साठी बुद्धी...
या मंगळवारी, २६ जानेवारी २०१० ला अधुनिक भारताचे प्रजासत्ताक झाले, त्याला ६० वर्षे होत आहेत. त्या निमित्ताने सर्वप्रथम सर्व भारतीयांना तसेच भारतवंशीयांना शुभेच्छा!
व्यक्तीच्या आयुष्यासंदर्भात, मराठीत एक मजेशीर वाक्प्रयोग आहे: "साठी बुद्धी नाठी". त्याचे एक कारण असे सांगितले जाते की, साठाव्या वर्षांनंतर माणूस म्हातारपणा कडे झुकायला लागल्यावर परत लहान मुलासारखा वागायला लागतो, वागणे बदलू लागते, इत्यादी...मात्र राष्ट्राच्या बाबतीत असे म्हणणे अवघड आहे. कारण आज जी साठ वर्षे होत आहेत ती एका अधुनिक व्यवस्थेला, राष्ट्राला नाही. ते तर हजारो वर्षे जुने आहे. (हजारो असे मोघम इतक्यासाठी की नक्की किती जुने हा तुर्तास वाद नको! :-) ).
भारत हा असा एक प्राचीन देश आहे जिथे गोष्टी पटकन बदलत नाहीत असे म्हणले जाते.साम्यवाद हे सर्वास (सामाजीक) असे वाटणार्या आपल्या तत्कालीन साम्यवाद्यांपैकी कॉ. डांगेंना, स्टॅलीनने सांगितले होते की इतर सर्व जगात कम्युनिझम आणता येईल पण भारतात नाही... भारतास बदलणे सोपे नाही हा त्यातील मूळ मुद्दा. येथे क्रांती होत नाही, तर निव्वळ उत्क्रांती होते असे म्हणणारेपण स्वप्नाळू असतात. तसे म्हणले तर ते बरोबर पण आहे. पण ही उत्क्रांती म्हणजे निव्वळ वाढ आहे की विकास (प्रोग्रेस) आहे यावर त्यातील यश अथवा फोलपणा ठरू शकतो.
स्वा. सावरकरांनी एक छान काव्यमय व्याख्या, क्रांती या शब्दाची केली आहे: "गतीशून्य माणसाच्या अथवा कुजू पाहणार्या राष्ट्राच्या, पायात बद्ध असलेल्या शृंखला, जेंव्हा प्रगतीच्या घणाखाली तुटू लागतात, तेंव्हा होणार्या आवाजाला, क्रांती असे म्हणतात".
या चर्चेचा विषय हा काहीसा या व्याखेतील शब्दांसंदर्भातच आहे. आपण अधुनिक भारतात आणि भारतीयांत तसेच अनिवासी भारतीयांत काय चांगले नाही, काय वाईट होत आहे याबद्दल कायमच लिहीतो. त्यात कधी कधी कडवे वास्तव असते तर कधी कधी नुसतेच अवास्तव असते. पण गेल्या ६० वर्षात भारतात प्रत्येक मिनिटाला नसेल पण सातत्याने क्रांती होत आहे असे मात्र मला नक्की वाटते.
तेंव्हा तुम्हाला प्रजासत्ताकाच्या वाढदिवसानिमित्ताने या संदर्भात काय (चांगले) आठवत आहे? अशा कुठल्या शृंखला कुठल्या प्रगतीच्या घणाखाली तुटल्या आणि आजही तुटत आहेत ज्यामुळे आपल्या आजी-आजोबांपेक्षा, आई-वडलांचे आणि त्यांच्यापेक्षा आपले जीवन हे बदलत आहे?
सकारात्मक प्रतिसादांसाठी विनंती करतो. याचा अर्थ वाईट झाकायचे असा नाही, त्यावर परत कधी तरी...किमान चांगले किती झाले याचा मागोवा घेतला तर वाईटाल तोंड कसे देता येईल या संदर्भात वेगवेगळे मार्ग/विचार दिसू लागतील.
वाचने
4049
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
मध्यमवर्ग
स्वातंत्र्यानंतर-
दलितांविषयी
In reply to दलितांविषयी by अक्षय पुर्णपात्रे
मनातल
In reply to दलितांविषयी by अक्षय पुर्णपात्रे
खैंरलांजी
In reply to खैंरलांजी by कालिन्दि मुधोळ्कर
थोडेसे
सकारात्मक..
आमचं एकच
चांगला धागा
महिला राज !
धन्यवाद
सकारात्मक बदलांबद्दल चर्चा
In reply to सकारात्मक बदलांबद्दल चर्चा by धनंजय
सहमत