मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटलात घडलेल्या काही घटनांविषयी खरी माहिती हवी आहे.
असे कळले की..
१) संभाजी राजांचे मोगलांना जाऊन मिळणे आणि परत स्वराज्यात येणे हा महाराज आणि संभा़जीराजांचा डाव होता. त्यांनी तसे मुद्दाम आखले होते. नाहीतर फितुर झालेल्या बर्याच जणांचे हात पाय तोडण्याची शिक्षा करणारे आपले महाराज संभाजी रा़जांना फक्त तुरूंगवास नाही ठोठावणार. महाराजांना स्वराज्यावर येणार्या पुढील संकटाची(औरंगजेबचा संभाव्य हल्ला) कल्पना होती. त्यांनी त्या द्रूष्टीने तयारी म्हणून मुद्दाम संभाजी राजांना दिलेरखानाकडे पाठवले होते. त्यावेळी आपल्या बेलगामी वागण्यामुळे संभाजीराजे थोडे बदनाम होतेच. तसेच त्यांचे आणि सोयराबाईंचे पटत नव्हतेच. याच गोष्टीचा फायदा घेण्यासाठी महाराजांनी आणि काही विश्वासू सहकार्यांनी संभाजीरा़जांचे मन वळवून या गोष्टीस तयार केले होते. संभाजी महाराजांच्याविषयी असलेल्या गढूळ वातावरणामुळे त्यांच्यावर मुघल लोकांची मर्जी बसेल आणि बरीच माहिती गोळा करता येईल असा हेतू असावा. (नंतर या गोष्टीचा संभाजीराजांना जेव्हा ते औरंगजेबाशी झुंजत होते तेव्हा फायदा झाला असावा. माझ्या आठवणीनुसार औरंगजेबाचा एक अकबर नावाचा पुत्र आपल्या बापाशी फितूरी करून संभाजीराजांना मिळाला होता. आणि हा औरंगजेबाचा डाव नसावा. कारण नंतर संभाजीराजांनीच त्याला पर्शियात पळून जाण्यास मदत केली. ) कदाचित मुघल छावणीत राहून संभाजीराज्यांनी काही माणसे हेरली असावीत ज्यांनी नंतर संभाजीराजांना मदत केली. ही घटना कितपत खरी?
२) महाराजांचा म्रुत्यू कसा झाला? त्यांना सोयराबाईने विषप्रयोग केला होता काय? असे कोठेतरी ऐकले की जेव्हा महाराजांनी संभाजी राजांना आपला उत्तराधिकारी नेमायचे ठरवले तेव्हा सोयराबाईंनी हा कट रचला. त्यावेळी महारा़जांनी मुद्दाम संभाजी राजांना तुरूंगात ठेवले होते (त्यांच्या मोगलांना जावून मिळण्याच्या डावानुसार). पण हे जेव्हा सोयराबाईला समजले, तेव्हा तिने संभाजीराजे तुरूंगात आहेत हे बघून महाराजांना विषप्रयोग केला. तिला असे वाटले की शिवाजी महाराजांनंतर बदनाम संभाजी राजांना डावलून सर्वजण राजाराम महाराजांना पाठिंबा देतील. महाराजांचा आणि संभाजीराजांचा हा डाव फारसा कोणास ठावूक नसावा. म्हणूनच संभाजीराजांना नंतर सत्ता मिळवताना त्रास भोगावा लागला आणि आपल्याच काही माणसांना (हिरोजी फर्जद वगैरे) मारावे लागले.
३) प्रत्यक्ष भवानीमातेने महाराजांना आपली भवानी तलवार दिली. हे कितपत खरे? कदाचित राजावर देवाची क्रुपा आहे असे भासवून प्रजेचा विश्वास मिळवावा हा उद्देश असावा.
४) अर्थात हा मुद्दा पुर्णपणे महाराजांविषयी नसला तरी त्या काळाशी संदर्भित आहे. संत तुकाराम महाराज सदेह वैकुठी गेले हे कितपत खरे? कोठेतरी ऐकले की त्यांची हत्या त्यांच्या विरोधकांनी केली आणि नंतर त्यांच्या म्रुतदेह नाहीसा केला आणि नंतर सर्वांना सांगितले की संत तुकाराम महाराज स्वर्गात गेले. तसेच जेव्हा संत तुकाराम आणि शिवाजी महाराजांची भेट झाली, तेव्हा काही मोघल सरदारांनी महाराजांना पकडण्यासाठी त्या भेटीच्या ठिकाणी सैन्य पाठवले. पण तुकाराम महाराजांनी काही चमत्कार करुन अनेक शिवाजी महाराजांचे भास निर्माण केले आणि मोघल सैन्याला गोंधळात टाकले. यात तथ्यता किती?
जर देवबाप्पा महाराजांना अशी उठसूट मदत करत होता तर तो नंतर बाजीराव, माधवराव पेशवे, पानिपत, इंग्रज वगैरे वगैरे काळात कोठे गायब झाला?
कोणाकडे वरील मुद्यांसंदर्भी अधिक माहिती असल्यास पुरवावी.
(शिवभक्त) खादाडमाऊ
वाचने
8454
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
चारही
ठिक आहे..
In reply to चारही by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
चारही
In reply to चारही by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
प्रश्न
सध्या
हो ना अगदी खरं..
In reply to सध्या by नितिन थत्ते
मला
कळले नाही..
In reply to मला by नितिन थत्ते
सकाळी - संध्याकाळी
In reply to कळले नाही.. by योगी९००
ठिक आहे..
In reply to सकाळी - संध्याकाळी by नितिन थत्ते
पु ना ओक जे
In reply to ठिक आहे.. by योगी९००
एक गोष्ट
In reply to पु ना ओक जे by नितिन थत्ते
चष्मा
In reply to एक गोष्ट by योगी९००
तुमच्या प्रतिसादाशी सहमत..
In reply to चष्मा by नितिन थत्ते
काही शन्कांचे निरसन
उत्तराबद्दल आभार..
In reply to काही शन्कांचे निरसन by विजुभाऊ
तो तह
In reply to काही शन्कांचे निरसन by विजुभाऊ
आभार
In reply to तो तह by केदार
इतिहास.
सहमत
In reply to इतिहास. by llपुण्याचे पेशवेll