Skip to main content

"टिम अण्णा"ने दिले दिग्वीजयसींगना सडेतोड उत्तर

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 25/12/2011 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
दिग्वीजयसींगनी Twitterवर अण्णांबद्दल म्हणले होते की "अण्णा मा. नानाजी देशमुख यांचे सचीव होते". त्याचवेळी २७ डिसेंबरपासुन होणा-या उपोषणाची खिल्लीसुद्धा उडवली. याला किरण बेदी यांनी Twitterवर दिग्विजय सिंह आणि नानाजी देशमुख यांचे एकत्रित छायाचित्र प्रकाशित करून कॉंग्रेसला चांगलेच प्रत्युत्तर दिले. नानाजी देशमुख यांची भेट घेतल्याने जर का एखादी व्यक्ती संघाचा एजंट ठरत असेल तर मग माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी सुद्धा नानाजींची भेट घेतली होती. कॉंग्रेस पक्ष कलामांनाही संघाचे एजंट ठरवणार का? असा सवाल बेदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

शांतिनिकेतन

लेखक अन्या दातार यांनी रविवार, 25/12/2011 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
एवीतेवी बंगालमध्ये आलोच आहोत तर इथली काही ठिकाणे चुकवायची नाहीतच असे ठरवले होते (वर्ग सोडून ;) ) त्यापैकीच एक ठिकाण म्हणजे गुरुदेवांचे शांतिनिकेतन (गुरुदेव म्हणजे फक्त रबिन्द्रनाथ ठाकूर). जरा माहिती काढली तर असे कळले की २३ डिसेंबरपासून पौष मेला चालू होतोय. हा चान्स सोडायचा नाहीच असे ठरवलेच होते. कसे जायचे वगैरेची माहिती मित्राकडून व जालावरुन घेतली. खडगपूर-बोलपुर (शांतिनिकेतन) हा निदान ५ तासाचा रेल्वे प्रवास आहे. हावडावरुन काही ट्रेन्स आहेत. पण खडगपूरहुन फक्त बेंगलोर-गुवाहाटी एक्सप्रेस जाते. लवकर पोहचावे म्हणून मी हावडा-बोलपुर असे एका ट्रेनचे तत्काल आरक्षण केले होते.

वोडार

लेखक ajay wankhede यांनी रविवार, 25/12/2011 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी ओडार, नाही हो नागरिक या देसाचा जागा दिसली खुली का ताण डेरा न.. मंग सकाळ पासून दे दनादन घाल घाव काळ्या ठीक्कार दगडावर... घामाच्या धारा,छेनि, हातोडी टक.. टक..

भगवान बुद्धांचे भिक्षा पात्र

लेखक ए.चंद्रशेखर यांनी रविवार, 25/12/2011 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
(Original Alms-Bowl of Buddha) इ.स.1880-81 मध्ये भारतीय पुरातत्व विभागाचे तत्कालीन मुख्य, मेजर जनरल ए. बकिंगहॅम यांनी बिहारच्या उत्तर व दक्षिण भागांचा एक दौरा केला होता. या दौर्‍यात बकिंगहॅम यांनी त्या वेळेस बेसार (Besarh) या नावाने ओळखल्या जाणार्‍या एका गावाला भेट दिली होती. हे गाव म्हणजे प्राचीन भारतीय इतिहासातील प्रसिद्ध असलेले वैशाली नगर आहे हे बकिंगहॅम यांनी लगेच ओळखले होते. वैशाली येथे जरी बकिंगहॅम यांना फारशा पुराण वस्तू सापडल्या नसल्या तरी त्यांना वैशाली या स्थानी भगवान बुद्धांचे भिक्षा पात्र पुरातन कालापासून जतन करून ठेवलेले होते अशी माहिती समजली.

