Skip to main content

शिवाजी समजून घेताना

लेखक अनुस्वार यांनी शनिवार, 19/02/2022 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
(वाचन वेळ - ४ मिनिटे) इसवी सन सतरावे शतक. स्थळ महाराष्ट्र. या राज्यात माणसे जन्म घेत होती, गुलाम म्हणून जगत होती आणि जनावरांसारखी दुर्लक्षित मरत होती. परंतु नियतीला आपले सामर्थ्य दाखवायचा मोह झाला आणि १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी श्रीमंत शहाजीराजे भोसले आणि जिजाबाई यांच्या पोटी शिवाजीचा जन्म झाला. काय म्हणालात? छत्रपती शिवाजी म्हणू? नाही. जन्माला आले ते बाळ केवळ शिवाजी होते.

जहाजांचा मेळावा

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 19/02/2022 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी प्रबळ आरमाराची उभारणी केली. स्वत:ची प्रबळ आरमारीशक्ती असलेले आधुनिक भारताच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना ‘भारतीय नौदलाचे जनक’ म्हटले जाते. योगायोगाने यंदाच्या शिवजयंतीनंतर लगेचच भारताचे राष्ट्रपती येत्या 21 फेब्रुवारी 2022 ला विशाखापट्टणम येथे भारताच्या नाविकशक्तीचे अवलोकन करत आहेत. आपल्या नाविक इतिहासाची आणि परंपरांची माहिती करून देतानाच नौदलाच्या शक्तीची झलक दाखवणारा ‘राष्ट्रपतींचे ताफा निरीक्षण’ (Presidential Fleet Review) हा समारंभ. तो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असतो.

जहाजांचा मेळावा

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 19/02/2022 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी प्रबळ आरमाराची उभारणी केली. स्वत:ची प्रबळ आरमारीशक्ती असलेले आधुनिक भारताच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना ‘भारतीय नौदलाचे जनक’ म्हटले जाते. योगायोगाने यंदाच्या शिवजयंतीनंतर लगेचच भारताचे राष्ट्रपती येत्या 21 फेब्रुवारी 2022 ला विशाखापट्टणम येथे भारताच्या नाविकशक्तीचे अवलोकन करत आहेत. आपल्या नाविक इतिहासाची आणि परंपरांची माहिती करून देतानाच नौदलाच्या शक्तीची झलक दाखवणारा ‘राष्ट्रपतींचे ताफा निरीक्षण’ (Presidential Fleet Review) हा समारंभ. तो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असतो.

नवकवी आणि आचार्य अत्रे

लेखक सागरसाथी यांनी शुक्रवार, 18/02/2022 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
१९२९ साली 'पहिले कविसंमेलन' भारत इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात भरले होते. या कविसंमेलनाचे आचार्य अत्रे स्वागताध्यक्ष होते त्यांनी तिथे केलेले भाषण हे भविष्याचा किती वेध घेणारे होते हे त्याचा सारांश वाचल्यावर लक्षात येईलच. त्यांच्या भाषणाचा सारांश त्यांच्या शब्दात....... "तशाच या सणासुदीच्या कविता. चंद्राला गिऱ्हाण लागले म्हणजे दान मागण्यासाठी जशी काही लोकांची धांदल उडते, तसे एखादा सण आला म्हणजे आमचे कवी लोक सैरावैरा धावू लागतात. संक्रांत आली की यांचा शिमगा सुरू झालाच. दसरा आला की हे घोड्यावर बसून शिलंगणाला निघालेच.

तुझ्याचमुळे

लेखक सागरसाथी यांनी शुक्रवार, 18/02/2022 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
सारे तुझेच होते, सारे तुझेच आहे तू आहेस म्हणून स्वप्नांचे येणे-जाणे आहे. शब्द तुझेच होते भाव तुझेच आहेत तुझ्या मुळे इथे कवितेचे व्यक्त होणे आहे. गीत तुझेच होते सूर तुझेच आहेत तुझ्याच मुळे आयुष्यात संगीताचे लेणे आहे. रुप तुझे होते रंग तुझेच आहेत तुझ्याच मुळे सदा रंगपंचमी आहे.
काव्यरस

शब्दचित्र

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 17/02/2022 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
संपले का रंग सारे का कुंचले मोडले दोन रंगात सारे विश्व का रे रेखले नीळा सावळया निर्झराचा रंग कोठे लपवीला काय ठावे तुझ्या मानसी शुभ्र धवल का रे भावला अंथरुन कालीन धवल लपवले रंग सारे उजळून विश्व सारे दीप तेज मंदावले नील गगन ,धवल तारे वाहती उष्ण वारे शोषून धवल रंग हळूच फुटती धुमारे येता ऋतुराज यौवनाचा उघडेल मूठ त्याची आशा हीच उद्याची उधळून रंग सारे उमटतील चित्रं नव पल्लवांची

रिमझिमत्या धारातून आलीस.

लेखक Deepak Pawar यांनी गुरुवार, 17/02/2022 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
रिमझिमत्या धारातून आलीस होऊनिया चिंब मला वाटले फुलावरती जणू जलाचे थेंब. मातीस स्पर्शती धारा गंधात नाहते धरा तुझ्या तनुचा तसा दाटला, मनात मृदगंध. पापण्या मिटून दूर लाजून जाहली चूर थरथरत्या ओठावर देशी तू दातांचा दाब. दाटले मनी काहूर डोळ्यात साठला पूर उगा बावरी होऊ नको, का घाबरशी सांग?
काव्यरस