Skip to main content

जिवन

लेखक विवेकवि
Published on बुधवार, 30/01/2008
प्रेम हे होत नसत प्रेम हे कराव लागत आपल अस कुणीच नसत आपलस कराव लागत...! एकदा तरी स्वाताहून वादळात झोकयच असत नाहीच हाती आल तर त्याच वादळात मानोसक्त मारायला शीकायच असत म्हनूनच.......! प्रेम हे होत नसत प्रेम गे कराव लागत आपल अस कुनीच नसत आपलस कराव लागत.......... कस वाट्ल प्रतिक्रिया पाठ्वा.

कविता.

लेखक विवेकवि
Published on बुधवार, 30/01/2008
मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे, मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे.... मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे, आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे.... मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट.... तुझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा, मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा ....................... माझी स्वताची कविता.

उत्तम मिसळ मिळण्याचे ठिकाण

Published on बुधवार, 30/01/2008
मी आत्तापर्य॑त चापलेल्या बेष्ट मिसळी॑ची लिस्ट देत आहे, कृपया ऍडिशन करावी. १) अण्णा बेडेकर, पुणे २) मनशक्ती के॑द्र, लोणावळा ३) मामलेदार, ठाणे ४) मूनमून मिसळ, डो॑बिवली

नर्मदे हर हर

Published on बुधवार, 30/01/2008
जगन्नाथ कु॑टे या॑चे हे बरेच गाजलेले पुस्तक मी दोन्-तीन वेळा वाचले. नर्मदा परिक्रमेबद्दल माझ्या मनात पुष्कळ दिवस कुतुहल होते. नर्मदा तीरावर अनेका॑ना अदभुत आणि गूढ अनुभव येतात. कु॑टे या॑चे अनुभव तर केवळ अच॑बित करणारे आहेत. शूलपाणीच्या ज॑गलात लुटण्याबद्दल त्या॑नी लिहीले आहे, पर॑तु नुकतीच माझ्या परिचयाच्या एका भूगोल तज्ञ गृहस्था॑नी त्या॑च्या काही मित्रा॑सोबत नर्मदा परीक्रमा केली, त्या॑ना शूलपाणीत लुटले नाही. अर्थात प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात. अशा प्रकारचे गूढ अनुभव वाचायला मला फार आवडतात, कुणाला अशी काही पुस्तके माहीती आहेत का?

टाळण्याची कला

Published on मंगळवार, 29/01/2008
आजच्या "सुपरफास्ट' जगात सर्वांना भेडसावणारी प्रमुख समस्या कुठली असेल...? नको असलेल्या लोकांना टाळायचं कसं, याची. व्यक्तिमत्त्व विकास, बुद्धिमत्ता वर्ग वगैरे घेतले जातात, तसा टाळण्याच्या कलेचा वर्गही घेण्याची नितांत गरज आहे...ही कला अवगत असलेल्या आणि नसलेल्यांविषयी एक "स्वैर' चिंतन... ----------- एका सहकाऱ्यानं टाळण्याच्या कलेवर लेख लिहायला सुचवलं, तेव्हा प्रथम टाळण्याचाच प्रयत्न केला; पण नंतर टाळण्याची कला अवगत आहे की नाही, असा विचार केला, तेव्हा अंतरात्म्याचं (या अंतरात्म्याचा भाव हल्ली फारच वाढलाय) नकारार्थी उत्तर आलं.

चर्चिलची "शापवाणी"

लेखक तळेकर
Published on मंगळवार, 29/01/2008
१९४५ साली दुसरे महायुद्ध संपले चर्चील युद्ध जिंकला पण निवडणुक हरला, अटलीच्या मजुर मंत्रीमंडळाने भारताला स्वातंत्र्य देऊ केले. त्यावेळी चर्चिलने विरोधी बाकावरून पुढील समज नोंदवली होती . "स्वातंत्र्य हा मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे, परंतू या क्षणी सुत्रे कॊंग्रेसच्या हवाली करणे याचा अर्थ भारतातील लक्षावधी भुकेल्या प्रजेच्या हितसंबंधाना बदमाषांच्या, दरोडेखोरांच्या आणि चांडाळ लुटारूंच्या स्वाधिन करणे आहे, यांच्या कारकिर्दीत साधी पाण्याची बाटली किंवा पावाचा तुकडाही करमुक्त असणार नाही. फक्त हवा तेव्हडी विनामुल्य उपलब्ध असेल या भुकेकंगाल आत्म्याचे तळतळाट अटलीच्या माथी बसतील.

