Skip to main content

मासे १५) बला

लेखक जागु
Published on शनीवार, 30/10/2010
बला म्हणजे वाकटीचाच मोठा प्रकार. म्हणजे सिनियर वाकटी म्हणा हव तर. हा बला २ फुटा पेक्षा मोठाही असतो. बल्याचे कालवण चांगले लागत नाही. तो तळूनच चांगला लागतो. साहित्य : बला (१ बला भरपुर होतो) हिंग हळद मिठ मसाला लसुण पाकळ्या ठेचुन तेल कृती : प्रथम बल्याचा किनारीचा पिसारा ओढून काढायचा. मग त्याचे डोके व शेपुट काढुन तुकडे करायचे व स्वच्छ धुवायचे. धुतलेल्या तुकड्यांना मिठ, मसाला, हिंग, हळद चोळून घ्यायचे. तव्यावर तेल सोडून त्यात ठेचलेल्या लसूण पाकळ्या सोडून तुकड्या तळण्यासाठी टाकायच्या.

नारायणरावांची पुण्याई!, नितिन देसाईला शुभेच्छा..

Published on शनीवार, 30/10/2010
राम राम मंडळी, आमचं दैवत असलेले, मराठी संगीत रंगभूमीचे सम्राट नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांच्या जीवनावर प्रसिद्ध कला-दिग्दर्शक नितिन देसाई हे चित्रपट निर्मिती करत आहेत. ही अत्यंत मोलाची कामगिरी ते करत आहेत, त्याकरता त्यांचं अभिनंदन व चित्रपटाकरता अनेकानेक शुभेच्छा.. आज हिंदी रजतपटाच्या दुनियेत नितिन देसाईंनी कला-दिग्दर्शक म्हणून आपल्या उत्कृष्ट कामाचा जो ठसा उमटवला आहे त्याचा कुठल्याही मराठी माणसाला अभिमानच वाटावा..

मोरावळा-----

Published on शनीवार, 30/10/2010
साहित्य:- दहा-पंधरा चांगले मोठे आवळे, एक किलो साखर, पाकासाठी थोडेसे पाणी. कॄती :- आवळे स्वच्छ धुवुन घ्या, एका पातेल्यात पाणी घालून त्यावर चाळण ठेवा, त्यात आवळे घाला, दहा मिनिटे वाफ़वून घ्या. जरा गार झाल्यावर त्यातील बिया काढून टाका, व त्याच्या पाकळ्या सुट्ट्या करा. आता त्या मोजा किती वाट्या आहेत फ़ोडी, त्याच्या दुप्पट साखर घेउन त्यात थोडेसे पाणी घालून पाक करण्य़ास ठेवा, चांगले बुडबुडे येइपर्यंत पाक होवु द्यात,

"आदर्श" सोसायटी.

लेखक मितभाषी
Published on शनीवार, 30/10/2010
लष्करी अधिकाऱ्यांनी बेकायदा बांधलेल्या आदर्श सोसायटीत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सासूबाईंचा फ्लॅट असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. चव्हाण यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी हा महिती प्रसिद्धी माध्यमांना दिल्याचे समजते. भगवती मनोहरलाल शर्मा या चव्हाण यांच्या सासूबाई आहेत. तसेच यातील १०३ क्रमांकाचा फ्लॅट एस. बी. चव्हाण या नावाने असून मुख्यमंत्र्यांच्या वडिलांचे नाव शंकरराव भाऊराव चव्हाण असल्याने मुख्यमंत्र्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असल्याचं दिसून येत असल्याची चर्चा आहे. कारगिल युद्धात शहीद झालेल्यांच्या पत्नींना घरे देण्यासाठी हा भूखंड लष्करी अधिकाऱ्यांनी मिळवला.

