Skip to main content

तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय

लेखक ब्रिटिश यांनी सोमवार, 19/07/2010 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
चिक्कार दिस झाल बाय तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय आटवतय तुला शेतान भात लावताना तिरप्या डोल्यांनी म्हटलवत 'धीन ताना धीन ताना' कालजान गीटार वाजलवत चार दीस झोपलोच नाय चिक्कार दिस झाल बाय तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय खारीवर आल्तीस दुपारची लाजत होतीस पापनीचे पल्याडशी 'मुजे रंग दे, मुजे रंग दे' बोलत होतीस त्यादीवशी तुला रंगवताना मी दमलोच नाय चिक्कार दिस झाल बाय तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय 'मै तेरीच हुं' गाताना काय तुजा आवाज होता. हरणीचे डोल्यांना पापनीचा साज होता. त्या डोल्यात बुडलो न भायेर कदी निगलोच नाय चिक्कार दिस झाल बाय तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय आजकाल तु डोल्यानं झालीस मुकी निस्त
काव्यरस

दिवे आगर

लेखक मराठमोळा यांनी सोमवार, 19/07/2010 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. मागच्या वर्षी जानेवारीमधे दिवे आगर ला जाण्याचा अचानक बेत ठरला आणी आम्ही तीन मित्र निघालो. "अरे अचानक कुठे जाताय? रहायला जागा मिळणार नाही, सगळीकडे बुकींग फुल असतं" असं म्हणुन २-३ जणांनी टांग दिली तरी आम्ही तीन जण निघालोच.

टणत्कार (खुलाशासह )

लेखक अवलिया यांनी सोमवार, 19/07/2010 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
किर्र किर्र रातकिड्यांचा आवाज चालु होता. गेल्या दोन दिवसांपासुन पावसाचा जोर कमी झाला म्हणुन पर्णकुटीच्या बाहेरच गवताची शय्या केली होती. तिच्यावर पडल्या पडल्या आभाळात नजर टाकता टाकता कधी डोळा लागला ते कळलंच नाही. गार हवेने आता जाग आली. मधुनच दोन चार चुकार ढग हळुच चालले आहेत. पुर्वेकडे चंद्रकोर दिसत आहे म्हणजे पहाट व्हायला आली असावी. कृष्ण पक्ष चालु आहे. बोलता बोलता चार महीने झाले ह्या पर्णकुटीत राहुन. येवढा पावसाळा संपला की आपण कामाला लागु हे आश्वासन मिळाले अन त्या आश्वासनावर मनातले दुःख कसं बसं सावरुन धरलं आहे. पण असं तर नाही ना की माझे काम तो विसरुन गेला असेल?

तर्क जाणत्यांचा

लेखक सन्जोप राव यांनी सोमवार, 19/07/2010 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
ती एक जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन असणारी, माणसांमधील चांगुलपणावर विश्वास ठेवणारी आणि समाजासाठी जाणीवपूर्वक काहीतरी करण्याची इच्छा असणारी श्रद्धाळू स्त्री होती. कधीही कुणाचे वाईट व्हावे असे तिच्या मनात आले नाही. तिने ज्यांच्यावर मनापासून माया केली, त्यातल्या बर्‍याच लोकांनी त्यांचा हेतू साध्य झाल्यावर तिच्याकडे मागे वळून पाहिलेही नाही. त्याबद्दल तिला खंत वाटली असेलही, पण तिने त्याचा सल मनात ठेवला नाही. तिचे आयुष्य तसे कष्टातच गेले. आज सत्तरीच्या पुढे असणार्‍या लोकांनी त्यांच्या उमेदीच्या काळात जशा खस्ता खाल्या, ज्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना केला, तसे तिनेही केले.

एक ट्रेक असा ही.... (फोटोसहीत)

लेखक हर्षद आनंदी यांनी सोमवार, 19/07/2010 05:28 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ११ जुलै २०१०, रविवार.. किती छान सकाळ! आज किती तरी दिवसानी लवकर ऊठुन गच्चीत आलो होतो. पुर्वेला रंगांची उधळण चालली आहे. लाल-पिवळ्या रंगाच्या अनेक छटा डोळे सुखाऊन टाकत आहेत. काळपट पांढर्‍या तुरळक ढगांना आलेली सोनेरी किनार, किती मनमोहक. गेले दोन वर्षे नचुकता सुर्योदय पहाण्याचे भाग्य मला लाभले होते. बंडगार्डन मधील विशाल वृक्षांवर वस्ती केलेल्या अनेक पक्षांचा किलबिलाट कानभरुन ऐकला आहे. होळकर ब्रीजच्या समोरील टेकडीवरील शंभुमहादेवाला नमस्कार करुनच माझा दिवस सुरु होत असे. संपले सारे, आता तांबड फुटत असताना घरी यायचे आणि सुर्य पार डोक्यावर आला की ऊठायचे.

आम्ही : एका स्वप्नपूर्तीचे साक्षीदार

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी रविवार, 18/07/2010 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी जालावर आल्यापासून जे काही लोक ओळखीचे झाले आहेत, जीवाभावाचे मैतर झाले आहेत, त्यात प्राजुचं नाव अगदी आवर्जून घ्यावं असं. मराठी आंतरजालावर जे काही लोक अगदी सातत्याने आणि चांगलं लेखन करतात त्यातही तिचं नाव अगदी अग्रणी आहे. तिच्या सुंदर कविता / गझला मराठी संस्थळांवर नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. तर अश्या या आमच्या मैत्रिणीच्या कवितांचा एक अल्बम येऊ घातलाय ही बातमी कुठून कुठून कानी येतच होती. आता प्राजुचा स्वभाव माहिती असल्यामुळे हा अल्बम एकदम नीटनेटका आणि झकास होणार हे नक्की असे वाटतच होते.

अभिनव वाचनालय योजना ! ( पुण्यात फक्त )

लेखक विटेकर यांनी रविवार, 18/07/2010 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
रसिक वाचकांनी आस्वाद घ्यावा अशी योजना! ------------ समुत्कर्ष बुक्स चैत्रपालवी लायब्ररी योजना ज्याप्रमाणे चैत्रात वृक्षांना नवी कोवळी पालवी फुटते व सारी सृष्टी आनंदाने मोहरुन जाते., त्याप्रमाणे आपल्याला ही साहित्यवृक्षावरची नवपालवी ….नव नवी पुस्तके आकर्षित करतात. आपल्याला पुस्तकांच्या विश्वातच रममाण व्हावेसे वाटते. आपल्यापर्यन्त अशी नव -नवीन पुस्तके पोचवीत व ते ही कमीत कमी खर्चात, यासाठी " समुत्कर्ष" आपल्यासाठी एक विशेष योजना घेऊन येत आहे. य़ोजना: १.आपण रु.१०० सभासद शुल्क भराल. २. त्यासोबत रु. १००० डिपॊ्झीट भराल ( एक वर्षासाठी) ३.