तिकोना
शुक्रवारी अचानक वळीव बरसला. ऑफीसमध्ये काचेच्या तावदानातुन शांतपणे बघण्या पलिकडे काही करणे शक्य नव्हते. वाकुल्या दाखवत पडणारा पाऊस, मृदगंध पसरवुन जीवाची घालमेल करुन गेला. नकळत बोटे भ्रमणध्वनी वर फीरायला लागली, कुणा़कुणाला फोन लावायचा याची यादी मेण्दुत तयार होती.. साला पण कुणालाच वेळ नव्हता. एवढ्या लवकर कुठेही जायचे नाही असे ठरवल्याने प्रत्येक जण कशाना कशात अडकला होता. शेवटी ओंकारला फोन लावला, पण त्याने सुध्दा निराशा केली. वैतागलेल्या मनाने घरी आलो, जयवर्धेनेच्या शतकी खेळीने पुन्हा एकदा फील गुड आला आणि ताणुन दिली.
मिसळपाव
बरेच दिवस लिहिन लिहिन म्हणता म्हणता ह्या चित्रपटावर लिहायचा आज मुहुर्त उजाडला. शुक्रवारी काहीच काम धाम नसल्याने ट्वायालईट चौथ्यांदा बघितला, चित्रपटाचा फारच परिणाम पुन्हा एकदा मनावर झाल्याने शनिवारी देखील परत बघितला आणी काल चक्क रात्री जागुन पुन्हा एकदा स्टार मुव्हिजवर बघितला.
येवढे आहे तरी काय ह्या चित्रपटात ? ह्यात आहे एक अनोखी प्रेम कहाणी.