Skip to main content

युगलगीतः बाई इथंच ठोकू का हा खिळा?

गुरुवार, 14/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
बाई इथंच ठोकू का हा खिळा?
मास्तरः ठोकू का ठोकू का, बाई इथंच ठोकू का हा खिळा? मास्तरीणबाई: चला लावूया, सर लावूया, इथेच काळा फळा मास्तरः ह्या वर्गात आडवे बेंचेस ठेवू उभं रहायला उंच प्लॅटफॉर्म करू मास्तरीणबाई: समोर टेबल अन आहे खुर्ची बसायला डस्टर द्या मला, नाही वापरत कापडी बोळा मास्तरः ठोकू का ठोकू का, बाई इथंच ठोकू का हा खिळा? मास्तरीणबाई: चला लावूया, सर लावूया, इथेच काळा फळा मास्तरः दरतासाला मी हो हजेरी मुलांची घेईन सार्‍या मुलांना मी लाईनीनं उभं करीन मास्तरीणबाई: भरलेली शाळा खुपच आवडते मला वर्ग
काव्यरस

रांगोळी

गुरुवार, 14/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
शेणाने सारवलेले आंगण मागे पडुन त्याची जागा जशी विटा सिमेंटने घडलेल्या फरश्यांनी घेतली आणि ऐसपैस घराची जागा फ्लॅटने घेतली तसतशी रांगोळी हळुहळु लुप्त होत चालली आहे. तरी अजुनही काही गृहिणी (आणि काही बाप्येसुद्धा) ही कला टिकवुन आहेत. कामचलाउ का होइना रांगोळी प्रत्येक घरात कोणा ना कोणाल येत असतेच. अगदीच काही नाही तर छाप वापरुन वेळप्रसंगी वेळ निभावुन नेली जाते. रांगोळीचे प्रकारही तसे अनेक ठिपक्यांची रांगोळी, फुलांची रांगोळी, नक्षी, अक्षरभारती, फ्रीहँड, प्रसारभारती. आता तर पाण्यात रांगोळी काढण्याचे तंत्र आणि कलादेखील विकसित झाली आहे. सर्वांनाच सर्व प्रकारची रांगोळी काढता येइलच असे नाही.

एका सैनिकाने लिहिलेल्या हृदयद्रावक कवितेचे भाषांतर

लेखक गणेशा
गुरुवार, 14/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : सुधीर काळेंचा हा थ्रेड - http://www.misalpav.com/node/14446 माये का करु अजुनही सेवा तुझी ? हा खेळ चाले जीवनी, पाहितेस का कधी ? लहानपणी स्वप्नाळलेले मन माझे वेडे असे रक्षणात सीमांच्या अखंड सताड उभे आता करुनी मुर्खात गणना माझी त्यागलेली ती कोमलता, पाहितेस का कधी ? पुरुषात रुपांतर करुनी झाले सुखवस्तु कातडीस पिळवटुन झाले सग्या - सोयर्‍यांपासुन दूर वंचीत कायम हरवलेले रोमांचीत जीवन, पाहतेस का कधी ? धुक्यात विरघळूनी ..उन्हात होरपळूनी रक्त सांडलेले तुझ्या पदरी ...
काव्यरस

भैरव गुनि गावत नित..

गुरुवार, 14/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II
या पूर्वी - सब सूर तीवर मेल मिलायो..(ओळख..) सब सूर तीवर मेल मिलायो..(यमन) सकाळची वेळ.. भैरवाचं वातावरण.. भैरवाचं मनन, भैरवाचं चिंतन, भैरवाची भक्ति, भैरवाची शुचिर्भूतता..! राग भैरव.. आपल्या रागसंगीतातला एक बलाढ्य राग..

गहिवरल्या अधीर धारा ...

लेखक गणेशा
गुरुवार, 14/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
भरलेल्या आभाळात ढगांची गर्भरंगीत ओळ विचारांच्या किणार्‍यावरती आज लाटांची टोळ पेटलेला श्वास मनी, काळोखाची कोमल वेल गहिवरल्या अधीर धारा ऐकुनी पर्णकल्लोळ सळसळणार्‍या भावनांचा घट्ट ओला पाचोळा क्षितीज वृक्षाखाली गंधाळलेली प्रकाशधुळ बावरलेल्या वार्‍यावरती स्वप्नांची झुले रेघ सांजफ़ुलांच्या ह्रदयी शुभ्रांकीत विजांचा लोळ --- शब्दमेघ

उद ग अम्बे उद ! उद !!

लेखक स्पंदना
गुरुवार, 14/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्र म्हणजे नऊ दिवस देवांनी त्यांच्या सेनेला दिलेलं पृथ्वीच राज्य. माझ्या घरी घट बसवला जायचा, अजूनही बसवला जातो. लहाणपणी ती कापसाची वळलेली नऊ मुठ वात, खास नवरात्रासाठी काढलेला लामण दिवा, या साऱ्याच फार अप्रूप वाटायचं. घटस्थापणे दिवशी संध्याकाळी देवघरात , (आम्ही देव खोली म्हणतो, ही एक छोटीशी देवांची खोली आहे) सारवलेल्या जमिनीवर पत्रावळ मांडली जायची. त्या पत्रावळीवर माती चा छोटासा ढीग रचला जायचा. त्या मातीत वेगवेगळी धान्य पेरून वर पाण्याचा मातीचा घट रोवायचा. ही घट स्थापना. मग वरच्या खुंटीला रोज एक झेंडूच्या फुलांची माला टांगून आज कितवी माळ हे ध्यानात ठेवायचं.

एका जेलियाने

गुरुवार, 14/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
डान्राव हे आमचे फार जुने मित्र आणि थोडे जुने राको (राकोचा अर्थ विचारण्यासाठी कृपया व्यनी आणि खरडी वापरू नयेत. तुम्हाला राकोचा अर्थ माहित असेल तर तुम्ही नशीबवान आणि माहित नसेल तर तुम्ही आनंदी (आठवा: अज्ञानात आनंद असतो)). डान्रावांच्या प्रदीर्घ कारकीर्दीवर 'एका जेलियाने' नामक पुस्तक लिहीण्याचा मानस आम्ही अनेकदा जाहिर केला आहे. आता प्रश्न असा पडेल की जेल या इंग्लिश शब्दाचा (खरंतर शब्दांचा gel आणि jail) इथे काय संबंध? तर संबंध आहे. डान्राव डोक्यास जेल (gel) लावतात आणि अनेकोत्तम सामाजिक कार्यांचा ध्यास घेऊन डान्राव जेलमधे जातात.

प्रगती!!! नक्की कशासाठी?

गुरुवार, 14/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाने प्रगती केली. आपला देश प्रगती करत आहे, जगाची फार प्रगती झाली आहे.... अनेक वाक्ये, अनेक लेख, वाद-विवाद, चर्चा, बातम्या, गप्पा बरंच काही. लहानपणापासुन बघतो, ऐकतो आहे, चालत आहे. पण मग ही प्रगती म्हणजे काय? आणि का? याची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला, कदाचित जमला नाही. ;) बरं प्रगतीची व्यख्या करुयात.. माणसाला सुखी, समाधानी, ऐश्वर्य असेललं आयुष्य देऊ शकेल असे काहीतरी करण्याचा यशस्वी झालेला (?) प्रयत्न म्हणजे प्रगती असे म्हणुयात. मग भारत असो, पाकिस्तान , युरोप वा अमेरिका. ही प्रगती माणसं बदलु शकली का? माझ्या मते नाही. कितीही सुख, समाधान, ऐश्वर्य लाभलं तरी माणसं माणसंच.