Skip to main content

महालक्ष्म्ये॑ च विद्महे | विष्णुपत्न्ये॑ च धीमहि | तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात ||

लेखक प्रशु
Published on गुरुवार, 04/11/2010
आज लक्ष्मीपुजन, धनसंपत्ती देणार्या लक्ष्मीमातेच्या पुजनाचा दिवस. सागरमंथनातुन जी १४ रत्ने निघाली त्यात लक्ष्मीचा समावेश होतो. हि लक्ष्मी आपल्या जेष्ठ भगीनी जिला 'जेष्टा किंवा अलक्ष्मी असे नाव देण्यात आले आहे, तीच्यासह वा तीच्या नंतर उत्त्पन्न झाली. अलक्ष्मीही काळयातोंडाची, तांबड्या डोळ्याची, रुक्ष व पिंगट केसांची आणि सुरुकतलेल्या देहाची. तर लक्ष्मीही सुंदर, लावण्यवती. लक्ष्मीने विष्णुला वरले. परंतु जेष्ठेच्या आधी कनिष्ठेचा विवाह कसा होईल? म्हणुन आधी तीचा विवाह उद्दालक ऋषीशी करण्यात आला. परंतु ह्या ऋषीनी तीचा त्याग केला. ह्या अलक्ष्मी चा निवास हा कचरा, कोळसा, कलह हा होय.

ती दिवाळी पण दिवाळी होती

Published on गुरुवार, 04/11/2010
ती दिवाळी पण दिवाळी होती तीची माझी पहीलीच नजर भेट होती, मंदीराच्या पाय-या अलगत ती चढत होती पंजनाच्या सहाय्याने सुर ती छेडीत होती, नजरेचे बाण हळूच ती सोडीत होती, सोबतीला हास्याचा फुलबाजा उडवीत होती, आवाज नव्हता,धुर नव्हता ,पण...... रोशनाई भरपुर होती,खरच...... ती दिवाळी पण दिवाळी होती

किल्ला - एक करणे

Published on गुरुवार, 04/11/2010
आमच्या बारावीच्या पुस्तकात एक प्रश्न होता, ''जुन्या खेळाऐवजी नवीन प्रकारचे खेळ आल्याने आपली मानसिक वाढ खुंटली आहे का?'' दर परीक्षेला हा प्रश्न हमखास असायचा आणि सगळेच काही ना काही पुस्तकी उत्तरे द्यायचे याप्रश्नातुन आणि आजच्या जमान्यात दिवाळीची वा उन्हाळी सुट्टी लागली की, काय करावे, करू नये वगैरे याच प्रश्नांची उत्तरे शोधणारे अनेक लेखातुन संगणकीय खेळ त्रासदायकच हेच सत्य शेवटी फिरून फिरून सांगितले जाते. आणि खरे आहे ते ..! पण, निदान दिवाळीच्या सुट्टीत तरी हा प्रश्न मला कधी पडायचाच नाही, का म्हणता? अहो किल्ला ...... आमचा जीव की प्राण .

काव्यफुफाटा

Published on गुरुवार, 04/11/2010
शरदिनी ताईंच्या राज्यात घुसखोरीबद्दल क्षमा मागुन माझी ही कविता दिवाळीभेट म्हणून जालिंदरबाबाच्या चरणी अर्पण. काव्यफुफाटा दुर्धरकविता कंपितचंचल आबालभासी काव्यफुफाटा स्थळसंकेती विद्रुपझेले बधीरकर्णी तव तीव्रफटाका आंतरदैत्य भेसुरनृत्य अन भाळोभाळी अधीरकंटकी गदरपुष्टी हुकुमीकुस्ती शब्दास्त्रांची प्या वृशालवृष्टी झाळीतबुद्धी मार्मिकवृद्धी टपटप भरले डोहउसासे चरितसाधन घायाळचुंबन अर्धकारी ती ललाटभासे उथळनौका खवसागरी केसदुधारी कापुन झाले अशी ही कविता करुन वाचक बिचारे वाचुन मेले. आपलाच, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
काव्यरस

पन्ख नवे गगन नवे

लेखक बद्दु
Published on गुरुवार, 04/11/2010
कोणाकडे श्रेया घोसाल चे नविन ' पन्ख नवे गगन नवे " आहे काय? अल्बम चे नाव आहे San Yeti Ghara CD-1 लिन्क दिल्यास मदत होइल. धन्यवाद.

