Skip to main content

भारताच्या वाढत्या लोकसंख्ये बद्दल काय करायला पाहीजे.......??

लेखक खादाड_बोका यांनी गुरुवार, 14/08/2008 02:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज जरी भारताची अतीशय प्रगती होत असली ,तरी दुसरीकडे ज्या हिशोबाने लोकसंख्या वाढते आहे तेच पुढे त्रासाचे कारण बनणार आहे. तेव्हा हा प्रश्न पडतो की वाढ्त्या लोकसंख्ये बद्दल काय करायला पाहीजे.?? आपली मते जाणुन घ्यायला उत्सुक आहे. ~X( ~X( ~X( ~X(

काहीही नाव द्या...

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 14/08/2008 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
खर म्हणजे हा एक प्रयोग होता. आता कोणता?? तर.. कटलेट बनवणे. म्हणजे कटलेट असं नाही म्हणता येणार पण, पॅटीस, किंवा अगदी भजी सुद्धा म्हणता येईल. एरवी, भाजी- आमटी उरली की त्याची थालीपीठे करायची हा ठरलेला नेम. पण यावेळी म्हंटलं थोडं वेगळं करावं. कारण जी भाजी उरली होती ती जर थालीपीठात घातली असती तर त्याचं नक्की काय झालं असतं हे जरा सांगणं कठीणच. ती भाजी होती, पालक्-पनीर. त्या वाह रे वाह शेफ संजय टुम्मा ष्टाईल मध्ये केलेली. ती भाजी जरी उत्तम होत असली चवीला तरी शेवटी ती कोण करतं यावरही बरचसं अवलंबून असतं. म्हणजे मी केलेली भाजी फार वाईट झाली होती असं नव्हे.. पण चांगली झाली होती. तरीही ती बाऊल भर उरलीच.

टोपल्या आणि मी

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 13/08/2008 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
Childhood Trauma and Violent adulthood हा विशय किचकट आहे. मानवी मेंदुवरचे संशोधन बाल्याव्स्थेतआहे.त्यामुळे १००% बरोबर विधान शक्य नाही. सर्व अंदाज मागील अनुभवावरुन बान्धलेल्या पुड्या. माझ्या प्रकटनाशी असहमत असाल तर त्यात गैर काहीही नाही. आपल्या चवकटीच्या बाहेर असलेल्या विशयावर असहमती मी नेहेमीच बघतो. सहमत असुन सुद्धा असहमती ला सेल्फ डिनायल म्हणतात.All humans choose self denial as escape route from reality असे म्हणतात. असे काही नसते म्हणणे सर्वात सोपा मार्ग. माझे प्रकटन प्रतिबींब आहे.झालच् तर प्रतिध्वनी. आशय नाही. थीम नाही.

(पेताडांच्या मेळ्यामध्ये !)

लेखक संदीप चित्रे यांनी बुधवार, 13/08/2008 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेताडांच्या मेळ्यामध्ये आम्ही माळकरी साधे तुम्हा रूचतील का हो माझे शेंगदाणे खाणे तुम्ही प्याल विलायती आम्ही कोकचे घुटके का हो तर्र मेळ्यात या तुम्ही बोलता बोबडे जन्म उजेडात गेला अमुचे चंद्राशी वाकडे जरा जमजून घ्यावे दात अजूनि दुधाचे जरा सरावुद्या हात, 'नीट' मिळू दे पेय मग सांगू अमुची व्यथा तुम्हालाही असंबद्ध !!! ------------------------- विडंबनासाठी प्रेरणा : अंकुश चव्हाण यांनी पोस्टलेली कविता http://www.misalpav.com/node/3028 आणि बिनडोक बनीने पोस्टलेली कविता http://www.misalpav.com/node/3029 -
Taxonomy upgrade extras

(एका मिसळीचे बिल भरलेच नाही !)

लेखक संदीप चित्रे यांनी बुधवार, 13/08/2008 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
एका मिसळीचे बिल भरलेच नाही दोघांच्याही मनात होतं, दोघांनाही ते ठाऊक होतं कुणी खाताना काही बोललेच नाही एका खाण्याचे बिल भरलेच नाही खाण्या-पिण्याच्या वेळाही एक ठरूनच गेल्या बहुतेक वाट्या तर्रीच्या मिळाल्याच नाही एका मिसळीचे बिल भरलेच नाही नजर भिरभिरते, मालकां शोधते दृष्टा-दृष्ट झाल्यास मनी धस्तावते मालकाच्या नजरेस पडलेच नाही एका मिसळीचे बिल भरलेच नाही असेना का भरले पोट तरी आजन्म ठेवतिल मिसळीस ओठी पैशांचे कोडे कधी पडलेच नाही एका मिसळीचे बिल भरलेच नाही -- ज्ञात (संदीप चित्रे) :) www.atakmatak.blogspot.com ---------- विडंबनासाठी प्रेरणा : पावस
Taxonomy upgrade extras

