Skip to main content

'एवढ्यात संवेदनाच बोथट झाल्याचे दिसते'

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 21/07/2020 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
या धागा लेखाचे आधीची शीर्षके 'पुणेकरांनो, आतातरी भानावर या' दैनिक सकाळच्या हेडलाईन वरून घेतले. प्रतिसादातून वीषाणूशूर बेफिकीर प्रतिसाद बघीतल्या नंतर शीर्षक बदलण्याचा निर्णय घेतला.

दाक्षिणात्य पदार्थ : बिस्कीट अंबाडे

लेखक श्वेता२४ यांनी मंगळवार, 21/07/2020 13:03 या दिवशी प्रकाशित केले.

      मध्यंतरी माझ्या मंगलोरी बन च्या पाककृतीमध्ये कंजूसकाकांनी बिस्कीट अंबाडेची पाककृती विचारली होती. त्याला त्या धाग्यावर प्रतिसाद देण्यापेक्षा इथेच पाककृती लिहीतेय. जेणेकरुन सर्वांना एक नवी पाककृती कळेल. बिस्कीट अंबाडे म्हणजेे आपल्या सोप्या भाषेत उडीद डाळीची भजी. याला बिस्कीट अंबाडे नाव का ? तर या भजीचे वरचे आवरण चावतावा अगदी बिस्कीटासारखा कुरकुर आवाज येतो व अंबाडे म्हणजे गोल आकार. म्हणून याचे नाव बिस्कीट अंबाडे असे पडले. याचा उच्चार मात्र ते बिस्कूट अम्बडै असा काहीसा करतात.

येत नाही...

लेखक अजब यांनी मंगळवार, 21/07/2020 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
हारण्याची* वेळ जोवर येत नाही शक्यता नाकारता तर येत नाही... प्रश्न हा भंडावतो आहे मनाला का कधी प्रश्नास उत्तर येत नाही... हा उन्हाचा दोष की माझा म्हणू मी? सावली माझ्याबरोबर येत नाही... टेकल्यावर रोज डोके, समजलो मी पत्थराला कधिच पाझर येत नाही... चोरले अन तोडले आहे हृदय तू आळ त्याचा पण तुझ्यावर येत नाही... दूरवर आलो कुठे आहे 'अजब' मी? एवढे चालूनही घर येत नाही... (*'हारण्याची'ऐवजी 'जिंकण्याची' वाचायलाही हरकत नाही.)

रंगराज्य -३ सौ शहरी, एक संगमनेरी

लेखक vcdatrange यांनी मंगळवार, 21/07/2020 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल एका लेखावर मित्राची प्रतिक्रिया होती "संगमनेर च्या मातीचा हा गुणच म्हणावा की काय जणू एखाद्या साहित्यिकाने त्याच्या शब्द संपदेच्या रक्ताने ही भूमी जणू काही हजारो वेळा शिंपडून तृप्त केली असावी त्यामुळेच तर तिथल्या गल्लीबोळात बालपण जगलेल्या तुमच्या सारख्या मित्रांकडून अशी काही साहित्यिक मेजवानी अनुभवावयास मिळते की....लाजवाबच....खूप सुंदर..." तसं "कला" प्रकरण घरचंच, वडीलांनी हाती ब्रश धरायचं सोडुनही वीस हुन अधिक वर्ष झाली असतील पण शैक्षणिक क्षेत्रात असताना १९८७ ची स्वातंत्र्य सुवर्णमहोत्सव त्यानंतर किल्लारी भुकंपा सिरीजचे लाईफ साईज ऑईल पेंटींग्ज अजुन जसेच्या तसे डोळ्यासमोर आहेत.

