Skip to main content

डायलॉग इन द डार्क

लेखक सहज यांनी रविवार, 10/04/2011 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
असे काय करतोस/तेस, दिसत नाही का? आंधळा/ळी आहेस का? असे बोल आपण इतरांना बोललो असु किंवा ऐकून घेतले असतील. नुकतेच 'डायलॉग इन द डार्क' ह्या प्रदर्शनाबद्दल एका परिचितांकडून कळले. त्यांचा अनुभव रोचक वाटला. त्यामुळे आपणही हे प्रदर्शन 'बघून' नव्हे अनुभवुन यावे असे ठरवले होते. ह्या प्रदर्शनाबद्दल थोडक्यात म्हणायचे तर 'अंधांच्या विश्वाची झलक' ह्या तीन शब्दात वर्णन करता येईल. बरेचदा आपण प्रदर्शन 'पहायला' जातो पण इथे संपूर्ण अंधार असल्याने आपले डोळे काहीच कामाचे नसतात. डायलॉग इन द डार्क हे प्रदर्शन डॉ.

गंध कुणाचा!

लेखक नीधप यांनी रविवार, 10/04/2011 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
जुनाच लेख परत एकदा... ------------------------------------------------------------ वोल्वो बसेस चा प्रवास आणि सुगंधाचे भयानक नाते असते. यालाच 'भीषॉन शुंदॉर' म्हणत असावेत. नीता, मेट्रोलिंक, खुराणा, फलाणा, धमकाना... अशी या बसेस ची नावे असतात. गाडी पुण्याहून मुंबईस वा मुंबईहून पुण्यास नेतात. शेवटच्या स्टॉपवर शेवटचा माणूस उतरत असतानाच परतीचा पहिला माणूस आत चढून बसतो आणि मग पुढच्या ६ ते ७ तासांसाठी तो त्या 'भीषॉन शुंदॉर' ला सामोरा जातो. गाडीतली हवा तशीच आतल्याआत फिरत रहाते, कधीच बाहेर पडत नाही. मग त्यावर उपाय म्हणून किन्नर (आ एड्या!! किन्नर काय बोलतो.. आपन काय टरकवाले हे का? वोल्वो हे वोल्वो..

वाच वाचुनी अति मी दमले -

लेखक विदेश यांनी रविवार, 10/04/2011 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : नाच नाचुनी अति मी दमले -) वाच वाचुनी अति मी दमले - विटले रे कवितेला ! कविता-लेखन तुज न झेपले , निमुटपणा ना कसला ! आजच कचरा-कुंडी-स्थानी सफाईवाला आला ! निरुपयोगी कविता-कागद रद्दी घातली त्याला ! विषय आज ना काही सुचेना , अती ताप तो झाला ! अजब तुझ्या त्या छंदापायी , सुसंवाद ना घडला ! रोख मानधन... नाही काही - मजवर राग का धरला ? स्वत: दुजांच्या घेता फिरक्या - अंगलटी त्या आल्या ! कवितेतील मज काव्य कळेना... कागद वाया गेला ! अंधारी ही डोळ्या पुढती - जीव वाचना भ्याला !!

उमलू द्या कळ्यांना : लहान मुलांचे शोषण, माहिती, खबरदारी व कायदा

लेखक अरुंधती यांनी रविवार, 10/04/2011 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
''मुले म्हणजे देवाघरची फुले'' या उक्तीला लाजिरवाणी, न साजेशी अपकृत्ये जेव्हा भोवतालच्या समाजात घडून येताना आढळतात तेव्हा मुलांचे बालपण त्यांच्यापासून हिरावून घेणार्‍या, त्यांना कुस्करणार्‍या कुप्रवृत्तींचा राग आल्यावाचून राहवत नाही. परंतु कौटुंबिक किंवा सामाजिक पातळीवर हे विषय उघडपणे मांडणे हेही अनेकदा निषिध्द मानले जाते. अतिशय गंभीर अशा ह्या विषयावर घरात किंवा घराबाहेरही चर्चाविचार करण्यास लोक अनुत्सुक दिसतात. ''माझा काय संबंध?'' ह्या प्रवृत्तीपासून ते ''असले विषय दूर राहिलेलेच बरे'' इथपर्यंत असलेली सामाजिक उदासीनता कायदा व सुव्यवस्थेला आणि समाजाला घातकच ठरते.

