Skip to main content

संघटनापालट-३

लेखक अन्वय यांनी सोमवार, 26/10/2009 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
जेवण घेऊन काका पुतणे दोघेही पुन्हा दिवाणखान्यात येऊन विसावले होते. --- "राज, मला या सगळ्या गोष्टींचा आता तिटकारा आलाय. माझ्या आयुष्यात मी कधीच वजाबाकी केली नाही. माझा जो काही निर्णय असे तो सर्वांच्या हिताचाच असे. माझ्या हिताला मी कधीही प्राधान्य दिलं नाही. पण या उतारवयांतच मला काही कटू आणि मनाला न पटणारे निर्णय घ्यावे लागलेत. त्यामुळे तुझ्यासारखी माणसे मला दुरावली. मी उभं केलेलं वैभव लयाला जात आहे. हे माझ्या डोळ्यासमोर घडते आहे आणि मी काहीच करू शकत नाही. याचं अतीव दु:ख होतंय. यानंच मी खचून गेलोय. या ढाण्या वाघाचा आवाज आता पार बसलाय. डरकाळी फोडण्याची इच्छा होते; पण ती तोंडातून बाहेर पडत नाही.

(किराणा मालाच्या दुकानाचा अति संक्षिप्त इतिहास...)

लेखक पर्नल नेने मराठे यांनी सोमवार, 26/10/2009 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
किराणा मालाचे दुकान काढावे असे माझ्या मनात आले, आले गेले मला सल्ला देउ लागले, लागले सवरले काही तर आम्हाला सान्ग म्हणत सर्वजण, सर्वजण मदत करु लागले आणी दुकान सुरु झाले, झाले सुरु दुकान तसे सगळे मिपाकर खरेदीला यायला लागले, लागले यायला बरेच लोक तसा मला स्टाफ़ कमी पडु लागला, लागला तसा नोकरीला दुकानात माझ्या अवलिया व परा, परा मग येइल जाइल ते पाखरु न्याहाळु लागला, लागला मग वाटु मला सिन्सियर एकच अवलिया, अवलिया झाला कालान्तराने मग म्यानेजर, म्यानेजर झाला तसा लागला हा कविता करु नाना, नाना नाना म्हणत पोरी गोन्डा घॊळवु लागल्या, लागल्या हिशोबाची वजा जाता मला घाम फ़ुटु लागला, लागला मला शोध मिच दुकानाची ड्
काव्यरस

उकडहंडी

लेखक गणपा यांनी सोमवार, 26/10/2009 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी.. आज एका अत्यंत चवीष्ट भाजीची तितकीच सोप्पी कृती घेउन आपल्या सेवेसी हजर आहे. ही भाजी आमच्या गावी साधारण फेब-मार्च महिन्यात होळीच्या आसपास केली जाते. त्यावेळी वाडीत बर्‍या पैकी भाजीपाला असतो. गावी ही भाजी मातीच्या मडक्यात करतात. सगळे जिन्नस एकत्र करुन हे मडके एका खड्यात ठेवुन वरुन जाळ करतात. पण आपल्या शहरात एक वेळ मडक मिळेल पण ते पुरायच कुठे आणि जाळ कसा करायचा ? पण एवढ्याश्या कारणासाठी आपण या चवीष्ट भाजीला का मुकावं बर? म्हणुन आपल्या घरात करता येइल अशी कृती देत आहे.

सूर्यास्ता नंतर...

लेखक अभिजा यांनी सोमवार, 26/10/2009 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
हाजीअली जवळून टिपलेले सूर्यास्ता नंतरचे रंगतरंग...

दाल बाफला

लेखक नेहमी आनंदी यांनी सोमवार, 26/10/2009 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
तुरीची डाळ १ वाटी हळद, तिखट, मीठ चवी नुसार, (ओल खोबरं एक तुकडा, २ चमचे दाणे, २ कांदे, ४ लसुण पाकळया, १ इंच आले), हे साहित्य मिक्सर मधुन बरिक करून घ्यावे. कोथिंबिर, मिरच्या ४,हिंग, २ बारिक चिरलेला टोमटो फोडणीला तेल जाड दळलेली गव्हाचे पीठ, मोहनासाठी,तेल, साय्,मीठ, चिमुट्भर हळद, आणि सगळे भिजवायला पाणी. तुरीची डाळ कुकर मधे चांगली शुजवून घ्यावी. रगडून घ्यावी. आता कढईत तेल घालून त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या, हिंग टाकून त्यावर मिक्सर मधून काढलेला मसाला घालावा.तो शिजत आला की बारिक चिरलेले टॉमटॉ टाकावे.

