Skip to main content

रेवती संपादकपदी विराजमान..

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 11/03/2010 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, कळवण्यास आनंद वाटतो की आपल्याच एक मिपाकर सभासद आणि हितचिंतक सौ रेवती यांना मिपाचे संपादक बहाल करण्याचे आम्ही ठरवले आहे व तसे ते केले आहे.. मिपावरील इतर संपादकांप्रमाणेच रेवती यादेखील आपली संपादकीय जिम्मेदारी व्यवस्थित सांभाळतील असा आम्हाला विश्वास आहे. अर्थात, आमच्या एखाद्-दोन देवगडी शेलक्या शिव्याकडे त्यांनी इतर संपादकांप्रमाणेच दुर्लक्ष करावे, इतकीच लिबर्टी आम्हाला मिपाचे मालक म्हणून हवी आहे.

दीऊ - पावसाळ्यातील भटकन्ती

लेखक Manish Mohile यांनी गुरुवार, 11/03/2010 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
२००९ चा ऑगस्ट महिना. आम्हाला रक्षाबन्धन, स्वातन्त्र्यदिन व त्याला लागून रविवार अशा लागोपाठ तीन सुट्ट्यान्चा दुग्धशर्करा योग जमून आला होता. त्याचा फायदा घेऊन आम्ही दीऊ ला जायचे ठरवले. अहमहदाबादपासून दीऊ साधारण ५०० कि.मी. आहे. अहमदाबाद-भावनगर-उना-दीऊ असा साधारण मार्ग आहे. १४ तारखेला सकाळी पाच वाजता आम्ही तीन कुटुम्बे निघालो. स्वतःजवळ वाहन असल्यामुळे बस, ट्रेन पकडण्याची कुठचीही गडबड नव्हती. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे उन्हाचा तडाखा कुठेही जाणवत नव्हता. गाणी गात, ऐकत, गप्पागोष्टी करत , मध्ये दोन ठिकाणी चहा व नाश्त्यासाठी थाम्बून दुपारी साधारण दोन अडीच च्या सुमारास आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो.

स्वप्ने

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी गुरुवार, 11/03/2010 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
त्या रात्री स्वप्नांच्या राज्यातली एक नदी तिच्या डोळ्यात उतरली होती... ती डोळ्यातुन स्वप्नं सांडत होती... अन ती स्वप्ने वेचायचा मी निष्फळ प्रयत्न करत होतो... माझी स्वप्ने , तिची स्वप्ने, आमची स्वप्ने ज्या डोळ्यांत मी सजवली होती.. त्याच डोळ्यांतुन ती आज कितीतरी स्वप्ने सांडत होती... अगणित... निघून जाताना तिच्या डोळ्यातले एक स्वप्न माझ्या तळहातावर विसावले होते, अन तळहातावरल्या आसवामध्ये मात्र मला फक्त माझच प्रतिबिंब दिसत होते..

मुंबई - तिरुपती - चेन्नई - मुंबई

लेखक इंटरनेटस्नेही यांनी गुरुवार, 11/03/2010 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
या (2010) वर्षीच्या मे महिन्याच्या उत्तरार्धात ४-6 दिवसांचा मुंबई - तिरुपती - चेन्नई - मुंबई असा धार्मिक प्रवास योजिला आहे. रेल्वेचे confirm आरक्षण झालेले आहे, मात्र अजून राहण्याच्या व फिरण्याच्या ठिकाणांबद्दल काही संशोधन केलेले नाही. सन्माननीय मिपाकरांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी, तिरुपती, चेन्नई येथे प्रवास करत असतानाच्या घ्यावयाच्या काळजी बद्दल माहिती दयावी. अजून एक गोष्ट अशी की, जातानाचा प्रवास जरी ६ जणांना जरी समूहाने करायचा असला तरी वैयक्तिक कारणांमुळे माझा येतानाचा प्रवास एकट्यानेच आहे.

'law and order' या विषयवरील आपले आवडते चित्रपट...

लेखक इंटरनेटस्नेही यांनी गुरुवार, 11/03/2010 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, नुकतेच Law Abiding Citizen (2009 ) आणि Presumed Innocent (1990) हे दोन चित्रपट पाहण्यात आले, दोन्ही चित्रपट सर्वच बाबतीत उत्तम आहेत. नकीच पाहावेत असे आहेत. अशा प्रकारच्या अजून काही चित्रपटांची नावे माहीत असल्यास ती येथे माहीत करून द्यावीत, अशी सर्व माननीय मिपाकरांना नम्र विनंती. त्याच बरोबर सदर चित्रपट कृष्णधवल आहे की रंगीत याचीही माहिती दयावी. -- आपला नम्र, इंटनेटप्रेमी.

(....पुन्हा पुन्हा!)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 11/03/2010 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी प्रेरणा एखादीच कविता असते पण काहीवेळा कवितेसोबतच इतरही धाग्यांचा दंगा एवढा भरपूर असतो की समजत नाही नेमकी प्रेरणा कोणती...जाऊ दे प्रेरणेची काळजी 'मंगेशाला'!
काव्यरस

चंद्रगड आणि ऑर्थरसीट

लेखक बज्जु यांनी गुरुवार, 11/03/2010 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रगड आणि ऑर्थरसीट चंद्रगड आणि ऑर्थरसीटचा ट्रेक म्हणजे महाबळेश्वर आणि जावळी खोर्‍यांमध्ला एक नितांत सुंदर ट्रेक. सदाहरित जंगलाचा हा प्रदेश. तर अशा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या, आणि निर्सगरम्य परिसरातून ट्रेक करणं म्हणजे एक अविस्मरणिय अनुभवच. थोडक्यात इतिहासः- जावळी खोर्‍यावर वर्चस्व असलेले सूर्यराव/चंद्रराव मोरे सहजासह्जी स्वराज्यात सामील होत नाहीत हे पाहून महाराजांनी त्यांच्याकडे असलेला रायरीचा किल्ला म्हणजे रायगड स्वारी करुन स्वराज्यात सामील करुन घेतला. जिवाच्या भितीने मोरे जावळीखोर्‍यात असलेल्या चंद्र्गडावर लपून राहिला.

रस्त्यात मामा आडवा येतो जेंव्हा...

लेखक Navigator यांनी गुरुवार, 11/03/2010 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना: आपण सकाळी सकाळी जेंव्हा घाई घाई मध्ये कामासाठी चाललो असताना, आपण ट्राफिक सिग्नल तोडतो आणि मग पोलीसवाला मामा आपल्याला थांबवतो आणि मग आपल्याकडून पैसे लुटतो..
काव्यरस

गुलाबाचा महिमा

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 11/03/2010 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाब हा फुलांचा राजा. याच्या शेकडो जाती असतात, व दरवर्षी नव्या निघत असतात. म्हणजे नाव एकच पण प्रत्यक्ष फुलं अनेक. (आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, आम्हाला आयडी अनेक पण व्यक्ती एक हा प्रकार माहीत आहे. तर त्यावर आधीच उत्तर म्हणूनच तात्यांनी आयडी एकच (जवळपास) आणि व्यक्ती अनेक (जवळपास) हे उदाहरण दाखवलं असावं.) हा नावावरनं गुलाबी रंगाचा असतो असं वाटेल, पण तसं झालं तर तुम्ही कोत्या चक्रीय व्याख्येला बळी पडलात असंच म्हणावं लागेल. हा अनेक रंगात, अनेक वासांत व अनेक प्रकारे उगवतो - झु़डूप, कलम, वेल इत्यादी.