मांडकुली एक खेडेगांव

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 13/08/2008 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
दक्शिण कोकणांत मांडकुली म्हणून एक खेडेगांव आहे.ते बऱ्याच लोकानी पाहीले नसावं.मी पाहू शकलो कारण माझी मावशी तिथे रहाते.वेंगुर्ल्याहून ऊत्तरेकडे सावंतवाडीच्या दिशेने गेल्यास वाटेत छोटी छोटी गांवं लागतात.कुडाळला न जाता बिबवण्या गावाच्या पूर्वेला जात राहील्यास वाटेत करली नावाची नदी लागते.पावसाळ्यात ही नदी तुडूंब वाहत असेते.मात्र ऊन्हाळ्यात ह्या नदीत पाण्याचे दुर्भीक्ष असतं.प्रवासाच्या मार्गात एखाद दुसरं पाण्याचे डबकं दसतं. उन्हाळ्यात शेती करणारे काही शेतकरी ह्या असल्या डबक्यातून पाण्याचा उपसा करून शेताला पाणी द्यायचे.ईलेक्ट्रीक पंप येण्यापूर्वी कोळंब्याने पाण्याचा उपसा करायचे.एका लांबच लांब उंच झ

जे.के.रोलींग यांचे हार्वर्ड विद्यापिठातील अभिभाषण

लेखक लिखाळ यांनी बुधवार, 13/08/2008 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! अपयशाचे आनुषंगिक फायदे आणि कल्पनाशक्ती http://www.saptahiksakal.com/sapsakal/sapsakal/rightframe.html साप्ताहिक सकाळ मध्ये अनुवादित स्वरुपात आलेले, 'हॅरी पॉटर' या पुस्तकमालिकेच्या लेखिका जे. के. रोलिंग यांनी जगद्विख्यात हार्वर्ड विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात नुकतेच म्हणजे ५ जूनला केलेले, अभिभाषण माझ्या आजच वाचनात आले. ते भाषण अतिशय आशयपूर्ण आणि सुंदर आहे. मला ते परत परत वाचावे असे वाटले. आपण सर्वांनी ते वाचावे आणि आनंद घ्यावा.

तुमच्या उष्ट्यासाठी आलो...!

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 13/08/2008 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आपल्या अभिजात संगीताच्या दुनियेत गुरू-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे. किंबहुना ह्या परंपरेशिवाय हे संगीत सुरूच होत नाही, त्याची अभिव्यक्ति केवळ अशक्य आहे. स्वर, लय, ताल, राग, गायकी, ह्या सगळ्या गोष्टी गुरूकडूनच शिकायला मिळतात, शिकायच्या असतात. गुरुकडे गाण्याची तालीम घेत असताना/घेतल्यावर गुरुचं बोट धरून शिष्यही ह़ळूहळू गाऊ लागतो, गाता होतो. पण गुरुकडून काय शिकायचं असतं बरं? गुरूकडून गाण्याकडे बघण्याची जी एक नजर असावी लागते ती नजर शिकायची असते, गायकी शिकायची असते. गायकी कशात आहे, कुठे आहे, हे गुरूच शिकवतो. परंतु पुढची वाटचाल मात्र शिष्याला स्वत:च करायची असते.

बॅचलरांच्या मेळ्यामध्ये

लेखक बिनडोक बनी यांनी बुधवार, 13/08/2008 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
बॅचलरांच्या मेळ्यामध्ये आम्ही वैवाही भाबडे. तुम्हा रुचेल का हो हे माझे मोडके तंगडे. तुम्ही शाल मखमली, आम्ही फाटके घोंगडे. का हो बायको घरात आम्हा म्हणते फावडे. जन्म स्वैपाकात गेला, अमुचे भांड्यांशी वाकडे. जशी समजून चाले ती आम्हांसी बोकडे. जरा चालवूद्या हात, जुळवितो माझे शब्द. लव्हमॅरेज अमुची कथा अगदिच नाही निर्बुद्ध. - बिनडोक बनी प्रेरणास्थान : अंकुश चव्हाण यांचा ज्ञानियांचा मेळ

ज्ञानियांच्या मेळ्यामध्ये

लेखक अंकुश चव्हाण यांनी बुधवार, 13/08/2008 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञानियांच्या मेळ्यामध्ये आम्ही अज्ञानी भाबडे. तुम्हा रुचतील का हो माझे शब्द हे रांगडे. तुम्ही शाल मखमली, आम्ही फाटके घोंगडे. का हो ज्ञान मेळ्यात या आम्हा करता नागडे. जन्म अंधारात गेला, अमुचे सूर्याशी वाकडे. जरा समजून घ्यावे हेची तुम्हासी साकडे. जरा सरावुद्या हात, नीट वळू द्यावे शब्द. मग करू अमुची व्यथा तुम्हासाठी ओवीबद्ध.