शाळेतल्या गमतीजमती

लेखक रमणरमा
Published on शनीवार, 30/10/2010
फिश् पॉंड ( जमल एकदाच ) आम्ही लहान असताना शाळेत दोन मुलांच्या मधे एक मुलगी किंवा उलटे ( उलटे म्हणजे तसे उलटे नाही हो वाइस वर्सा सारखे उलटे ) बसवायचे. कधी कधी मज्जा यायची पण कधी कधी जेव्हा शेजारचा मुलगा मूलीना हेट करणारा असायचा तेव्हा चांगली जुन्पय्चि. मग बदला घ्यायला एकमेकाना द्वेष पत्रे ( इकडे खरडी पाठवतात म्हणे ) पाठवायचो. ज्या वयात प्रेम पत्रे पाठवायची त्या वयात आम्ही जास्तीत जास्त त्रास कसा देता येईल हे बघायचो. प्रेम पत्रे पाठवणारे नग सुद्धा होते पण त्यांच्या बद्दल नंतर कधी तरी. त्यातून मग दुसर्‍याचा अगदी कमित कमी शब्दात अपमान करण्याचे नवे नवे प्रकार शोधले जायचे.

प्रिन्सीची कथा

लेखक रामदास
Published on शुक्रवार, 29/10/2010
प्रिन्सीची कथा एका गुलाबी हिर्‍याचा इतिहास आणि एका गोंडस राजकुमाराची शोकांतिका आहे. या कथेची सुरुवात १९४३ साली मद्रासच्या रेसकोर्सवर झाली. रेसकोर्सवर बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड आणि सितादेवी यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात -लग्नाच्या आणाभाका -शपथा सगळं काही क्रमवार झालं . लाज शरम कुलकी मर्याद वगैरे गुंडाळून ठेवत दोघांनी लग्न करायचं ठरवलं . असं म्हणायचं कारण असं की प्रतापराव विवाहीत होते.

रामरक्षा फक्त महाराष्ट्रातच..?

Published on शुक्रवार, 29/10/2010
रामरक्षा ही केवळ महाराष्ट्रातच म्हटली जाते असा अनुभव आहे.. इतर प्रांतातले लोक ती का म्हणताना दिसत नाहीत? जसे हनुमान चालिसा किंवा रामचरितमानस फक्त उत्तरेकडील लोकंच वाचतात/म्हणतात, तसेच आहे का हे? महाराष्ट्रात मात्र बरेचसे लोक, त्यात बहुत करून आम ब्राह्मण समाज हमखास रामरक्षा म्हणताना आढळतो. ही रामरक्षा अगदी ल्हानपणापासूनच मुलांकडून पाठ करून घेतली जाते असेही निरिक्षण आहे..

माझ्या व्यथे... (गझल)

Published on शुक्रवार, 29/10/2010
परतून सांग तुजला बोलावणार कैसा? नाहीस तू मनाला समजावणार कैसा? पुरते अटून गेले डोळ्यामधून पाणी कल्लोळ भावनांचा मी दावणार कैसा? जहरी तुझ्या स्वरांनी शिवलेस ओठ माझे संवाद अंतरीचा पण थांबणार कैसा? चाहूल पावसाची सुर्या फितूर झाली भेगाळला उन्हाळा ओलावणार कैसा? कंटाळलो कितीही बेरंग जीवनाला आयुष्य तू दिलेले अव्हेरणार कैसा? मी हात लावल्याने कोमेजली बिचारी निष्पाप त्या फुलांना रागावणार कैसा? ना सांगता कधीही येतेस तू समोरी माझ्या व्यथे तुला मी हुलकावणार कैसा? - स्वानंद
काव्यरस

नारायणन कृष्णन

लेखक विकास
Published on शुक्रवार, 29/10/2010
नारायणन कृष्णन या व्य्क्तीबद्दल बर्‍याच जणांनी कदाचीत ऐकलेही असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी थोडक्यात माहिती आणि सीएनएनवर जाऊन त्याला मत देण्याचे आवाहन. डिसक्लेमरः ही माहिती खूप प्रेरणादायी असल्याने देत आहे, तसेच केवळ सीएनएनच्या माहीतीवर आधारीतच देत आहे. जर काही वेगळीच माहिती समजल्यास तशी देखील अवश्य सांगा. मदुराईला रहाणार्‍या नारायणन कृष्णन हा एक पंचतारांकीत हॉटेलात काम करणारा शेफ/आचारी. त्याला परदेशी हॉटेलात जाण्याचा योग आला होता आणि जाणारही होता.