Skip to main content

मिपाकरांना मदतीचे आवाहन!

लेखक अनामिका यांनी मंगळवार, 18/10/2011 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाकरांना सस्नेह जय महाराष्ट्र! तुंम्हास एक आवाहन करण्यासाठी हा पत्र प्रपंच्.ठाण्यातील शिवाईनगर भागात राहणारा आमच्या शाळेतील २००६-०७ ला दहावी पास झालेला, एक अत्यंत हुशार मुलगा समीर पितळे (जो विज्ञान विषयात होमीबाबापर्यंत जाउन आला होता) यास दि.५/१०/२०११ रोजी रेमंड, समतानगर येथे बाइकवरुन जात असताना मागुन वाहनाने धडक दिल्याने मोठा अपघात झाला, ज्यात बाजुने जाणारा ट्रक त्याच्या हातावरुन गेल्याने हात जबर जखमी झाला आहे (कदाचित हात गमवण्याची शक्यता आहे) ज्युपिटरमधे ऑपरेशनसाठी मोठा खर्च येत आहे. त्याची २लाखाची मेडीक्लेम पोलिसी आहे, परंतु आता पर्यंत रु.४.५० लाख इतका खर्च झाला असुन साधारण १०-१२ लाख रुपयांची अजुन आवश्यकता आहे...त्याच्या वर्गातील मुलांनी रु.२०,५०० जमवले आहेत, सध्या तो शिकत असलेल्या केळकर महाविद्यालयात देखील मदत निधी गोळा केला जात आहे..... माजी विद्यार्थ्यातर्फे समाजसेवी संस्था तसेच निरनिराळ्या पक्षांच्या सर्व नगरसेवक, आमदार, खासदारांकडुन मदत मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, सिद्धीविनायक ट्रस्ट दादर आणि साईबाबा संस्थान वर्तकनगर येथुन सुद्धा मदतीचे प्रयत्न माजी विदयार्थी करत आहेत. सदर मुलास आपल्याकडून काहि आर्थिक मदत होऊ शकेल का?.मुलगा अत्यंत हुशार व अभ्यासू आहे आणि आईवडिलांच एकुलते एक अपत्य आहे......सध्या जुपिटर मधे उपचार सुरु आहेत पण वेळीच उपाय न झाल्यास हात गमावण्याचा धोका संभवतो..निधी अभावी त्याच्या उपचारात खंड पडल्यास त्याच्या भावी आयुष्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.......आपण सगळेच मिपा सदस्य कायम सकारात्मक उद्देश बाळगून येथे लिखाण करत असतोच्...समाजाप्रती असलेली आपल्या सगळ्यांची बांधिलकी वेळोवेळी लिखाणातून अधोरेखित होत असतेच्....सदरहू गरजू मुलास आर्थिक मदत मिळवून देण्यात आपले सर्व मिपासदस्य नक्कीच मदत करतीत या भावनेतून इथे लिहिण्याचे धाडस केले आहे....आपणा सर्वांस विनंती करण्याच्या हेतूने हे लिहिते आहे...शक्य झाल्यास नक्की मदत करावीत हि कळकळीची विनंती..... आपणास सदर व्यक्तीबद्दल खातरजमा करावयाची असल्यास जुपिटर हॉस्पिटल ठाणे येथे करु शकता.. आपल्याकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे... जय हिंद जय महाराष्ट्र मदत निधीसाठी संपर्क क्रमांक सचिन ९८९२२५४४६६ (१९९५-९६) अमोल ९७६६६३००९० (२०००-०१) प्रतिक ९८७०९०३५६६ (२००६-०७) आदित्य ९००४०२७१११ (२००६-०७) आशिष ८६५२५०८५१५ (२००६-०७) आपणास येउन पैसे दयायला, वेळ नसल्यास पैसे आपल्या घरुन देखिल गोळा करता येतील

मूळ धाग्याचे संपादन कसे करावे?

लेखक विनीत संखे यांनी मंगळवार, 18/10/2011 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
या आधी मी धागे संपादित करू शकलो आहे. पण नुकताच काढलेला हा धागा मला संपादित करता येत नाहीये. धाग्याखाली किंवा वर संपादनाची लिंक मिळत नाही. कुणी मदत करेल का?

