मला वाटते सोशल मीडिया म्हणजे समुद्र , खुप काही चांगल्या वाईट गोष्टींचा खजिना,आणी बरेच काही.आसेच एक दिवस कोणीतरी मारवाडी मीत्राने मारवाडी समाजाचे सुंदर विवेचन शेअर केले.
मला नाही माहीत की तो मारवाडला कधी गेला होता का नाही पण मी त्या भागात खुप फिरलो आहे. जोधपुर मधे बराच काळ होतो. त्यावेळची परिस्थिती आणी आताचे जोधपूर फारच अंतर आहे. नोकरी बरोबरच संध्याकाळी काँलेजात शिक्षण घेत असल्या मुळे बरेच मारवाडी मीत्र, मैत्रीणी. लग्न समारंभ, सणवार किवा असाच पारीवारीक संबध आला व त्यातुनच काही गोष्टी लक्षात आल्या. नोकरी मुळे सिकर, बारमेर, पोखरण, रामदेवरा, लूणी, मारवाड या भागात पण भरपूर फिरणे झाले.