Skip to main content

चांदण्यात रात्र रात्र...

रविवार, 16/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
चॅलेंज खेळ मस्तच. योग्यवेळी चॅलेंज म्हणायचे, योग्यवेळी पास म्हणायचे आणि निरागस चेहरा ठेऊन बिनचूक खोटी पाने घुसडायची. तसे आम्ही बदाम ७, गुलामचोर, ५-३-२, रमी, ७-८, छब्बु, ३०४, लॅडिस सुद्धा खेळतो. पण खरी मजा मेंढीकोट आणि कॅनवेस्टा खेळताना येते ती. एका पावसाळ्यात गाड्या बंद पडल्याने २५-३० जण आमच्याकडे अडकली होती. २ रात्रंदिवस मेंढीकोट. सोबत डबेभरून चिवडा आणि चकल्या. आजही आम्ही कोकणात गेलो की चांदण्यात रात्र रात्र पत्ते खेळतो. १५-१६ जण, ३ कॅट घेऊन मेंढीकोट आणि जर तरुण पिढीतील खेळाडू जास्त असतील तर कॅनवेस्टा.

चकाट्या पिटायला या!

रविवार, 16/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी मिपावर आल्यावर काहीच वैचारीक/ सामाजिक/ साहित्यिक बडबड करायची (व ऐकायची!) इच्छा नसते. थोडा वेळ इथं रहावं, चकाट्या पिटाव्यात, मंडळींची थोडी निर्विष थट्टा करावी, त्यांनी केलेल्या आपल्या थट्टेचा आस्वाद घ्यावा, थोडक्यात काय तर कट्ट्यावर आपण ज्या गोष्टी करतो त्या कराव्यात असं वाटतं. तेंव्हा केवळ गफ्फा हाणण्यासाठी, टवाळक्या (निंदा नव्हे) करण्यासाठी हा धागा सुरु करत आहे. इथे या धाग्यावर चकाटया पिटणार्‍या सर्व टोळभैरवांचं आणि टोळभैरवींचं (?) स्वागत आहे. सिरियस वैचारिक वा सामजिक लेखन इथं नसावं. म्हणजे कोणी करायला आमची हरकत नाही पण टारगट प्रतिक्रिया आल्या तर रागेजू नये!!

अंतर

लेखक सचिन
रविवार, 16/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
ओळींमधलं....मधलंही वाचता आलं पाहिजे बोलणं अन अबोलणंही...ऐकता आलं पाहिजे मौनं सर्वार्थसाधनं की स्वार्थसाधनं..जोखता आलं पाहिजे खरं तर "अंतर"च वाचता आलं पाहिजे वळू पाहणार्‍या पावलाला थांबता आलं पाहिजे पण थांबू पाहणार्‍या पावलालाही चालता आलं पाहिजे मोहाच्या नशेत झुलतानाही जागता आलं पाहिजे खरं तर "अंतर"च वाचता आलं पाहिजे आसुसल्या मनालाही वाट पहाता आलं पाहिजे अजाणत्या वेडेपणातही भान राखता आलं पाहिजे व्यक्तापेक्षा अव्यक्तच समजून घेता आलं पाहिजे खरं तर "अंतर"च वाचता आलं पाहिजे

दोन बाजू... क्षणाच्या!

लेखक दिनेश५७
शनिवार, 15/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
....सिग्नलच्या हिरव्या दिव्याची वाट पाहात दाटीवाटीनं, एकमेकांशी लगट करत ताटकळलेल्या गाड्यांचे कर्कश हॊर्न वाजायला लागले आणि रस्ता ओलांडायच्या प्रयत्नातली गर्दी जागच्या जागी थबकली... हुतात्मा चौकातला तो मैदानी रस्ता आता क्षणभरात गाड्यांच्या गर्दीखाली दिसेनासा होणार होता. सिग्नलचा हिरवा बाण लकाकला आणि पलीकडच्या गाड्यांनी वेग घेतला. पण नुकत्याच चार पायांवर चालायला लागलेल्या त्या इवल्या जिवाला त्याची जाणीवही नव्हती.

मी दारु प्याली नाही.......

