बिहार-१.
सध्या बिहार या ना त्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आहे. आजवर बिहारच्या संदर्भात असलेल्या माहितीचे आदान प्रदान व्हावे या हेतुने हा लेख प्रपंच करत आहे. माहितीत त्रुटी असेल तर ती कळविणे / दुरुस्त करणे. (स्वैर विचार मंथन आहे.)
१.भारत आणि पाकिस्तान यात काय साम्य आहे असे जर विचारले तर अनेक साम्यस्थळांपैकी एक साधर्म्य म्हणजे बिहारीची या देशात समान असलेली स्थिती. स्वातंत्र्यपूर्व काळात अंदाजे १० लाख बिहारी मुसलमान पाकिस्तान मध्ये विस्थापित झाले. तेथील स्थानिक जनतेने त्यांना मुजाहिद ( परके) असा ठप्पा लावला आणि पंजाबी, सिंधी, बलुची आणि पठाणी लोकांनी त्याना कधीही आपलेसे केले नाही.
मिसळपाव