मुंबई महाराष्ट्राच्या गळ्यातील धोंड?

लेखक भोचक यांनी सोमवार, 26/10/2009 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई ही महाराष्ट्राच्या गळ्यातील धोंड? या शीर्षकाचा हा दत्तप्रसाद दाभोलकरांचा लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे. सगळ्यांनाच तो पटेल असेही नाही. खरं तर मुंबईविषयी असे वाचताना ते पचवून घेणे अवघड जाते. दाभोलकरांच्या मते मुंबईसाठी उर्वरित महाराष्ट्राने इतका त्याग केला आहे आणि करत आहे की त्या तुलनेत त्यांना काहीही मिळालेले नाही. मुंबईतली वीज, पाणी उर्वरित महाराष्ट्रातूनच जाते.

नातं तुझं माझं

लेखक नेहमी आनंदी यांनी सोमवार, 26/10/2009 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
नातं तुझं माझं आठवणींच्या पलिकडलं मनात वसलेलं डॊळ्यात साठलेलं हृदयात साठवलेलं नातं तुझं माझं पाण्यासारखं नितळ गहिरं जस कातळं खोल जस तळं हिरव गार जस मळं नुसत्या नावात न अडकणारं नुसत्या रेषांमधे न सामावणारं नुसत्या आभाळात न मावणारं नुसत्या देहात न राहणारं नातं तुझं माझं प्रसन्ना जीके.
काव्यरस

(हव्यास तू)

लेखक कौतुक शिरोडकर यांनी सोमवार, 26/10/2009 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
(प्राजू यांना अपेक्षित असलेल्या प्रियकराची सद्यस्थिती) घरात अपुल्या भरून उरल्या मद्यराणीचा सुवास तू वेगवेगळ्या गचाळ गंधाची उभी ठाकलेली रास तू क्षणैक जागेवरी न थांबे लडखडणारा त्रास तू मित्रांच्या कुबड्या करुनी तरंगणारा भकास तू अखंड रिचवणारा... झरझर घोट संस्कृतीचा दास तू चाखण्यावरती पोसलेली तुंदीलतनू आरास तू डोळे मिटूनी तुला पहावे.. ग्लास तू ..... ग्लासात तू तुझ्याविना ते कसे जगावे मद्यकर्त्याचा श्वास तू पेगवेड्या त्या जनांना लागलेला ध्यास तू.. बाटलीतील उत्कटतेचा झिंगला उल्हास तू सदा सदाच पीत रहावे न संपणारा प्रवास तू काल बेवडा... आज बेवडा हवाहवासा हव्यास तू..
काव्यरस

खाणावळ

लेखक कौतुक शिरोडकर यांनी सोमवार, 26/10/2009 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटी कुमारच्या हट्टापुढे प्रियाचं काहीच चाललं नाही. ती मुकाट गाडीत बसली. त्याने हसून चावी फिरवली व तिच्याकडे पाहीलं. तिचा मुळचा गव्हाळ रंग आता त्याला लालेलाल भासु लागला. "काय झाल ?" माहीत असुनही त्याने तिला खिजवलं. "काही गरज आहे एवढ्या रात्री निघायची ? सकाळी निघालो असतं तर चाललं नसतं ? पण नाही... मी म्हणतो तेच खरं. कोणाचं ऐकशील तर शपथ." एकदाची त्याला बडबडून ती मोकळी झाली. थोडक्यात का होईना पण मनातलं सगळं कचकचून बाहेर आलं आणि तिचं तिलाच बरं वाटलं. "गोड दिसतेस गं चिडलीस की." त्याने तिची ती चिडचिड मनावर घेतलीच नाही. तिने त्याच रंगात त्याच्याकडे पाहीलं आणि तो गोडसा हसला. तशी ती विरघळली.