Skip to main content

मोर्गे सेहर - हे बुलबुलांनो उठा !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 17/09/2011 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
हा फोटो टाकला आणि खालचे लिहिले ! या दोन्हीचा संबंध आहे का ? माझ्या मनात निश्चितच आहे. का कोणास ठाऊक बुलबुल बघितला की मला हे गाणे आठवते. अर्थात मला ते अत्यंत आवडतेही. या कवितेतला भाव या गाण्यात आणि त्याच्या संगितात इतका भव्यपणे उतरला आहे की बस ! मोर्गे सेहर-एक लोकप्रिय इराणी गाणे. त्यांचे स्वातंत्र्यगीत !

लता मंगेशकर यांचे एक विस्मयजनक विधान

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 17/09/2011 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रसिद्ध छायाचित्रकार कै.गौतम राजाध्यक्ष यांच्या एका चित्रग्रंथ- प्रकाशनाबद्दलच्या या बातमीत खालील मजकूर दिलेला आहे: ....लतादीदींनी राजाध्यक्षांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. मला छायाचित्रे काढण्याचा छंद होता. तेव्हा आपल्यासारखी छायाचित्रे कोणास काढता येत नाही, असा माझा समज होता. पण, राजाध्यक्ष यांनी काढलेली छायाचित्रे पाहून माझा चेहरा पडला आणि त्यानंतर पुढे मी छायाचित्रणासाठी कॅमेरा बाहेर काढलाच नाही, असे मनोगत व्यक्त केले .... लतादीदींचे हे विधान मलातरी फार विस्मयजनक व बुचकळ्यात पाडणारे वाटते. ...

दोडक्याच्या शिरांची चटणी.

लेखक ज्योति प्रकाश यांनी शनिवार, 17/09/2011 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य:-दोडक्याच्या शिरा. थोडे शेंगदाणे थोडे खवलेले खोबरे. कोथिंबीर. मिठ. चवीपुरता साखर. लिंबाचा रस. हिरवी मिरची.(ऐपतीप्रमाणे) एक चमचा तेल. कृती :-प्रथम पॅनमध्ये तेल घेऊन त्यावर शेंगदाणे घालून चांगले परतावे.

हरकारियाचा दृष्टांत

लेखक सूड यांनी शनिवार, 17/09/2011 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
श्रोतेहो ही कथा ऐकावी । जी विक्रमा वेताळ ऐकवी। मी मूढ कीं कवि । यथामतिं वर्णिलीसे॥१॥ कथेचा राया विक्रमादित्य नायक। फिरें स्मशाने अनेकानेक। पकडूनि चेडेचेटूक। दंड त्यांसि करितसे॥२॥ उगवली अवसेचि रात। विक्रम झाला मार्गस्थ। मार्गी सापडले एक प्रेत। अग्नी द्यावया निघांला॥३॥ तंव तेथे झाला चमत्कार। प्रेती वेताळ करीं संचार। म्हणे मी आता करितो तुज ठार। आलास येथे कासयासीं॥४॥ विक्रम म्हणे तें सोपें नसे। गाठ तुझी मजसंगे पडलीसें। बघ आता तुझे हाल कैसे। करितो आता मी॥५॥ तंव वेताळ झाला सावध। भलत्या प्राण्याची पारध। करावया आलो मी मंद। समजले त्यालागी॥६॥ तो चतुरपणे बोले। यावरी एक उत्तर सापडलें। तें ऐक ऐक वहिलें। मग

गाडी कोणती घ्यावी

लेखक चिप्लुन्कर यांनी शनिवार, 17/09/2011 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मी गाडी घेण्याचा विचार करत आहे. ठाण्यात माझ्या कडे यामाहा एस झेड हि गाडी आहे पण तिची उंची थोडी जास्तच असल्या मुळे मी ती गाडी विकून दुसरी घेण्याचे ठरवले आहे. सध्या मी हिरो होंडा सिडी डिलक्स किंवा बजाज एव्हेन्जर घेण्याचा विचार करत आहे. या दोन्ही गाड्या दोन वेगळ्या प्रकारच्या आहेत तरी मला या दोन्ही गाड्या आवडतात पण यातली नक्की कोणती घेऊ असा प्रश्ना सध्या माझ्या पुढे आहे. तरी या बद्दल काही मदत किंवा सल्ले मिळाले तर बरे होईल . आपला चिपळूण कर.

राजकीय भ्रष्टाचाराची माता?

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 17/09/2011 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
एस.एल.भैरप्पा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर नावाजले गेलेले अग्रगण्य कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ. त्यांच्या आत्मचरित्राच्या "माझं नाव भैरप्पा" या मराठी अनुवादात दोन उतारे वाचण्यात आले. एका उतार्‍यात त्यांनी दिल्लीला असताना तिथली परिस्थिती पाहून तयार झालेले मत प्रकट केले आहे.

माझी फुलबाग

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/09/2011 04:32 या दिवशी प्रकाशित केले.
माझी फुलबाग
किती हौसेने फुलझाडे लाविली पाणी देवून वाढवली जपली काही कळ्या आल्या मुक्या तर काही रंगीत फुले उमलली || परीसरात माझी फुलबाग एकटी नव्हती तसली दुसर्‍या कुणाची शोभेचे लावली तरूवर तेथे काही झाडांना लपेटल्या वेली || अपेक्षीले न मी जरी काही निसर्गाने तिला साथ दिली कोंब तरारून आले वरती अनेक कुसूमे भरभरून आली || येता जाता सारे बघती कष्टाचे कुणी कौतूक करती आनंदाचा ठेवा हा अनमोल परी नव्हता तयांच्यासाठी || अशीच एकदा वेळ ती आली नजर फुलांवर पडली काळी दृष्ट काढली त्याच फुलांची पण हाय!
काव्यरस

(रमी)

लेखक पिवळा डांबिस यांनी शनिवार, 17/09/2011 03:47 या दिवशी प्रकाशित केले.
यासाठी वापरलेला कच्चा माल पत्तेजुडग्याच्या मंथनातून १३ रत्ने बाहेर आली. एक्का, तिर्री, दश्शी, गुलाम राजा वगैरे वगैरे. पण कुशल खेळाडूला रमी ही जमवावी लागते. ती रमी प्रकट झाल्यावर पत्ते उघड करण्याआधीच्या काही क्षणांवर ही लहान कविता आहे. त्रयोदश गुणी एक्का; नव्व्या, राजा ही लाभला असीमकौशल्ये प्रकटे रमी एकवर्णा, एकवंशा, क्वचित विदूषकस्पर्शा पाठराखीण जिची लक्ष्मी अवघड होणे ही जरा, तरी मालक मी अनुरूप तिजला लक्ष्मी ही जिची पाठराखीण आहे अशी ही स्वतः अतिशय चंचल रमी शेवटी तिच्या कर्त्याच्या चरणी लीन झाली. :)
काव्यरस

प्रवास

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/09/2011 01:32 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास
दुर पुढे जातांना सरलेली मागची वाट नजरेच्या आवाक्यात येते. किती चालायचे अजून बाकी याची आठवण होते. पायात रूतलेले काटे, दगड लागणारा पाऊस वारा उन प्रवासातला होणारा त्रास निब्बर करतं त्वचा अन मन तसल्या बेभरवशाच्या त्रासदायक प्रवासातही एखादी वार्‍याची झुळूक, एखादी गवती हिरवा जमीन मनाला सुखावते. तेथे थांबावस वाटतं पण थांबता येत नाही कारण वाट संपलेली नसते त्यामुळे चालावंच लागत. - पाषाणभेद (दगडफोड्या) १७/०९/२०११
काव्यरस