बटाट्याची चाळ, बाजीराव आणि मस्तानी

लेखक कुमार जावडेकर यांनी मंगळवार, 21/07/2020 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
चाळकऱ्यांनी एकजुटीने 'बाजीराव मस्तानी' पाहायला जाण्याच्या घटनेची तुलना फक्त मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावण्याच्या बातमीशीच होऊ शकते. भन्साळी यांनी चित्रपट बनवायला एका तपाहून अधिक वेळ घेतला; पण तो एकत्रितपणे बघण्यासाठी चाळकऱ्यांना जी तपश्चर्या करायला लागली तीही काही कमी नव्हती. अनेकांचा अनेक दिवस हे खरं होईल यावरच विश्वास बसत नव्हता. झालंच तरी सर्व संकटांमधून पार होऊन ती वेळ येईपर्यंत हा चित्रपट डब्यात गेला असेल आणि त्यांना भन्साळी यांनी काढलेला दुसऱ्या बाजीरावाच्या प्रेमलीलांवरचा 'सिक्वल' बघायला लागेल अशी शंका ते व्यक्त करत होते.

<<म्हण दादा दादा खोटे>>

लेखक कानडाऊ योगेशु यांनी सोमवार, 20/07/2020 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
To whomsoever it may concern अगदी हात जोडुन माफी मागुन... प्रेरणा गोरज मुहुर्ता वेळी.. मज देत ते वादा होते? हा घोळ मनात चाले.. म्हण दादा दादा खोटे.. साहवे मला ना जेव्हा सत्ता अन पदाचा विरह.. घेऊन येतो म्हणाला.. दणदणीत पाठिंब्यासह.. घेताना शपथ मी मजला. मग चिमटा हळुच घेतो.. रोज मला उठवाया.. हा प्रसंग स्वप्नी येतो..

शब्दखेळ : विरंगुळा (भाग २)

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 20/07/2020 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ नव्या धाग्यावर स्वागत. नवा खेळ : शब्दव्यूह आणि अंताक्षरी खाली ओळीने नऊ अक्षर समूह दिले आहेत. प्रत्येक समूहातून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा आणि शोधसूत्रानुसार काढायचा आहे). आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल: • पहिल्या समूहातून योग्य शब्द निघाल्यावर त्याचे शेवटचे अक्षर पहा. • त्या अक्षराने सुरू होणारा सूत्रानुसार योग्य शब्द दुसऱ्या समुहात आहे.

(मन भूत भूत ओरडते..)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 20/07/2020 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा अर्थात प्राची तैंची मन राधा राधा होते... आज दिव्याच्या अमावस्ये निमित्त मिपावरच्या सर्व ब्रम्हराक्षसांना आणि डाकीणिंना सादर नमन करुन

(मन भूत भूत ओरडते..)

तिन्हीसांजेच्या व्याकुळ वेळी का बाहेरची बाधा होते? मळभ दाटते तेव्हा मन भूत भूत ओरडते.. सहावे इंद्रिय जेव्हा शंकांची उडवीते राळ, आवेग जरा वा-याचा भासतो जणू वेताळ.. मिटताच डोळे माझे उभा मज समोर ठाकतो, रोज मला उठवाया तो झोटिंग बनुनी येतो.. लोक म्हणती आहे वेडा दिवस असो वा रात्र, किंचाळत असतो सारखा ताणूनी सर्व ही गात्रं.. (ही भुताटकी

अवेळीचा पाहुणा .

लेखक Jayant Naik यांनी सोमवार, 20/07/2020 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
अवेळीचा पाहुणा सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करायची सवय असणाऱ्या स्वरूप ने आपल्या बेड शेजारील टेबल वरच्या नोटपॅड वर लिहिलेल्या नोंदिकडे परत एकदा अगदी शेवटची नजर टाकली. एक ,दोन ,तीन असे इंग्रजीत आकडे लिहून त्या पुढे इंग्रजीत सुवाच्य अक्षरात लिहिलेल्या यादीत काही विसरले तर नाही ना ? याची खात्री करून घेतली. बाहेरचा मुख्य दरवाजा नीट लावला होता. बाहेरच्या दरवाज्यावर उद्या दुध नको अशी चिठ्ठी लिहिली होती.घरातील सगळे नळ नीट बंद केले होते. उगाच एखादा नळ चालू राहिला तर त्याच्या आवाजाने शेजारच्या सदनिकेतील कोणी ठणाणा करत येऊ नये. आता संध्याकाळचे सात वाजले होते.