एक नवा उपक्रम - पत्राला उत्तर हवंय

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 18/10/2011 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस झाले कुणाला पत्रंच लिहायचा प्रश्नच आला नाही, आणि मला ही बँक स्टेटमेंट सोडुन इतर कुणाची पत्रंच आली नाहीत. सध्या वेळ पण बराच आहे, म्हणुन विचार केला पत्रं लिहायला सुरु करावं.

धर्माच्या अड्ड्यात निधर्मी देश

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 18/10/2011 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
या कवितेची प्रेरणा---प्रकाश१११ यांची निधर्मी देशात..!! ही कविता,हे उघड आहे.पण तरीही दोन्ही मध्ये एक मूलभूत फरकही आहे.
काव्यरस

(हा कोणत्या दिशेला आहे प्रयास अजुनी)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 17/10/2011 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रासस्टांझाज ने केलेली गजल आम्हाला आवडली त्यावर आमची ही दाद ;) हलकेच मलम लावू, किति या बुडास अजुनी? हा कोणत्या दिशेला आहे प्रयास अजुनी? ही प्यांट फाटली अन्, तुटल्या जरी वहाणा 'क्षितिजा' दिसे बरी हा, भलताच ध्यास अजुनी? 'ज्योती' लगेच पटवू, ही वल्गना कशाला? वणवा उठेल कानी, 'नियती'स आस अजुनी! उद्दाम कन्यका या काका म्हणोत मजला उत्स्फूर्त खोकल्याची लपवीत ढास अजुनी! ही स्यांडले खुणेची नेती मला घराशी! होतो मुशाफिरीचा 'रंग्या'स भास अजुनी! (इतरत्र पूर्वचाचणीसिद्ध)
काव्यरस

ग्रहण-४

लेखक स्पा यांनी सोमवार, 17/10/2011 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रहण-१ ग्रहण-२ ग्रहण-३ मला आता घरच्यांपासून काहीही लपवायचं नव्हत. नाश्त्याला बसलेले असताना.. मी सर्व हकीकत सांगून टाकली उर्मिलाचा चेहरा. भयाने पांढरा फाटक पडलेला .. आई पण हादरलेली.. बाबांच्या कपाळावर आठ्या पडलेल्या.. मग कोणीच काही बोललं नाही. मग बाबाच म्हणाले, काल भाटे सांगत होते..

तेल गेले, तुपही गेले

लेखक चिंतामणी यांनी सोमवार, 17/10/2011 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी ३६२५ मतांनी विजय झाला आहे. तापकीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार हर्षदा वांजळे यांचा पराभव केला. तापकीर यांना ५७,१७५ आणि वांजळे य़ांनी ५३,२२० मते मिळाली. अनेक दिवस म.न.से.ला झुलवत अखेर वाजत गाजत राष्ट्रवादीवासी झालेल्या श्री. हर्षदा वांनळे याना लोकाची सहानभुती मिळेल असे वाटत असणा-यांचा मुखभंग झाला. या पराभवची कारणे काय काय असावीत?????????

दिपोटी यांच्या कोड्याशी संलग्न नवं कोडं.

लेखक विनीत संखे यांनी सोमवार, 17/10/2011 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
दिपोटी यांच्या ह्या कोड्याशी संलग्न एक नवं कोडं... एकदा वसिष्ठ ऋषींना निबीड आवर्तारण्यात जाऊन महान आत्मविशुद्धी यज्ञ करायचा असल्याने आपल्या शिष्यांपैकी काही शिष्यवर्य निवडायचे होते. पण हा यज्ञ बराच कठीण असल्याने हुशार, प्रामाणिक, निष्ठावान, साहसी आणि सर्व शास्त्रांचा यथोचित अभ्यास केलेले काहीच शिष्यच त्यांना निवडायचे होते. आपल्या सर्व शिष्यांमध्ये ती क्षमता असल्याचे वसिष्ठांना ठाऊक होते म्हणूनच त्यांनी आपल्या शिष्यांची परीक्षा घ्यावयाचे ठरवले.