Skip to main content

काय हा अफाट दर ???

लेखक मनिमौ यांनी गुरुवार, 19/01/2012 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिन्ट आउट चे (भलतेच।) दर ! सध्या मी मुम्बै मधे राहात आहे.

थंडी माघाची

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 19/01/2012 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
थंडी माघाची थंडी पडलीया माघाची राया माघाची घाई करा तुमी येण्याची ||धृ|| लवकर या हो जवळ घ्या हो जरातरी फिकीर करा वेळेची || नका नका आसं करू नका जिव माझा फुका जाळू नका एकटेच का दुर र्‍हाता तिथं पेटवा शेकोटी माझ्या ज्वानीची || थंडीनं जिव केला येडापिसा उन उन उबेला जवळी बसा हातावर हात आन पायावर पाय पहा चोळून राहिलेय मी केव्हाची || कालचा दिस आठवा ना रुसवा गोडीनं मिटवा ना आणलय काय दावून जरा मुठ उघडा हाताची || - पाभे
काव्यरस

स्फुट: रचना!

लेखक राघव यांनी गुरुवार, 19/01/2012 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
कोणतीही सुंदर रचना कशी घडत असेल? बर्‍याच दिवसांपासून उगाच हा प्रश्न मला पिडतोय. :) तसं तर रचना = पदार्थ, शिल्प, रेखाचित्र, छायाचित्र, गद्य-पद्य लेखन, संगीत.. पण सोबतच एखादे सुंदर घर, एखादी आठवण, एखादं मैत्रीचं अतूट नातं, एखादी अप्रतीम - संपूच नये असं वाटणारी संध्याकाळ.. असंही बरंच काही म्हणता येईल.. नाही? मग विचार केला, कोणतीही रचना सुंदर केव्हा नसते? सहज उत्तर येतं.. जेव्हा ती आवडत नाही! का आवडत नाही? हृदयाला भिडत नाही म्हणून. म्हणजे कोणतीही रचना सुंदर तेव्हा होते जेव्हा ती हृदयाला भिडते.

जीवन

लेखक विदेश यांनी बुधवार, 18/01/2012 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
सुखाच्या ह्या ऋतूत तुम्हाला हवे म्हणून- माझ्याजवळचे पाने फुले फळे आणि फांद्याचे सर्वस्व देण्यासाठी- मला जगावेच लागेल ! दु:खाच्या त्या ऋतूत तुम्हाला हवे म्हणून- कुणाच्या तरी जगण्यासाठी चुलीत जळण्यासाठी- कुणाच्या तरी मरणानंतर चिता जाळण्यासाठी- माझे अचेतन खोड मला जपावेच लागेल !

We The People of India....१

लेखक कॉमन मॅन यांनी बुधवार, 18/01/2012 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, येथे मिपावरती भारतीय राज्यघटनेवर काही माहितीपर लेखांची एक मालिका लिहायची असे बरेच दिवस आमच्या मनात जे होते त्याची आज आम्ही हा छोटेखानी प्रास्ताविक-लेख लिहून मुहुर्तमेढ करत आहोत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली १९४७ साली जी समिती स्थापन झाली होती त्या समितीने जवळजवळ अडीच ते तीन महिने अथक परिश्रम घेऊन भारतीय राज्यघटना तयार केली, जी आपण स्विकारली आणि अंगीकारली. ही भारतीय राज्यघटना म्हणजे केवळ एक कायद्याचे जाडजूड निर्जीव पुस्तक नव्हे, तर गीता, बायबल, कुराण यांच्या तोडीची आणि

एक कविता आठवतांना...Why Me?

लेखक मनिष यांनी बुधवार, 18/01/2012 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
आधीची कविता - My Sorrow ही अजून एक दुसरी जुनी, पण आजही आवडणारी कविता. आयुष्यात बर्‍याच वेळा 'पण मीच का?', 'Why Me?' हा प्रश्न सतावतोच. कधी अक्राळविक्राळ रूप धारण करून आपण आणि इतर ही दरी इतकी रुंद करतो की एकाकीपण, कोणी समजून गेऊ शकत नाही हा सल प्रत्यक्ष दु:खापेक्षाही जास्त त्रास देतो. Experiences are so personal, they can't make anyone else wiser! असं म्हणून गप्प व्हायचं. ही कविता अशाच काळत लिहिली आहे जेंव्हा मी खूप हताश आणि निराश झालो होतो.

झुरळे !!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 18/01/2012 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
कशी कुणास ठाऊक कोठून उगवते ही झुरळांची जमात कशी कोठे दडून बसते फटीत बाथरूममध्ये .... किचनच्या बेसिन खाली मध्यरात्री कधी उठलो तर दिसतात मस्त मजेने फिरत असतात इतस्तत: दिवां लागताच तुरुतुरु पळतात अदृश्य होऊन जातात भयंकर किळसवाणे वाटते त्याना बघतांना झुरळे असतात बारीक झुरळे असतात ढब्बू डौलदार ...बेढब झुरळे असतात चीनी माणसाच्या मिशी सारखी धीर गंभीर विचारवंत योग्या सारखी ध्यान लावून बसलेली किती नष्ट केली नष्ट झाली असे वाटले तरी ती उगवतात फिनिक्स पक्ष्या सारखी राखेतून उभी राहतात जिद्दीने .....! पायाने ठेचले की फट असा आवाज येतो नि ही मरून जातात मी पाहिलंय मुंग्यांनी त्याचा देह फ
काव्यरस

(बोंबाबोंब)

लेखक मूकवाचक यांनी बुधवार, 18/01/2012 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
महिना अखेरी, कैसा थाटमाट लागताच वाट, पगाराची सोशिक बायको, खिसे ती तपासे टाकोनी उसासे, दर्दभरे उधारी करोन, आणते किराणा शोधते बहाणा, सयुक्तिक सार्याच वस्तूंचे, वाढले हो भाव मनी काही हाव, धरवेना मूक वाचकाचे, सणके मस्तक काव्य हेच एक, प्रकटन पुढार्यांचे बूड, घट्ट खुर्चीवरी, फुकाचीच सारी, बोंबा बोंब
काव्यरस