Skip to main content

सभा आणि मागच्या-पुढच्या वेळा

लेखक लेखनवाला यांनी सोमवार, 06/07/2020 02:52 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ- सभेचा दिवस शनिवार होता, सकाळपासूनच प्रंचड उत्सुकता होती, साहेब काय बोलणार?, कामावरुन बरोबर सहाला सुटला तो, शहरातल्या तलावाच्या जरा अगदी पुढे बाजूच्या रस्त्यावरच सभा असणार होती, नेहमी नेमका वर्दळीचा, गाडयांनी भरलेला रस्ता आज माणसांनी भरुन जाणार होता, इतके दिवस तो साहेबांना टीव्हीवरच बघत होता, आज प्रत्यक्ष बघायचं होतं, साहेबांच्या नावातच वलय होतं, करिश्मा होता. समोरच्याला मोहित करेल, भारावून टाकेल असचं भाषण करायचे. समोरचा त्यांच्या कितीही विरोधी विचाराचा असो….

कन्याकुमारी दर्शन आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश ०५.११.२०१९

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी रविवार, 05/07/2020 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
कन्याकुमारी दर्शन आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश ०५.११.२०१९ सकाळी लक्ष्मण आणि मी लवकर उठून सायकलसह कन्याकुमारीच्या त्रिवेणी संगमावर सूर्योदय दर्शन घेतले. . सूर्याचा तांबूस गोळा स्वामी विवेकानंद स्मारकावर विलसत होता. कन्याकुमारी मंदिराच्या मागच्या बाजूला सूर्योदय दर्शनासाठी जनसागर लोटला होता. तेथून सकाळची सायकल रपेट मारावी म्हणून जवळच्या सनसेट पॉइंटवर सुद्धा गेलो.

गुरु पूर्णिमा का साजरा केला जातो? (guru purnima marathi mahiti)

लेखक ytallfun@gmail.com यांनी रविवार, 05/07/2020 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज आपण बघणार आहे की गुरु पूर्णिमा का साजरा केला जातो? (guru purnima marathi mahiti), हेचे कारण गुरुची प्रमुख भूमिका भारतात मानली जाते. पण तुम्हाला माहित आहे गुरु पौर्णिमा का साजरा केला जातो? जरी जगभरातील एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला परिष्कृत करण्यासाठी शिक्षणाला प्राधान्य दिले गेले आहे, परंतु शिक्षण असेल तर भारतात शिक्षणाला महत्त्व दिले गेले आहे. अशी एक म्हण आहे की केवळ गुरुच आपल्या शिष्याला शर्ममार्गाचे दर्शन देतात.

रात्र - चारोळी

लेखक शब्दानुज यांनी शनिवार, 04/07/2020 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
मदनाच्या भेटीला आज रती ही आली चंद्राच्या कुशीत ती चांदणी विसावली तुझ्या माझ्या प्रितीसाठी रात्र थबकली दूर का उभी तू तिथे ये इथे जवळी
काव्यरस

जब I met मी:-5

लेखक Cuty यांनी शनिवार, 04/07/2020 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
मी जन्माला आलो तेच मुळी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन! आज कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही एवढी गडगंज संपत्ती होती आप्पांकडे. आप्पा! माझे वडिल. गावचे पोलीसपाटिल. माझे आजोबाही गावचे पाटिलच होते. कित्येक पिढ्यांपासून आमच्या घराण्याचा दबदबा होता पंचक्रोशीत. संपूर्ण तालुक्यात पाटलांशिवाय पानही हलत नसे कुणाचे. प्रचंड जनसंपर्क आणि जनाधारही होता आप्पांच्या मागे. बाकी तालुकापातळीवरचे सरकारी अधिकारी आणि राजकारणी फक्त नावालाच. आप्पांचा शब्द शेवटचा असायचा गावाबाबतच्या कोणत्याही निर्णयात. जिल्हापातळीवरील कोणीही अधिकारी किंवा राजकारणी लोक गावात आलेच तर आप्पांची घरी येऊन भेट घेतल्याशिवाय जायचे नाहीत.