आज ही गेले

लेखक निनाव यांनी रविवार, 10/04/2011 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
आज ही गेले काल मधे जमा झाले आठवणींच्या पेटित असे बंद झाले!! न आठवलो मी कुणास आजही न कुणी मज आज भेटीस आले!! बघून आभाळ खिडकी तुन म्हणतो मी चला दिवस अजुन एक कमी झाले!! अनवाणी चालतांना टोचले जर पायी अजुन एक घाव, नवीन काय झाले!! कुणी ठेवले नाव मज, तिच्या नावानं नाव असे झालेच, तर निनाव काय झाले!! आज ही गेले काल मधे जमा झाले आठवणींच्या पेटित असे बंद झाले!!

श्री. सुधीर काळे यांचे अभीनंदन

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 10/04/2011 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांचा झेंडा पुन्हा एकदा प्रिंट मिडीयावर लागला. सुधीर काळे मिपावर जागतीक घडामोडींचा आढावा नेहमीच घेत असतात. त्यांचा "मित्रराष्ट्र म्हणून कशी आहे अमेरिका"" हा लेख दि.३ एप्रीलच्या सकाळच्या "सप्तरंग" पुरवणीत छापुन आला आहे. तो लेख येथे वाचा.

संकल्प सिद्धी

लेखक बाळासाहेब तानवडे यांनी शनिवार, 09/04/2011 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
संकल्प सिद्धी मिळेल जीवनात खात्रीने जय. पहिलं पक्क असावं अंतिम ध्येय. स्वप्नरंजनातच न व्हावं चकित. कागदावर ध्येयाच होऊ दे लिखित. नवी कल्पना नित्य लिखितात भरु दे. अंतिम ध्येयाला परिपूर्णत्व येऊ दे. सार्याय कल्पनांची आता योजना बनु दे. प्राथमिकता महत्ते अनुक्रम ठरू दे. नुसत्या ध्येयाला ना आरंभ ना शेवट. पूर्णत्वाची समय सीमा असावी चिवट. आता ना कशाची वाट पहावी. तत्काळ कार्याला सुरुवात करावी. एक ही दिन ना व्यर्थ असावा. अंतिम ध्येय प्राप्तीतच अर्थ दिसावा. लिखित ध्येयाच महत्व सर्वास कळावं. मनाजोग यश सर्वास मिळावं. कवी : बाळासाहेब तानवडे © बाळासाहेब तानवडे – ०४/०४/२०११
काव्यरस

रिकामा देव्हारा

लेखक शरद यांनी शनिवार, 09/04/2011 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
याच देव्हार्‍यात होता .... याच देव्हार्‍यात होता देव आमुचा आधार आता रिकामा देव्हारा तरी माझा नमस्कार. नमस्कारास वाकता क्षणी घडे चमत्कार वीणा लागली वाजाया झाला टाळांचा गजर. समईत जळू लागे प्राण होऊनिया ज्योत आणि उजळले विश्व काळ राहिला तेवत. कसे मला आता दिसे माझे वेगळे शरीर रिकाम्या देव्हार्‍याला पुन्हा माझा नमस्कार. शंकर वैद्य श्री. वैद्यांचा चमत्कार काय तो पाहण्याआधी थोडी अवांतर माहिती देतो. शंकराचार्य आणि ज्ञानेश्वर माऊली दोघेही अद्वैती. दोघांनी गीतेवर टीका लिहल्या. दोघांच्या मतात साम्य दिसल्याने डॉ.

चित्रपटसृष्टीतील मधुर आणि अवीट गाणी.

लेखक कलंत्री यांनी शनिवार, 09/04/2011 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
भारताची चित्रपटसृष्टी हे न समजणारे आणि त्याचबरोबर हवेहवेसे वाटणारे गारुड आहे. भारताच्या या मयसभेवर सर्वच भारतीयांचे मनापासून प्रेम असते आणि त्याचबरोबर आपल्या भावविश्वात यातील अनेक गोष्टींना मनापासून स्थान असते. याच मयसभेतील एक दालन म्हणजे यातील असणारी गाणी आणि त्या गाण्यावर नाचणारी पावले, त्यातील नृत्यांगणा आणि नर्तक. संध्याकाळी घरी थकून भागुन आल्यानंतर युट्युब वर गाणी ऐकणे आणि पाहणे हा खरोखरच आनंदाचा न संपणारा खजिना आहे. मला आवडलेली काही गाणी. १. लागा चुणरीमै दाग मै मिटाऊ कैसे? २. ओठोपै बात मै दबाके चली आई ३. दिलके झरोको मै तुझको बिठाकर. ४. पियातु अब तो आजा. ५.