(कोडगं सुख.....)
सप्रे काकांची माफी मागुन....
अंदाज स्टॅमिन्याचा, माझ्या मला न आला
हातात ग्लास माझा, घेता मला न आला
बाटलीच टाकीली मी, अन कोंबडी रिचवली
हँगओव्हर मात्र माझा, उतरविता मला न आला
रस्त्यात मोळळ्या मी, का हरविले स्वतःला
पोलीस एक माझा, धरण्यास हात आला
आगतिक पणाने, जामिन दीला तु माझा
घेईन दोन घोट, विसरण्या अपमान माझा
मी कोडगा किती पण, तरीही सुखावलो बघ
तल्लफ परत येता, थांबवता तुला न आला
पैजारबुवा
काव्यरस
मिसळपाव


या मंगळवारी, २६ जानेवारी २०१० ला अधुनिक भारताचे प्रजासत्ताक झाले, त्याला ६० वर्षे होत आहेत. त्या निमित्ताने सर्वप्रथम सर्व भारतीयांना तसेच भारतवंशीयांना शुभेच्छा!
व्यक्तीच्या आयुष्यासंदर्भात, मराठीत एक मजेशीर वाक्प्रयोग आहे: "साठी बुद्धी नाठी". त्याचे एक कारण असे सांगितले जाते की, साठाव्या वर्षांनंतर माणूस म्हातारपणा कडे झुकायला लागल्यावर परत लहान मुलासारखा वागायला लागतो, वागणे बदलू लागते, इत्यादी...मात्र राष्ट्राच्या बाबतीत असे म्हणणे अवघड आहे.