चिऊताई चिऊताई

लेखक विदेश यांनी रविवार, 25/12/2011 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
चिऊताई चिऊताई नकोस फिरकू अंगणात ग - मम्मी-डॅडीचा गुडबॉय कधीच तुला विसरला ग ! बोकेभाऊ बोकेभाऊ टपून बसला ना तुम्ही - मोठ्ठा गोळा लोण्याचा कधीच मटकावला आम्ही ! बोकडदादा बोकडदादा किती अजागळ दिसता हो - तुमची दाढी पाहुन बायको भांडत नाही का हो ? हत्तीराव हत्तीराव ब्रश कसा हो वापरला - दोन दात दोन दिशांना नीट का नाही धरला ? कावळोबा कावळोबा उगाच करता काव काव - संतूर लक्स टाईड रिन वापरून तरी बघा राव !

एक कविता आठवतांना...My Sorrow

लेखक मनिष यांनी रविवार, 25/12/2011 02:25 या दिवशी प्रकाशित केले.
यशवंतच्या कविता वाचल्यावर माझ्या काही जुन्या कविता उगाच चाळल्या...गंमत म्हणजे, पहिलीच जी कविता चाळली ती (मला तरी) आजही फार हास्यास्पद नाही वाटली. १९९७ ला लिहलेली. ती मनस्थिती आजही व्यवस्थित आठवतेय. विशीतच होतो आणि ज्या वयात 'लाथ मारेल तिथे पाणी काढेल' असा आत्मविश्वास असतो तेंव्हाच आलेल्या असंख्य अडचणींमुळे आणि अपयशामुळे खूच खचलो होतो आणि नाउम्मेदही झालो होतो. मित्रही पांगले होते...खूपच एकटा, एकटा झालो होतो. आणि कुठेतरी आत खोलवर डिचवलोही गेलो होतो, आणि त्यातूनच एक जिद्द थोडीशी उगवत होती.

<<<<आज बसावे उद्या बसावे >>>

लेखक सुहास.. यांनी शनिवार, 24/12/2011 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल : http://www.misalpav.com/node/20177 (सोनलताईंची माफी मागुन ) आज बसावे उद्या बसावे दोन थेंब सांडुन देणे डोक्यामध्यल्या शॉटालाही सोडुन द्यावे जमवुन प्यावे दोन पेयपांनांच्या मधले अंतर आहे केवळ झुरत राहणे कसे कळावे खुळ्या जगाला सांजकाळीचे बहकुन येणे ग्लास मद्याचे असेच ताटवे त्यात बुडावे दिसावे काजवे.. ओठांवरचे शब्द गरिबडे श्वासागणती बरळत जाणे सिगारेटीचे वलय खेळावे नको मेंदुशी फाटे फोडणे तंदुरीचे चिकन घेउनी संध्या काळी आपले बसणे
काव्यरस

अश्रू

लेखक मयुरपिंपळे यांनी शुक्रवार, 23/12/2011 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
अश्रू मधूनं पुसावे मनाचा ओलावा स्वप्नात का करावा आप्त क्षणाचा कालवा ! रात्र ही सुधा झाली परकी दिवस ही झाला पोरका ! काही काळ ही यात्रा थांबते एकटीच जीवनप्रवास हा फक्त एक क्षणभराचा ! -- मयुर

आरक्षणाचे धोरणात बदल

लेखक सदानंद ठाकूर यांनी शुक्रवार, 23/12/2011 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज देशात शिक्षण व रोजगार या क्षेत्रात मागासलेल्या समाजातील तसेच आर्थीकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण दिले जाते. या आरक्षण देण्याला विरोध असण्याचे कारण नाही. ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे किंवा ज्याना न्याय मिळालेला नाही त्यांचेसाठी आर्थीक व सामाजीकदृष्ट्या पुढारलेल्या लोकांना थोडा त्याग करावा लागला तर अजीबात विरोध असू नये. मात्र आता ज्या पध्दतीने आरक्षणाचा लाभ घेतला जात आहे व त्यामुळे होणा-या परिणामांचा विचार करता या धोरणात काही बदल करणे आवश्यक आहे असे वाटते. सध्या वस्तुस्थिती अशी आहे कि, समजा अ हि व्यक्ती मागासलेल्या समाजातील आहे व त्यायोगे त्याला एखादा चांगला रोजगार मिळाला.