श्रद्धा हाच मानवी जीवनाचा महत्त्वाचा ऊर्जास्रोत असतांना रामसेतूचा विध्वंस का ?
श्रद्धा हा मानवी जीवनाच्या अनेक ऊर्जास्त्रोतांमधील एक महत्त्वाचा ऊर्जास्त्रोत आहे. याला डावलून कोणतेच सामाजिक शास्त्र पुढे जाऊ शकत नाही. या ऊर्जेने मानवी जीवन सुखी होण्यास अथवा आलेली दु:खे भोगण्यास मदत होते. विज्ञानाची इच्छा, त्याचा उपयोग मानवी जीवन अधिक सुखी करण्यासाठीच आहे. विज्ञान हे एक माध्यम आहे, ते ध्येय नव्हे. ध्येय तर समाजाचे जीवन अधिक आनंदी करणे हेच आहे व असलेही पाहिजे. यासाठी त्या समाजाला काही घटना, काही वस्तू, वास्तू व व्यक्ती उपयुक्त ठरतात. सेतूसमुद्रम प्रकल्पासाठी सत्तेतील काहिजन त्यांच्या सहकार्यांसह धिंगाणा घालत आहे व रामसेतू उद्ध्वस्त करून श्रद्धांवरच घाला घालत आहे.
मिसळपाव