शुद्ध मराठी, वापरण्याजोगे मराठी!

Published on मंगळवार, 29/01/2008
राम राम मंडळी, आमचे दोन मित्रवर्य अभय नातू आणि केदार सोमण यांची मराठी विकिपिडियाकरता मोलाची कामगिरी आहे. हे दोघेही मराठी विकिकरता खूप काम करत असतात. मराठी विकिशी निगडीत एक याहू समुहही आहे, जिथे मराठी विकिसंदर्भात रस असलेली माणसं एकत्र येऊन चर्चा करू शकतात, आपापले विचार एकमेकात वाटू शकतात. नुकतीच अभय नातू आणि केदर बोडस या दोघांची, शुद्ध मराठी (प्युअर मराठी), व वापरण्याजोगी मराठी (युजेबल मराठी) या संदर्भातील विकिच्या याहू समुहावरीलएक चर्चा आमच्या वाचनात आली. आम्हाला ही चर्चा खूप मोलाची वाटली व दोघांचेही विचार महत्वाचे वाटले.

याँऽयुकऽ नोऽएल: मेरी ख्रिसमस

लेखक ऋषिकेश
Published on मंगळवार, 29/01/2008

पहिले महायुद्ध आणि त्यावरचे अनेक चित्रपट यामुळे तेव्हा लढल्या गेलेल्या बर्‍याचशा लढाया सगळ्यांना माहीत आहेत. काही चित्रपट लढाई व्यतिरिक्त सैनिकांच्या समस्या, त्यांची मानसिकता, संघर्ष आदि विषयांचेही सुंदर चित्रण करतात. "नो मॅन्स लँड" पासून "सेविंग प्रायवेट रायन" असो, एक सैनिक आणि त्याच्या पुढील आव्हाने याचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चित्रण केले गेले आहे. यापैकीच आणखी एक पैलू उजेडात आणणार एक फ्रेंच चित्रपट आज पाहिला. २००६ मध्ये प्रसिद्ध झालेला "याँऽयुक नोऽएल".(Joyeux Noël) किंवा इंग्रजी मध्ये "मेरी ख्रिसमस". युद्धावरील अनेक चित्रपटांच्या पैकी एक असला तरी आपले असे वेगळेपण जपणारा.. नव्हे ..

सरदारजीचे पत्र

Published on मंगळवार, 29/01/2008
एका सरदारजीने आपल्या नातेवाईकाला पत्र लिहिले आणि चूकीने To च्या जागी त्याच्या नातेवाईकाच्या नाव आणि पत्याच्या एवजी स्वतःचा नाव आणि पत्ता लिहिला. आणि From च्या जागी स्वत:चे नाव आणि पत्याच्या एवजी त्याच्या नातेवाईकाचे नाव आणि पत्ता लिहिला. पहिल्या डाकेने पत्र गेले पाहिजे म्हणून सकाळीच पोस्टाच्या पेटीत नेवून टाकले. दूपारी तेच पत्र घेवून पोस्टमन सरदारजीच्या घरी पोहोचला. पत्र घेवून सरदारजीने आलटून पालटून बघितले आणि पोस्टमनला म्हणाला " वा वा भाई कमाल होगया... तुमचं पोस्ट डीपार्टमेंट केव्हापासून एवढं प्रॉम्प्ट झालं ..

मी एक अशिष्टाचारी !

Published on सोमवार, 28/01/2008
आज मी तुम्हाला माझीच (राम)कहाणी सांगणार आहे. तुम्हाला कदाचित बोअर होईल, कदाचित अगदीच रुटीन वाटेल. पण माझ्या आयुष्यातली ही एक गंभीर समस्या झाली आहे, एवढं मात्र नक्की. मी आजच्या काळात जगायला अगदी नालायक आहे. हो..."नालायक'च ! "अकार्यक्षम', "अयोग्य', "अपात्र' वगैरे नाही. नालायक म्हणजे नालायक ! ज्याची लायकी नाही, तो. आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आणि जीवनाचं मूल्यच बनलेला, "शिष्टाचार' कशाशी खातात, हे मला माहित नाही. तसं मासे, मटण, खेकडे, चिकन, शेपू-कार्ल्याची भाजी, पिझ्झा, बर्गर, पास्ता, पैसे, आदी अनेक गोष्टी कशाशी खातात, हे मला माहित नाही. (या यादीत सिगारेट आणि दारूही येते.