Skip to main content

श्वास श्वासात...

लेखक गणेशा यांनी सोमवार, 28/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
श्वास श्वासात... कोण कोणात... जीवनाची धावाधाव !! भासांचाच भास... मनाची आरास... पायांचा भ्रमन नाच घातावर मात... लढणारी पात... मरणावर जीवन सरशी अंतरीचा नाद... ह्रदयाची साद... घे आयुष्याची गिरकी !! -- शब्दमेघ

भारत विरुद्ध पाकीस्तान सेमीफायनल प्रिव्हीव

लेखक नि३ यांनी सोमवार, 28/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
भारत विरुद्ध पाकीस्तान क्रिकेट विश्वचषकातील सेमीफायनल आणी तेही भारतात मोहालीमधे मधे..यापेक्षा अधीक तरी एखाद्या क्रिकेट वेड्याला काय पाहीजे वातावरण खुपच तापत चाललय बाहेर गर्मीने आणी करोडो क्रिकेट प्रेमींच्या शरीराच्या आत..ह्या सामन्यामुळे...जसाजसा क्षण जवळ येतोय तशी नुसती जिवाची तगमग वाढत चाललीय... हे आस्ट्रेलीया आणि ईंग्लंड वाले ऊगाचच ashes ला most celebrated rivalry in international cricket म्हणतात ..अरे त्यांना म्हणाव तुमच्या दोन देशांमधे एक तरी युद्ध झाले आहे का??

भारतीय इतिहाससंशोधनाची सुरस कथा

लेखक ईश आपटे यांनी सोमवार, 28/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
थंडीचे दिवस होते.. तुम्हाला माहिती आहेच पुण्यातील थंडी कशी बोचरी असते ते...पण आता जो प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे तो थोडा ह्यापेक्षा ही अधिक बोचरा आहे... माझे प्रेरणास्थान व महान इतिहाससंशोधक व विचारवंत एम.आर.गुप्ता पुणेभेटीला आले होते. मी एम.ए. केल्यापासून मी त्यांचे विचार वाचत आहे...अगदी शास्त्रीय लेखन , भारताच्या इतिहासालेखनाला त्यांनी आपल्या नवीन दृष्टीने वेगळीच कलाटणी दिली... अर्थात तशी कलाटणी गेल्या शंभर वर्षापासूनच मिळाली आहे म्हणा..मॅक्सम्युल्लरने जे एकदा नियम ठरवले...ते आजतागायत अबाधित आहेत..(टिळक त्याला मोक्षमुल्लर म्हणत असत.

समाजाच प्रतिबिंब

लेखक स्वर भायदे यांनी सोमवार, 28/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मी असा मी तसा मी कसा जसा भित्रा ससा मी स्वार्थी हो मी स्वार्थी करतो फक्त तेजाची आरती देश माझा मी नाही देशाचा ना मी माझ्या पेशाचा मी शिख, मी हिंदू मी पारशी झाले सगळेच स्वार्थी

आयुष्य साधेपणे जगत गेला ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 28/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
तो आयुष्य अगदी साधेपणे जगत गेला उगाच खर्च नको म्हणून नुसता काटकसरीने जगला स्वताच्या पोटाला चिमटा घेत ह्याचे त्याचे करीत गेलां मध्यम वर्गातला असा शिक्का स्वताच मारून घेतला शेव-पुरी पाणी पुरी घरीच करून खायचे काटकसर करून करून आयुष्य जगायचे लग्न झाले बायको पण साधी सुधी मिळाली हनिमूनला न जाता घरीच गात बसली डोहाळे डोहाळे लागले फक्त चिंचा खाण्याचे स्वप्न त्याना कधी पडायचे एकादशीचे खरे म्हणजे बर्यापैकी पगार होता त्याचा पगार झाला म्हणजे घरी पेढे आणायचा देवापुढे ठेऊन घरी प्रसाद वाटायचा कधीतरी चार आण्याचा गजरा आणायचा नवरा मात्र उदार असे वाटून ती सुखावून जायची चालण्यासा
काव्यरस

भाकीत

लेखक दीपा माने यांनी रविवार, 27/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
का असा लोपला हा चंद्र मेघडंबरी का शांत झाल्या अवखळ लाटा किनारी कुठे मंद पवन हळू गुप्त झाला का फुले पानाशी धरतात हा अबोला? दूर देऊळाची समाधी जणु लागलेली तिची शांतता पसरली ही आसमंती की भाकीतसे ह्या नीरव नीरव वेळी कालमानाचे गणित ते चंद्र्मौळी!