शनिवार, 15/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
संदीप खरे यांच्या 'मी मोर्चा नेला नाही' ह्या कवितेतुन प्रेरणा घेत आमचाही १ 'सुमार' प्रयत्न...... (संदीप खरे यांची माफी मागुन) मी दारु प्याली नाही...मी सिगारेट ओढली नाही मी सुपारीसुद्धा साधी कधी खाल्लेली नाही भवताली पार्ट्या चाले, त्या विस्फारुन बघताना कुणी ग्लासातुन पिताना, कुणी बाटलीतुन पिताना मी वेटर बनुनी शिरलो, डिस्कोच्या बाजुस जेव्हा मला ऑर्डर द्यायलादेखील, कुणी बोलावले नाही चेन स्मोकर मी झालो, चावल्या नुसत्याच काड्या पावसात बेवडा झालो, थंडीत फुकल्या विड्या पण खिशातुन कुठलीही पैशाची आवक नाही कुणी मार आवरला नाही, कधी लॉटरी लागली नाही मळलेला पारोसा सदरा, फाटलेली एकच चड्डी गळ्यात अडकवु

संडे स्पेशल (पुडाच्या वड्या / बाकर वड्या)

शनिवार, 15/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
पुडाच्या वड्या: हिवाळ्यात कोथिंबीर स्वस्त मिळत असल्याने पुडाच्या वड्या घरोघरी केल्या जातात. ही चितळेच्या बाकरवडीची रेसिपी नसून कोल्हापुरी बाकरवडी आहे. साहित्यः कोथिंबीर ६ मोठ्या गड्ड्या (साधारण १/२ किलो) २-३ कांदे बारीक चिरलेले २ लसूण गड्डी २ इंच आले २ टे.स्पून धणे-जीरे पावडर ३/४ वाटी वाळलेल्या खोबर्‍याचा कीस २ टे.स्पून खसखस, तीळ प्रत्येकी २ टे.स्पून गोडा मसाला (काळा मसाला) २ टे.स्पून तिखट (चवीनुसार) १/४ टी.स्पून हिंग, हळद प्रत्येकी १ टी.स्पून साखर मीठ चवीनुसार तेल तळण्यासाठी ४ वाट्या बेसन १ वाटी मैदा १.प्रथम कोथिंबीर निवडून अदल्यादिवशी स्वच्छ धुवून कापडावर/पंचावर वाळवावी.
Taxonomy upgrade extras

आधुनिक दान

शुक्रवार, 14/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
बरेचदा लोक मुंबईला समजण्यात चूक करतात. कोणाला ती भावनाशून्य वाटते कोणाला ती रूक्ष वाटते, कोणाला ती बाकीच्यांची पर्वा न करता सतत धावत राहणारी वाटते. पण हे मुंबईला आयुष्यातून १-२ वेळा वा कधीच भेट न देता केवळ चित्रपटातून मुंबईला पाहणार्‍यांचे मत झाले. खरी मुंबई वेगळीच आहे आणि ती वेळोवेळी स्वत:चे वेगळे दर्शन घडवते. एका लेखकाने तिचे अचूक वर्णन केले आहे. तो म्हणतो, मुंबईच्या रेल्वेत दारातले लोक तुम्हाला आत घुसू देणार नाहीत पण एकदा का तुम्ही आत शिरलात की हेच लोक तुम्ही दारातून खाली पडू नये म्हणून तुमचा तोल सावरतील. तुम्हाला दरवाज्यात उभे राह्यला बळ देतील.

लहरी राजा, प्रजा आंधळी...

लेखक विकास
शुक्रवार, 14/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
खालील बातमी वाचून वरील शिर्षक आठवले... मुख्यमंत्री सहायता निधीचे तीन तेरा..! 14 Mar 2008, 1218 hrs IST मुंबई मटा ऑनलाइन प्रतिनिधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीमधला पैसा नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या गरजू नागरिकांना दिला जात असावा असं तुम्हाला वाटत असेल तर हा भ्रम आहे असेच समजा. २००३ ते २००५ या वर्षात मुख्यमंत्री सहायता निधीतले कोट्यवधी रूपये कबड्डी मॅच, महिला फुटबॉल मॅच, गझन संमेलन तसेच मराठी नटाच्या एका फॅन क्लबच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वाटला गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.