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस दहावा) ०३.११.२०१९ दिंडीगल ते कोविलपट्टी सायकलिंग

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी शनिवार, 04/07/2020 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस दहावा) ०३.११.२०१९ दिंडीगल ते कोविलपट्टी सायकलिंग सकाळी सहा वाजता स्ट्रेचिंग आणि प्रार्थना करून दिंडीगल वरून कोविलपट्टीकडे प्रस्थान केले. आज जवळपास दीडशे किमी स्ट्रेच होता. . सकाळीच सूर्य दर्शन झाले. प्रभात समयी "मित्राच्या" भेटीचा आनंद अपरिमित होता.

विठूचा रंग काळा, आगळा

लेखक शेखरमोघे यांनी शनिवार, 04/07/2020 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
  आषाढी किंवा कार्तिकी, एरवी ही जेव्हा येई विठूदर्शनाचा उमाळा फक्त मिटा डोळे, आठवा अंतरी, तो राजस, सुकुमार, नीटस काळा  त्याचा रंग काळा, त्याला वाटे, भक्तांना सदैव दिसावा   जो रंग, प्रतीक उपेक्षितांचा, वंचितांचा, त्याचा कधी विसर न व्हावा  कधी कुणा भक्तांस वाटावे, हा विश्वाचा धनी कां स्वतः काळा  काय आहे त्याला सांगायचे, दाखवत आपुला अवतार काळा  त्याचा रंग काळा, असा रंग जो प्रतीक सर्व उपेक्षितांचा, वंचितांचा  तुडवले, लाथाडले, विसरले, गेले जे सदैव, इतर म्हणती हा दोष संचिताचा  तो असेल क

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस अकरावा) ०४.११.२०१९ कोविलपट्टी ते कन्याकुमारी सायकलिंग

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी शुक्रवार, 03/07/2020 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस अकरावा) ०४.११.२०१९ *कोविलपट्टी ते कन्याकुमारी* कोविलपट्टीच्या जयलक्ष्मी हॉटेल कडून सकाळी सहा वाजता राईड सुरू केली, येथून कन्याकुमारी फक्त १३० किमी होते. मुंबई कन्याकुमारी राईडचा आजचा शेवटचा दिवस होता. सर्वजण रिलॅक्स होते. हॉटेलजवळ सायकल बरोबर फोटो काढले. सायकलिंनी या सफरीत अतिशय प्रेमळ आणि अप्रतिम साथ दिली होती.

चिनी चाणक्यांच्या चातुर्य निती

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 03/07/2020 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
खोटे का होईना कोणा परकीयाने कौतुक करावे त्याने हुरळून जावे मग प्रत्यक्षात परकीय केवळ स्वार्थाने वरवर तुमच्याशी गोड स्तुती सुमने उधळून प्रत्यक्षात मार का देत नाही. भारतात चाणक्याच्या नावाची चर्चाच अधिक चाणक्य नितींचा वापर कमीच असावा. -उलट इतर देशात त्यांच्या त्यांच्या चाणक्य निती प्रभावीपणे वापरात दिसतात. अपयशाने बर्‍याचदा न्युनगंड येतात आणि न्युनगंड झाकण्यासाठी बर्‍याचदा अहंगंडाचे प्रदर्शन केले जाते त्या भरात दुसर्‍याकडचे अगदी शत्रुकडचेही चांगले आत्मसात करून घ्यावे याचा सोयीस्कर विसर पडतो.

अन् मग

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 03/07/2020 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या क्षणभंगुर कवितेवर प्रतिसाद देणार्‍या क्षमाशील वाचकांनो, या कवितेच्या शवपेटीवर मी शेवटचा खिळा ठोकेन. धन्यवादाचा. अन् मग विस्मृतीच्या विस्कळखाईत कायमची दफनल्यावर ह्या कवितेचं काळंशार मायाळू खत होवो. अन् मग उपेक्षेच्या झळा सोसून, दुर्बोधतेचे आरोप झेलून, कोमेजलेली कुण्या प्रतिभावंताची अस्सल कविता त्या खतावर पुन्हा जीव धरून तरारो. अन् मग विचक्षण वाचकांनो, त्या बावनकशी कवितेचं असणं, गारूड टाकणं, अस्वस्थ करणारे प्रश्न पाडणं, सारं सारं तुमच्यात अनिर्बंध साथीसारखं पसरत जावो.
काव्यरस