, गोळ्या खायला घालून मारून टाक एकदाचा मला" तारस्वरात किंचाळत उत्तर आलं, पाठोपाठ काहीतरी जोरात आपटल्याचा आवाज, " हॅलो, ए अने..

‘सटाणा तालुका बागलाण’

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 01/05/2019 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे सटाणा हे विंचूर - प्रकाशा महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक 17 वर वसलेलं असून 2011 च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 37,716 इतकी आहे. महाराष्ट्र राज्यातल्या नाशिक जिल्ह्यातील (नाशिकपासून 90 किमी ईशान्य दिशेला) बागलाण तालुका म्हणजेच सटाणा तालुका. सटाणा हे तालुक्याचं गाव. सटाण्यापासून वायव्य दिशेला गुजराथ राज्यातील डांग भागाची सीमा फक्त0 40 किमी अंतरावर आहे. गावाजवळून वायव्य- आग्नेय या दिशेने आरम नावाची लहान नदी वाहते. (म्हणजे पूर्वी वहात होती. आता खूप पाऊस झाला तर पावसाळ्यात तात्पुरती वहाते.) सटाण्यापासून दहा किमी पुढे गिरणा नावाच्या नदीशी आरमचा संगम होतो.

भीती!

लेखक अन्या बुद्धे यांनी मंगळवार, 30/04/2019 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
भीती.. सर्वव्यापी, सार्वकालिक, रूप बदलत व्यापून टाकणारी भावना. भीतीची भावना ही चांगली गोष्ट नाही असं आपल्याला वाटत असतं. पण प्रत्यक्षात तसं नाही. काही प्रकारच्या भीती चांगल्या असतात. या भूतलावर आपलं अस्तित्व टिकण्यासाठी ज्या गोष्टी उपयोगी ठरल्या त्यापैकी भीती ही महत्वाची गोष्ट आहे. ती जर नसती तर fight, flight or freeze या प्रतिक्रिया देऊच शकलो नसतो आणि आपलं अस्तित्व कधीच सम्पलं असतं. आदिमानवाच्या आणि आपल्या जीवनमानात झालेल्या बदलामुळे आज भयाची कारणं बदलली आहेत. पण प्रतिक्रिया, मनोकायिक पातळीवरच्या तशाच आहेत.