डिस्क्लेमर : विनोद वाचून सोडून द्यावा. कुणीही भावना दुखावून घेउ नये.
आटपाट नगर होतं तिथं चार भाउ आपल्या आई वडिलांबरोबर सुखाने राहत होते. होत्याचं न्हवतं झाल. वडिलांच निधन झाल. वडिलांकडे होत्या दोन गायी ..... भाउ चार.... बहुत नाइंन्साफी..... प्रकरण पेटलं.. सरकारात गेलं.. सरकारी निवाडा दिला - मोठ्या भावाला एक गाय .. उरलेल्या तिन भावांना मिळून .. एक गाय. सगळ्यांनी गुण्या गोविंदानि रहावं !...............
(नारायण ... नारायण....वरतुन मुनी सारं पहात होते.... अजब हा न्याय ? नारायण ... नारायण... ही काय न्यायाची रीति ? नारायण ... नारायण... उठा मालक ऊठा ...नारायण ... नारायण...
"""" सारख उठा ऊठा करू नको रे । मला आवडत नाही तो शब्द । """"
नारायण ... नारायण... ह्यापेक्षा कलियुग परवडले म्हणायचे... सरकारी निर्णय आवडला नाही तर सरकार बदलायचं स्वातंत्र्य आहे तिथे... वेगवेगळे पक्ष .. त्यांची वेगवेगळी विचारसरणी .... आइकलं का महाराज ?
""''''' कटकट पुरे । मुद्द्यावर ये । """"
नारायण ... नारायण... आमुचा तिन्ही लोकी तिन्ही काळी संचार.... नारायण ... नारायण... थांबा.. थांबा... कलियुगातल्या भारतवर्षात्ल्या प्रत्येक पक्षाने हा गायींचा निवाडा कसा केला असता... ते ऐकवतोच तुम्हाला .... )