कोलावरी गोदावरी
त्या कोलावरी डी गाण्याने कहर केलाय हे नक्की. लाखो बघे त्या गाण्याला मिळाले ही कमाल आहे. लाखो म्हंजे चाळीस पन्नास लाख वगैरे. गाणे खरेतर शून्य आहे. पण तरी एवढे बघे म्हंजे हल्लीच्या सांस्कृतिक चवीचा ही अंदाज बांधता येईल. असो. मी मात्र ते गाणे कानावर आल्या आल्या आणि त्याच्या प्रसिद्धीची बातमी समजताच एक फायदा करून घेतला. आमच्या गोदेची हेळसांड मला अगदी पाहवत नाई. नाशिकला उगम पावणारी गोदावरी नदी. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे समाजबांधव आणि भक्त आणि अन्य जन तिचा बरं महिने छळ करत असतात. तिची कधी एकदा "मिठी" करावी असे काहीसे जनतेला झाले की काय कुणास ठाऊक.
मिसळपाव
महाभारताच्या युद्धात १६ वर्षीय अर्जुनपुत्र अभिमन्यू याने कौरवांच्या चक्रव्यूहाचा भेद करण्याचा प्रयत्न केला. दुर्योधन, कर्ण, जयद्रथ इत्यादी कौरवांच्या महारथींना तोंड देत तरुण वयात एवढा मोठा पराक्रम केल्यामुळे भारताच्या इतिहासात अभिमन्यू अजरामर झाला. अधर्माच्या विरोधात धर्माने दिलेल्या या लढाईत धर्मासाठी अनेक रथी-महारथींनी पराक्रम केला. त्यांच्या पराक्रमामुळेच धर्माचा जय झाला.
कौरवांच्या ११ अक्षौहिणी सैन्याचा केवळ ७ अक्षौहिणी पांडव सेनेकडून पराभव झाला.