Skip to main content

(बहु असोत)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 28/04/2009 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
बहु असोत कणगीभर संपत्ती ही अहा प्रिय अमुचा खाबुगिरी एक धर्म हा॥ गगनभेदी माया तरी पडते ती उणी लोभाच्या सीमाही वाढती झणी चटक एक रे पदाची सोडी ना क्षणी माल मिळे म्हणूनी मी ही राजकारणी मंत्र्यासी अटक गमे जेथ दु:सहा ॥ १॥ प्रासाद हा हवा अन हवी स्वमंदीरे कार्यकर्त्यांची हीच भव्य भांडारे रस्ता वा चौकासही नाव मम पुरे "भेट"-गाठ हीच साफल्य-धून ठरे शुद्ध नसे वर्तनही पण नसे मज तमा॥२॥ जात, धर्म आणि पंथ किती हव्या मिती 'फोडा अन राज्य करा' हीच तर निती धर्म, न्याय याची नसे कधी अम्हा क्षिती शक्ती, युक्ती एकवटूनी डाव साधती पसरे मम भीती अशी विस्मया वहा॥३॥ गीत राजनीतीचे हे श्रवणी, मुखी असो लक्ष्मी, कीर्ती, सत्

कशाला?

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 28/04/2009 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
कशाला? नि:शब्द भावनांचे इमले फुका कशाला? नसतेच अमृताची गोडी कधी विषाला या भाबड्या जिवाला केलेस तू निराश ऐश्वर्य अन् सुखाची सुरई तुझ्या उषाला ! जाणून घेतले कां कधी सांग प्रेम माझे? नांदीशिवाय सांग , ही सांगता कशाला? काळीज पत्थराचे , चेहेरा जरी झकास बेशर्म त्या जिवाचा शृंगार हा कशाला? हृदयांत कंडलेल्या भावनांचा निखारा फुकतोय येथ आता , राखेमधे कशाला? कधी वाचशील का गं , तू आर्त ही कहाणी? शब्दांत गुंफलेल्या कविता इथे कशाला? जे एकदांच मरती , त्यांच्या परी उदास मी सारखाच मरतो , अश्रू मला कशाला? ढाळू नकोस आता अश्रू मढ्यावरी या ते पेलणार नाही , आता , सखे खिशाला !
Taxonomy upgrade extras

जीवन...!

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी मंगळवार, 28/04/2009 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
जीवन तसं असतं सोप्प काहीच नाही कठीण.. जीवन म्हणजे झुळझुळणारा खळखळणारा झरा जीवन म्हणजे मोर नाचरा फुलवून पंखपिसारा जीवन म्हणजे मंजुळ मंजुळ ऐकवं कोकीळ गाण जीवन तसं असतं सोप्प काहीच नाही कठीण.. जीवन म्हणजे हिरव्या हिरव्या पानांची हो सळसळ जीवन म्हणजे शितल शितल वा-याची हो झुळझुळ चैत्रबनात येउन घाली नवथर सृष्टीला शीळ जीवन म्हणजे मोकळ्या आकाशी सांडल ट्प्पोर चांदणं जीवन तसं असतं सोप्प काहीच नाही कठीण जीवन म्हणजे उचंबळुन वाहणारी अल्लड नदी म्हणे माझा साजण सागर भेटेल मला हो कधी..? जीवन म्हणजे डोंगरमाथी पेटीयला वणवा.. जणु मनाला जाळीतो माझ्या दु:खांचा वैशाखवणवा.. जीवन
Taxonomy upgrade extras

३रा दिवस

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 28/04/2009 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
दचकलात काय? हे प्रकटन अगदी निष्पाप, निर्मळ, आणि निर्व्याज आहे. अगदी जपानी बँके प्रमाणे. ह्या प्रेमकथेतील पात्रांचे स्थळ, काळ, पत्ते हवे असल्यास व्यं. नी करावेत. वाचन झाल्यावर 'तब्बेत बिघडली का?' च्या खरडी पाठवु नयेत. पात्रसंख्या-३ काका, वय ५३, काकु वय ४५ मुलगा २१ लग्नाला २२ वर्षे झालेली. काकांनी कामाचे तास वाढवुन मंदीवर विजय मिळवलेला आहे. थोडक्यात सुखी मध्यम वर्गीय घर. काकू घरीच असतात. _______________________________________________________ भ्रमण ध्वनीचा गजर झाला. त्या मधुर नादाने मला जाग आली. वातानुकुलीत यंत्राची कालच आंघोळ झाल्याने शयनगृहाला 'काश्मिर्'चे स्वरुप आले होते. हळुच बाहेर आलो.

प्रिये..!

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी मंगळवार, 28/04/2009 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
तात्यांच्या सूचनेवरुन ..( पण खास जमली नाही असं वाटतं ) झाकला ग तुझा चेहेरा काळ्याकुट्ट बटांनी आकाशीचा चंद्र जणु ग्रासला ग नभांनी.. !! ******** नसेल तुझ्या गालांवर लाली निळी कमळंसुद्धा तळ्यात फुलतात नसतील तुझे ओठ गुलाबी काळी द्राक्ष सुद्धा रसरशीत असतात !!
Taxonomy upgrade extras

खरेदी - कोणता घेऊ?

लेखक समजा मी क्ष यांनी मंगळवार, 28/04/2009 06:56 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या बूट चप्पल फेकण्याची टूम निघाली आहे. त्यावर मला सुचलेले हे चित्र.
Boot
माझी चित्रकला हलकी घ्यावी हे सुजाण प्रेक्षकांना कळेलच :) अद्वैत.

आला वसंत (कलादालन)

लेखक अनामिक यांनी मंगळवार, 28/04/2009 03:57 या दिवशी प्रकाशित केले.
खालचे सगळेच फोटो ऍटलांटा बॉटनीकल गार्डनमधे घेतलेले आहेत.

अक्षय तृतियेचा आणी आंबे खाणे याचा काय संबंध आहे??

लेखक निशिगंध यांनी सोमवार, 27/04/2009 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
अक्षय तृतियेचा आणी आंबे खाणे याचा काय संबंध आहे. आमच्या घरी अक्षय तृतिया नंतरच आंबे खाण्याची परवानगी आहे. व का खायचे हे विचारायची पण सोय नाही X( . एक दोनदा विचारले पण उत्तर मिळाले " आम्ही आमच्या तीर्थरुपांना असले प्रश्न नाही विचारले, विचारले असते तर तुम्हाल उत्तर दिले असते" :W :W मला आंबे खुप आवडतात व मी चोरुन (घरच्यांपासून) ती खुप खातो. अगदी पहील्या दिवसापासुन ( जेव्हा प्रथम दिसतील) पाउस पडेपर्यंत जवळपास रोजच आंबा पोटात जातोच. :D :D :D पण राजरोस घरी आणून खाण्यासाठी अक्षय तृतीयेची वाट पहावीच लागते. आणी तोपर्यंत रोज मनात भिती की, आंबे संपतील. पण असे काय? याला काय धार्मिक आधार आहे काय?