एका तडीपाराची जबानी

लेखक यकु
Published on गुरुवार, 04/11/2010
ही जाहीर जबानी सुरू करण्याअदुगर सम्पाद्क मंडळाम्होरं काही मुद्दे मांडू इच्चितो. कारन मी ल्हिलेलं त्येंनी पुसून टाकल्यास पब्लिकला ही जबानी वाचाय कशी मिळ्णार? तर क्रपया हे पुसू नै. १. आताचा मी यशवंत एकनाथ म्हणजे पूर्वीचा यशवंतकुलकर्णी; जो त्यानं इथं काही गुन्हे केल्यानं तुमच्या नजरेत सध्या तडीपार हाये. २. आताचा यशवंत एकनाथ हा आयडी दोन वर्सांपूर्वी मला देन्यात आला हुता. काल पात्तुर मी ह्यो कदीच वापरलेला न्हाई कारन तो मला देन्यात आला हाये हेच मला ठावं नव्हतं. तडीपारीच्या काळात जुन्या वह्या चाळताना मला हा आयडी गावला आन तो वापरून मिसळपावच्या दाराला सहज धक्का मारला तर काय! खुल्ललं ना दार!

भ्रष्टाचार हाच शिष्टाचार

Published on गुरुवार, 04/11/2010
आपण पिळवणूकीच्या अर्थकारणात बांधलो गेलो आहोत, तेथून जेव्हा सर्वांची सुटका होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश स्वतंत्र होईल. पिळवणुकीचे अर्थकारण राज्यकर्त्यांपासून सुरु होते. पोलिस, आयकर, अबकारी, कर, सीमाशुल्क आदी विभागात ठराविक जागी बदली होण्यासाठी लाखॊ रूपयांची राज्यकर्त्यांना लाच दिली जाते. जो पोलिस अधिकारी अथवा आयकर आधिकारी एवढा खर्च करतो, त्याला त्याची वसुली करायची असते. त्यातूनच भ्रष्टाचाराचा उगम होतो. समाजाच्या वरच्या मजल्यावरून सुरू झालेला भ्रष्टाचार हळूहळू खाली पसरतो. जेव्हा सामान्य नागरिकांचा सरकारी यंत्रणेशी संबंध येतो तेव्हा प्रत्येक कागदासाठी त्याला किंमत मोजावी लागते.

नयनिती ही बहु प्रेमाला..

लेखक ५० फक्त
Published on गुरुवार, 04/11/2010
मला नयनिति ही बहु प्रेमाला, मज धर्म हा समजावला हे गाणं हवं आहे, क्रुपया मदत करा. माझ्याकडे गाडित स्पिकर वरुन रेकॉर्ड केलेलं आहे पण आत ३ वर्षांनी त्याची क्वालिटी खराब होत आहे. धन्यवाद हर्षद

सावधान!!! पुढे "माहितीचा धोका" आहे!!

Published on गुरुवार, 04/11/2010
आपणा सर्वांच्या सुरक्षिततेसाठी, सरकारच्या निर्देशानुसार आजकाल विविध मोबाईल कंपन्या, सायबर कॅफे आणि इतर अनेक सेवा या प्रत्येक ग्राहका कडे रंगीत छायाचित्र तसेच छायाचित्र असलेले ओळखपत्र (पॅन कार्ड) आणि रहिवासाचा पुरावा असे अनेक कागदपत्रके मागतात. नाहीतर सेवा बंद करुन टाकतात. काही मोबाईल कंपन्यामध्ये तर खात्रीशीर रित्या असे घडते आहे की, तीन वेळा योग्य कागद पत्रके, फोटो जमा करूनही कागद पत्रके अपूर्ण असल्याच्या नावाखाली सेवा बंद क्रण्यात येत आहे. म्हणजेच ही कागदपत्रेके गहाळ होत आहेत. सेंटर मधून ती कंपनीच्या मेन ऑफिसमध्ये पोहोचतच नाहीत नाहीतर पोहोचल्यावरही ते हेतुपूर्वक त्रास देतात?