सायकलायण : १. पुणे ते कर्दे ( दापोली)

लेखक गणेशा यांनी रविवार, 19/07/2020 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : २०१४ पासुन प्रवासवर्णन आणि ट्रेकिंगचे सगळे लिखान बंद होते. खुप फिरलो नंतर मी, पण 'ही वाट भटकंतीची'.. ही माझी भटकंतीची सिरीज मी कधीच पुढे लिहिली नाही.. आता सायकलचा हा प्रवास लिहितोय ते ही १.६ वर्षांनंतर.. काही गोष्टी विसरल्या असतील काही चुकल्या असतील.. तंतोतंत वर्णन आणि काही बारीक तपशिल यात कदाचीत राहिले असतील पण हरकत नाही.. हे लिखान पुन्हा फक्त माझ्यासाठीच लिहितोय. यात नंतर येणारा निसर्ग आणी घटना जास्त शब्दांनी फुलवल्या नाहीत. कारण जास्त आठवत नाहीये, काही घटना , प्रवासातील छोट्या छोट्या घटना आता निटस्या आठवत नाहीत. त्याचा कसुर भरुन काढण्यासाठी त्याचे वर्णन फोटोतुन जाणुन घ्यावे असे वाटते. म्हणुन फोटो जास्त देतोय यावेळेस. पुढच्या वेळेस प्रवास वर्णन तेंव्हाच तेंव्हाच लिहिण्याचा प्रयत्न करेल. ------------------------ 1 सुरुवात आपल्याला माहिती होते, आपण काय व्यायामाची किंवा वजन कमी करायची नाटके करायला सायकल घेत नव्हतो... आपल्याला आवडते मुक्त जगायला.. निसर्गात हिंडायला..ढगांची चादर लपेटुन बसलेल्या हिरव्या गार डोंगरांना भेट द्यायला. आषाढातला मेघ मल्हार आपल्याला लय आवडतो... पावसाचा हा खेळ जंगलात, रानावनात अनुभवताना आपण सारे भान विसरुन जातो. नंतर येतो श्रावण.. हळुवार, नाजुक अलवार सूर घेवून आलेला श्रावण ही आपल्याला खुप आवडतो.. सारी धरती हिरवा शालु घालुन नवयौवन वधु सारखी नटलेली असते, इंद्रधनुष्याच्या रंगीत कमानी आणि फुलांचा मोहक सुगंध श्वासा श्वासात अनुभवताना मस्त वाटते. सायकल म्हणजे पुन्हा निसर्गात जायचे.. , रखरखीत रोड असुद्या किंवा झाडांच्या गर्दीतील रस्ता असुद्या त्यातुन हळुच अंतरे कापत जायचे, हळुच पाहिजेल तेथे थांबायचे.. जिथे जाईल तिथे तिथल्या लोकांच्यात मिसळायचे.. त्यांच्याशी बोलायचे . सायकल ही आवडीची गोष्ट आहे, तीला व्यायाम, वजन असल्या गोष्टीमध्ये बांधुन ठेवुन आनंद का कमी करायचा ? उलट जिथे जाईल तिथे बिंधास्त खायचे, प्यायचे.. ऐश करायची...मी फ्युजी या कंपनीची सायकल आराध्याच्या वाढ दिवशी घरात आणली होती.. तर मी सायकल घेतली, आणि मग माझे गावाकडचे मित्र चेत्या आणि योग्या यांनी ही सायकली घेतल्या.. लिहिताना ही योग्या आणि चेत्याच बोलणार त्यांना, बालपणीच्या मित्रांना उगाच गुळमट पणे हाका मारणारे आपल्याला आवडत नाही. गावाकडं जे बोलायचो तसेच अजुनही.. आणि चेत्याचा आणि माझा सायकलवर कोकणला