Skip to main content

कुठे आणि कधी जाऊया एकदिवसीय सहलीला?

लेखक वेदश्री यांनी बुधवार, 30/04/2008 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
एकदिवसीय सहलीच्या कौलाला एकूण २१ जणांनी मते दिली पैकी ६७% लोकांची होकार भरणारी मते मिळाली आहेत, त्यामुळे किमान १४ लोकांचा ग्रुप बनण्यास हरकत नसायला हवी. आता प्रश्न उरतो कधी आणि कुठे जायचे त्याचा. ऐन मे चा उन्हाळा बघता कुठे काढता येऊ शकेल सहल? मे २००८ मधील विकेंडचे दिवस बघता ( ३,४,१०,११,१७,१८,२४,२५ आणि ३१ ) असे दिवस मिळू शकतात असे दिसते. यातले कोणास कोणते दिवस सहलीसाठी बाजूला काढणे जमेल ते सांगावे. एका महिन्यात एकच ( किंवा दोन ) सहल करायचे उद्दिष्ट असूनही एकाहून जास्त दिवस विचारण्यामागचा उद्देश हा की सर्वांच्या तारखा जुळवता येईलसे बघता येईल !

दिवेलागण.

लेखक अशोक गोडबोले यांनी बुधवार, 30/04/2008 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
स्मरणाच्या काठावर झाली मंद दिवेलागण हळुहळू उजळे आतले तुळशीचे अंगण अज्ञाताच्या क्षितिजावरूनी येती उडुनी विहंग आळवीत सुस्वरे सुकोमल स्वप्नरागसुमरंग रुणझुणली पैंजणे अचानक फुलताना मोगरा पडले पाऊल तालावरती लयविव्हळ सुंदरा मोहरलेल्या झाडापाशी उतरे बालपण धावा करूनी थकलेले मग विसावले मीपण! आकाराचा हट्ट धरुनी मेघ निराकार चातकचोचीमधे पडावी आता जलधार. --अशोक गोडबोले, पनवेल.
Taxonomy upgrade extras

गोंय हो महाराष्ट्राचो सांस्क्रुतिक भाग दिसता काय ना?

लेखक धनंजय यांनी बुधवार, 30/04/2008 04:58 या दिवशी प्रकाशित केले.
गोंयाचो आणिक महाराश्ट्राचो पयलेसान घनिश्ट संबंद आसा. गोंयाचेर पोर्तुगालान राज केले तरी गोंयांत कोणी "म्हाराज" म्हळे, जाल्या कोणूय शिवाजी म्हाराजूत सजमता. खंयच्याय देवळाची जत्रा आसली तर नाटक केन्नाय शिवाजी म्हाराजाचेच आसता. गोंय आणिक कोकण किते विंगड नात. गोंयान महाराश्ट्राक कितले कलाकार दिलेत, मेजपाक गेल्यार बुकां भरतली. बाकीबाब बोरकर घेयात, ना जाल्या दिनानाथ मंगेशकर घेयात. महाराश्ट्रांतल्या जायत्या लोकांचे देव गोयांत आसात. गोंय मुक्त करपाचे सत्याग्रह महाराश्ट्रासान येताले. गोंय मुक्त जाले तेन्ना वीस वरसां गोयांत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सरकार लोकान वेचून दिले.

मेळा

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 30/04/2008 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नात थोर त्यांच्या बोलाविले मलाही शिंपून अत्तरांना, ते भेटले मलाही हासून फक्त तेथे मीही बसून होतो खोटे रमून जाणे, ते जमले मलाही एकेक माणसाला मी न्याहळीत होतो कोणीच दोस्त नाही, ते गमले मलाही देती यथेच्च सारे उंचीच भेटि सार्‍या सजवून भासते का ठेवले मलाही भर्धाव जाति तेही खाण्यावरी तुटाया आधाशि भाव त्यांचे, न भावले मलाही लोटून अन्न सारे फेकून तेहि देता व्याकूळ आर्ततेने का भेदले मलाही! येथे बुभुक्षितांचा मेळा जमून आला लज्जाहि लाजली ती ,"का विकले मलाही?" चतुरंग

अंतर

लेखक जयवी यांनी बुधवार, 30/04/2008 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
कितीक हळवे…. कितीक सुंदर किती शहाणे अपुले अंतर आत्ताच ह्या गाण्याच्या ओळी ऐकल्या…..अगदी आत पर्यंत भिनत गेल्या. दोघांमधले हे अंतर कितीवेळा असे शहाणे असते….!! कधी हे अंतर अगदी आरपार छेदून जातं तर कधी युगं लोटून जातात पण पार करता येत नाही. कधी हे अंतर ..अंतर वाटतंच नाही. इतकी दोघं एकमेकांच्या जवळ येतात. एकदा ही जवळीक साधली की मात्र बाकीचे फार दूर वाटायला लागतात. कधी एकमेकांच्या जवळ पोचायला सुद्धा कोणी तरी बांधून दिलेल्या पुलाची….सेतूची गरज लागते. कित्येकदा तो बांधून दिलेला पूल मोडकळीस येतो….. त्याला गोंदण-शिंपण करुन नेटका करता करता जीव मेटाकुटीला येतो.

