Skip to main content

...मी आहे.

लेखक अंकुश चव्हाण यांनी शनिवार, 24/01/2009 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
...मी आहे. तू घेतलेला प्रत्येक श्वास, तू सोडलेल्या प्रत्येक प्र:श्वासाला सांगेल ... मी आहे. तुझ्या जीवनात आलेले मोजके सुखाचे क्षण, तुझ्या प्रत्येक दु:खद क्षणाला सांगतील ... मी आहे. मधुबनातून मरुभुमीकडे वाहणार वारा, तुझ्या थकलेल्या मनाला सांगेल ... मी आहे. तृशार्त वाटसरुला क्रुतार्थ करणारी आणि सागराकडे धावणारी नदी तुला सांगेल ... मी आहे. काट्यांवर चालून घायाळ झालेल्या तुझ्या पायांना काटेरी सिंहासनावर पहुडलेले गुलाब तुला सांगेल ... मी आहे.
Taxonomy upgrade extras

अस्तित्व...

लेखक अंकुश चव्हाण यांनी शनिवार, 24/01/2009 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
अस्तित्व... द्वेषाच्या वडवानलात किनारा जळुन खाक होत आहे. प्रश्न सागराचा नाही किना-याच्या अस्तित्वाचा आहे. अहंकाराच्या वणव्यात वनराईचा कोळसा होत आहे. प्रश्न माळारानाचा नाही वटवृक्षाच्या अस्तित्वाचा आहे. मत्सराच्या अग्नीमध्ये हृदय पोळुन निघत आहे. प्रश्न शरीराच्या एका भागाचा नाही हृदयातील प्रेमाच्या अस्तित्वाचा आहे. अमंगल कृष्णमेघांनी आकाश व्यापून टाकले आहे. प्रश्न अंधाराचा नाही धरणीच्या अस्तित्वाचा आहे.
Taxonomy upgrade extras

राज ठाकरे....

लेखक निखिलराव यांनी शनिवार, 24/01/2009 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आज ठाणे येथे होणार्‍या सभेला पोलीसांची परवानगी मिळाली........ राज आज काय बोलणार ?

नेताजी सुभाषचंद्र बोस-एक असामान्य व्यक्तिमत्व

लेखक चिन्या१९८५ यांनी शनिवार, 24/01/2009 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
"हम सब मिलकर आगे बढेंगे, तो सिध्दी प्राप्त होगी ही | हम अपनी दृष्टी को जितनी अधिक ऊपर की तरफ उठायेंगे ,उतना ही हम भुतकाल के कटु अनुभवोंको भुलते जायेंगे और तब भविष्यकाल पूर्ण प्रकाशयुक्त रुप में हमारे सामने प्रकट होगा." नेताजी सुभाषचंद्र बोस काल म्हणजे २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती होती .

काही ऐतिहासिक शंका..

लेखक योगी९०० यांनी शनिवार, 24/01/2009 05:19 या दिवशी प्रकाशित केले.
मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटलात घडलेल्या काही घटनांविषयी खरी माहिती हवी आहे. असे कळले की.. १) संभाजी राजांचे मोगलांना जाऊन मिळणे आणि परत स्वराज्यात येणे हा महाराज आणि संभा़जीराजांचा डाव होता. त्यांनी तसे मुद्दाम आखले होते. नाहीतर फितुर झालेल्या बर्‍याच जणांचे हात पाय तोडण्याची शिक्षा करणारे आपले महाराज संभाजी रा़जांना फक्त तुरूंगवास नाही ठोठावणार. महाराजांना स्वराज्यावर येणार्‍या पुढील संकटाची(औरंगजेबचा संभाव्य हल्ला) कल्पना होती. त्यांनी त्या द्रूष्टीने तयारी म्हणून मुद्दाम संभाजी राजांना दिलेरखानाकडे पाठवले होते. त्यावेळी आपल्या बेलगामी वागण्यामुळे संभाजीराजे थोडे बदनाम होतेच.

संतश्रेष्ठ (देवद्वार छंद)

लेखक संदीप चित्रे यांनी शनिवार, 24/01/2009 02:22 या दिवशी प्रकाशित केले.
'देवद्वार' छंदाची ओळख करून दिल्याबद्दल धोंडोपंतांचे आभार ! ----------------------------------------------------- ज्ञानियाचा राजा त्याची ज्ञानेश्वरी या भव सागरी नौका होई तुकोबा तो सांगे आम्ही देऊ छाटी नाठाळाला काठी हाणू माथी एकनाथ गाती रचूनी भारूड लोकांसी गारूड झाले ऐसे नामा म्हणे देवा म्हणतो अभंग तुझी भक्ती दंग करितसे लिहिणे हे काव्य केवढा आनंद साथ देई छंद देवद्वार

इ-सकाळ चे आजचे पान

लेखक प्रमेय यांनी शुक्रवार, 23/01/2009 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज सकाळी जेव्हा इ-सकाळ उघडला, तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. जे नवे रूप इ- सकाळने घेतले आहे ते उत्तम आहेच पण काही निवडक गोष्टिंकडे दुर्लक्ष झाल्याचे दुःख ही वाटते आहे. ही जाहिरात इथे का आली, याचे प्रयोजन काय?

बाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ७

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 23/01/2009 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा माझा गणपती उचलून बाहूबली हॊस्टेल मध्ये ठेवण्यात आला.... आईला काळजी लागली होती की हा पुन्हा पळाला व गावला नाही तर काय ? पुढे :- आई ने जाताना माझ्या आवडिचे बेसनचे लाडु व भडंग करुन दिला व काही पैसे खिश्यात ठेवले, अक्काने पण आपला बॉलपेन दिला व म्हणाली " दादा, परिक्षा देऊनच, ये. परत." मी जसा कैद्याला फाशीसाठी घेऊन जातात तसे तोंड करुन बाबाच्या मागे चालू लागलो, थोड्या वेळाने कोल्हापुर बस स्थानकावर आलो, बाबांनी मला एके जागे बसवलं व ते गाडीची टाईमींग विचारायला गेले, समोर मुतारी होती.. मी आपलं सामान तेथेच व्यवस्थीत लावले व सरळ मुतारी कडे गेलो.

(विचार)मंथन!

लेखक राघव यांनी शुक्रवार, 23/01/2009 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपुर्वी, बंगळूरात मित्रासमवेत राहत असतांना, एका दिवसभरात कमीत कमी ४ ते ५ अशा लोकांशी बोलणं झालं जे आपापल्या आयुष्यातल्या दु:खाला वैतागलेले होतेत. दोघा जणांनी तर जगण्यात काही राम नाही उरला असा निष्कर्षही काढून टाकला! अशावेळी शांतपणे समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्यायचे (व उगाच सांत्वन-प्रोत्साहनपर शब्द, त्यांना आलेल्या अडचणींवर उपाय शोधण्याचा प्रयत्न असले काहीही करायचे नाही !!) हे अनुभवाने आलेले शहाणपण वापरले व Be a Good Listener असाच वागलो! पण रात्री झोपण्याच्या प्रयत्नांत असतांना त्या सर्व गोष्टी परत आठवल्या अन् विचारांचे काहूर माजले.