जायचा प्लॅन ठरला.. पुणे लोणावळा हा १०० किमी सायकलिंगचा आम्हाला अनुभव होता, या पावसाळ्यात तेव्हड्याच फेर्‍या झाल्या होत्या २-४. एकदा ७० किमीच आडवाटेवरती कासारसाई ला जावून आलो होतो ती एक ट्रीप. मला सायकल वर कोकणात जायचे होते.. चेत्याला ही कल्पनाच भारी वाटली होती.. कुठलीही आव्हाने असल्यास चेत्याला ती पुर्ण केल्याशिवाय राहवत नाही.. हे ही तसेच, त्याने ट्रेक ची सायकल घेतली... आणि आमच्या कोकणच्या प्लॅन ला अमलात आणायचे आराखडे सुरु झाले.. चेत्या म्हणजे प्लॅन त्याचा, आणि आम्ही त्याचे गप ऐकुन घ्यायचे.. हे नेहमीचेच आहे. तो आम्हाला बोलण्यात काही ऐकत नाही.. भांडणात पण नाहीच :-)). सुरुवातीला आम्ही दोघेच होतो, चेत्या ने नंतर त्याचे उरुळीतलेच मित्र गणेश बकरे( गणेश बी म्हणु) आणि पोपट यांची ओळख करुन दिली आणि त्यांना ही कोकणाच्या प्लॅन मध्ये सामिल करुन घेतले.. सायकल प्रेमाचे असेच असते, आपण चटकन दुसर्‍यांना त्यात ओढुन घेतो.. गणेश बी आणि पोपट ने एमटीबी घेतल्या होत्या, आमच्या हायब्रीड होत्या. आणि सुरुवात झाली आमच्या खरेदीला.. मग आम्ही डिकॅथॉलॉन ला जायचो कायम, पोपट ची सायकल १५,००० ची मोन्ट्रा आणि घेतलेले सामान एकुन २०,००० प्लस रुपयांचे झाले होते :). म्हणजे चार आण्याची कोंबडी आणी बारा आण्याचा मसाला ही गत झाली होती.. सायकल अक्सेसरीज चा खर्च हा सुद्धा सायकल घेताना लक्शात घेणे जरुरी असते हे आम्हाला उशिरा कळाले. लाईट्स, ब्लिंकर,हेल्मेट, २-२ सायकल कॉस्च्युम, हॅडग्लोज, फोरआर्म, बॅग, पॅनियर /कॅरीअर, त्याच्या बॅग्स, एक्स्ट्रा ट्युब, पंक्चर किट, वजनाला हलका सायकल पंप अश्या अनेक गोष्टी १०-१५ हजार घालवावे लागतातच :).. तुम्ही अगदीच निरुत्साही असला असले सगळे घ्यायला तरी ५-६ कुठे गेले नाहीच ... कोकण ट्रीप - कर्दे, दापोली सुरुवात दिवाळी झाली आणि बायको माहेरी गेली, बायको माहेरी गेली की मग सायकलिंग बिनधास्त कुठे ही कितीही दिवस करता येते.. ते म्हणतात ना " प्रत्येक यशस्वी सायकलिस्ट च्या मागे त्याच्या बायकोचा घराबाहेर माहेरी गेलेला पाय असतो..". कोण म्हणाले असे ? अहो मीच :). मग आमच्या प्लॅन ला उधान आले.. चेत्या ने पोपट आणि गणेश बी ला घेवुन, उरुळी वरुन शिंदवणे घाटातुन सासवड कडे जाणार्‍या रोड वरुन फेरफटका मारला ५० एक किलोमिटरचा. पोपट ने येव्हडे सायकलिंग कधी केले नव्हते.. त्याला बघता, तो दमला ह्यात आम्हाला काहीच नवल वाटले नव्हते... ह्या सगळ्या परिस्थीतीत, दोन नवीन भिडु कसे आहेत हे मला माहीत नसताना, मी आपले पुणे ते आरावी(दिवेआगार) असा कमी अंतराचा