गावांची नावं

लेखक भोचक यांनी मंगळवार, 29/04/2008 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
काही गावांची नावं विचित्र असतात. ती कशी पडली असावीत असा प्रश्न पडतो. काही दिवसांपूर्वी एक फार चांगलं पुस्तक वाचनात आलं. गिरीश कुबेर यांचं 'हा तेल नावाचा इतिहास आहे' या नावाचं. त्यात इंधनाच्या तेलाच्या इतिहासापासून सध्या त्यावरून सुरू असलेले राजकारण याचे अतिशय माहितीपूर्ण आणि मुख्य म्हणजे रंजक भाषेत विवेचन केले होते. त्यात एक छान माहिती मिळाली. आसाममध्ये असलेल्या दिग्बोई या गावाचे नाव कसे पडले याविषयीची. या भागातून गेलेल्या हत्तीच्या पायाला तेल लागल्याचे ब्रिटिश अधिकार्‍याला कळले. त्याने त्या भागातील खोदकामाचे हक्क हाती घेतले. मग खोदायला सुरवात झाली. खोदायला अर्थातच स्थानिक माणसे ठेवली होती.

ब्रह्मोत्सव

लेखक आर्य यांनी मंगळवार, 29/04/2008 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रह्मोत्सव रात्र पुर्ण चंद्रामुळे, पाणी कमळांच्या फुलां मुळे तर मंदिरे सदैव उत्सवाने शोभून दिसतात. या संस्कृत सुभाषिताचा प्रत्यय नुकताच बेंगलोरमधे ईस्कॉन मंदिरात सुरु असलेल्या ब्रह्मोत्सवाने आला. तसेही दक्षिण भारतात या-ना त्या कारणाने सदैव सण समारंभ आणी उत्सव चालू असतात अगदी नित्य सुमंगल-नित्य महोत्सव. ऊदा : दोलोत्सव, कल्याणोत्सव, योगोत्सव, ब्रह्मोत्सव, वसंतोत्सव, तपोत्सव, आणि पवित्रोत्सव. तसे भारतीय लोक उत्सव प्रिय आहेतच, पण दक्षिण भारतात ते साजरे करण्याची वेगळी पद्धत आणि प्रकारही, विशेष म्हणजे या उत्सवांचे प्रमाणही फार मोठे असते.

पुण्यातली स्थळे ( फिरस्ती साठी)

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 29/04/2008 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात आपल्याकडे आवडते पाहुणे आल्यावर त्याना कोठेतरी फिरायला नेत असतो. पुण्यात /पुण्याजवळ तशी खूप स्थळे आहेत( स्थळ = प्रेक्षणीय भौगोलीकठिकाण). पण बर्‍याचदा अस अनुभव येतो की सारस बाग ,कात्रज उद्यान ,डेक्कन, कॅम्प , शनिवार वाडा ,लाल महाल या पेक्षा जास्त ठिकाने आपल्याला आठवत नाहीत्.आणि उगाच मॉल / मल्टीप्लेक्स धुंडाळत फिरतो. खरे तर फारशी माहीत नसलेली थोडी वेगळी ठिकाणे आपण जर इथे सर्वाना सांगितली तर एक चांगला कोष तयार होइल. फक्त ठिकाण सांगताना तिथे कसे जायचे/ काय काय पहायचे हे पण सांगुयात. मी सुरुवात करतो १) रजनीश आश्रम/ नाला पार्क : हे कोरेगाव पार्क भागातले नीतान्त सुन्दर ठिकाण्.येथे ओशो आश्रम तस

रस्ता-२

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 29/04/2008 14:19 या दिवशी प्रकाशित केले.

अभ्यंकरशेठना शेवटी कुठला रस्ता मिळाला हे बघायला गेलो आणि आम्ही भलत्याच रस्त्याला लागलो..

आज तुम्ही तोंड का हे झाकले?
काय म्हणता शेण आहे फासले!

ती कधी आली न येथे एकटी
सोबतीला तात, बंधू आणले 

मी कशाला सांग बोंबलतो असा?
या बघाया मज कशाने तिंबले

लग्न कर वेळी अवेळी सांगते
(काय मजला वेड आहे लागले?)