शाळेत यत्ता ८वी ते १० वी च्या मुलांना टेक्निकल/ संगणक/ शेती यापैकी एक ऐछीक विषय शिकवला जाई. संपूर्ण संस्क्रुत आणि टेक्निकल घेतले की 'अ' तुकडीत प्रवेश मिळत असे. माझ्या सर्वच मित्रांना टेक्निकलची प्रचंड क्रेझ आणि आवड.. मला 'अ' तुकडी, टेक्निकल याचे अजिबात सोयरसूतक नव्हते पण संपूर्ण संस्क्रुत आणि जिवाभावाचे मित्र यांच्यासाठी टेक्निकल आणि पर्यायाने 'अ' तुकडी मिळवणे अनिवार्य होते. टेक्निकल 'मिळवण्यासाठी ' ८वी च्या वर्षाच्या सुरुवातीला गणिताची ५० मार्कांची एक परीक्षा द्यावी लागत असे. गणित विषय मला फार्र फार्र आवडत असे, इतका की मी गणिते पाठ करत असे!! परीक्षा झाली आणि 'निकाल' लागला.