प्लॅन आखला होता.. चेत्याला ट्रीपमध्ये राजेशाही थाट लागतात... त्याचे आणि माझे म्हणणे नेहमीच विरुद्ध असते, आणि मलाच नेहमी कमीपणा घ्यावा लागतो.. चालते यालाच मैत्री म्हणतात. मग दिवेआगार, आरावी कसे मागास, तिकडे कसा समुद्र कर्दे येव्हडा छान नाही, आणी गर्दी आणि इतर सगळी त्याची कारणे झाली.. आणि त्याच्या म्हणण्याने आम्ही कर्दे, दापोली हा प्लॅन केला.. माझा त्याच्यापुढे दुसरा असा कुठलाही मार्ग नसतो.. एकच मार्ग असतो तो म्हणजे शरणागती.. ( पण कर्दे ला गेल्यावर कळाले, हाच प्लॅन भारी होता.. पुढे येइलच).. उरुळीवरुन आधल्या रात्री सगळे माझ्या घरी गाडीत येतील आणि मग माझे घर ते कर्दे असा प्लॅन होता. चेत्याच्या इनोव्हा मध्ये २ सायकल बसतात. एक सायकल कशी आणायची ह्याचा विचार होता.. आमच्याकडे रीअर मॉऊंटन रॅक नव्हते गाडीचे. मग दोन दिवस आधी पोपट पुण्यात येणार होताच तर त्याने त्याची सायकल त्याच्या गाडीत माझ्या घरी आणुन ठेवली आधी. मी माझी सायकल धुतली, सायकल च्या च्येन ला च्येनल्युब लावले, हवा भरली, सगळ्या बॅग भरल्या. आणि पोपटची सायकल काढली चैन ल्युब लावायला. आणि कळाले त्याचे ब्रेक रीम ला घासत होते, चैन पण थोडी स्मूथ वाटत नव्हती.. मी लगेच काळेवाडीच्या बोडके सायकल्स मध्ये त्याची सायकल न्हेली आणि ती निट करुन आणली.. पोपट ला पण सांगितले ( मग तो म्हणाला त्यामुळेच मला दम लागत होता तर :), हे खोटे आहे कळेल पुढे). चेत्या ने त्यांना कोकणट्रीप कशी मस्त. फक्त हिंजवडी , पिरंगुट फाट्यापर्यंतच चढ, मग कसा सगळा उतारच आहे असे सांगितले होते हे मला नंतर कळाले.. मला सकाळी लवकर उठुन आल्हाददायक वातावरणात सायकल चालवायला सुरुवात करायची असती... चेत्याला थोडे निवांत लागते, त्याला नाष्टा करुन मग सुरुवात. तरी पहिलाच दिवस असल्याने माझ्या म्हणण्याने अगदीच ५:३० - ६ ला निघालो नाही तरी चेत्याच्या म्हणण्यापेक्षा लवकरच म्हणजे ७ ला आम्ही ट्रीप ला सुरुवात केली.. पुणे ते माणगाव(११० किमी) सुरुवातीला घरातुन निघताना फोटो काढुन झाले, मला पुर्वी फोटो काढायला आवडत नसत.. नंतर नंतर फोटो काढण्याची धुंदी माझ्यात आली. पण चेत्याला स्वताचे असंख्य फोटो काढायचे असतात. त्याच्या इतके फोटो काढुन घेणे नाही आवडत मला. त्यामुळे फोटो फोटो करुन चेत्याची आणि आमची पहिली लॉंग सायकल ट्रीप सुरु झाली..मी आणी चेत्या यांना सराव होता.. गणेश बी आणि पोपट हे सायकल साठी नविन होते आणि त्यांच्याकडे एमटीबी होत्या.. मी पुढे, मागे हे दोघे आणि सर्वात मागे चेत्या असे आम्ही लाइनीत चाललो होतो... 2 सुरुवात