Skip to main content

खानदेशी वांग्याचे भरीत

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 24/03/2012 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
ही पाकृ मला आपल्या मिपावरची मैत्रीण स्मिता हिने सांगितलेली आहे :) झटपट आणी एकदम चविष्ट अशी ही पाकृ आहे :) भरीताला पाहून नेहमी नाक मुरडणारे मी आणी माझा नवरा आवडीने हे खाऊ लागलो :) स्मिताचे मनापासून आभार :) साहित्यः मोठे भरीताचं वांगं २-३ हिरव्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी-जास्त) २-३ लसूण (लसूण आणी हिरव्या मिरच्या कोरड्याच तव्यावर भाजून घ्यायच्या) मुठभर कोथंबीर मुठभर कांद्याची पात चिरून १ टीस्पून ओवा मीठ चवीनुसार

शब्द...!

लेखक वेणू यांनी शनिवार, 24/03/2012 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
सुटीची मस्त सकाळ म्हटलं की हातात वाफाळत्या चहाचा कप आणि समोर वृत्तपत्र, ठरलेलंच!! "घरकाम होत राहतील आरामात" कसली घाई नाही, गडबड नाही हा आल्हाददायी विचार करत पहिला घोट घेतला अमृततुल्याचा- चहाची चष्म्यावर आलेली वाफ साफ करत, वृत्तपत्रात घातलं डोकं... 'पुंजके' नावाचा स्तंभलेख वाचताना, सुधीर मोघे म्हणतात- येथे रेंगाळले, ओळी सुंदरच होत्या, "शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते, वाहतात जे ओझे, ते तुमचे आमचे असते!" वाचन खुंटलं इथेच... खरंच शब्द म्हणजे नक्की काय, नितळ पाणी? भावनांचा रंग मिसळला की तेच भाव व्यक्त करणारे!

महाराष्ट्राचा बिहार होतो आहे का?

लेखक चिंतामणी यांनी शनिवार, 24/03/2012 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या अनेक वार्तापत्रातुन प्रसीध्द होणा-या बातम्या वाचल्यावर "महाराष्ट्राचा बिहार होतो आहे का?" असा प्रश्ण पडतो आहे. आजची ताजी बातमी वाचा. (सध्या महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल अनेक अहवालांवर चर्चा चालू आहे. महाराष्ट्राचा बिहार झाला आहे याबद्दल अनेकांचे एकमत झाले आहे. या पार्श्वभूमीवर आत्ताच एक धक्कादायक बातमी वाचण्यात आली.) धक्कादायक आंतरजालावरील वर्तमानपत्रातील ताजी बातमी पुढील प्रमाणे. दिवेआगरःसोन्याच्या गणपतीची चोरी राज्यातील मंदिरांमध्ये चो-यांचे प्रमाण प्रचंढ वाढले आहे.

काहीतरी नवीन..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 23/03/2012 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
बॉम्बे टीव्ही वर काम करणारा एक कलाकार.. पानू रे! मदन मोहन आणि हेमंत मुखर्जी या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळालेले पानू रे... आणि त्यांचा सांगितीक वारसा मिळालेला त्यांचा मुलगा सुरोजीत रे...! या दोघा बाप-लेकांनी अनूप जलोटा यांच्यासोबत साई बाबांच्या भजनांचा एक अल्बम केला आणि बंगालीतूनही १-२ अल्बम केले होते . पण इतकी वर्ष मुंबईत राहिलेल्या या दोघांना मराठी संगितानेही तितकीच भुरळ घातली आणि मराठीतला पहिला वहिला अल्बम करण्याच्या दृष्टीने त्यांनी पाऊल उचलले. कोणत्यातरी एका क्षणी सुरोजीतची आणि माझी भेट झाली फेसबुकवर आणि त्यांच्या या अल्बम साठी गाणी लिहिण्याची संधी मला मिळाली.

सांजवात..

लेखक सांजसंध्या यांनी शुक्रवार, 23/03/2012 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
सांजवात.. शीळ तुझी दरीतली खूण तुझी सरीतली.. ओढ तुझी अंतरात रोज मुकी चांदरात.. ओल तुझी काळजात बोल तिचे आसवात साद तुझी वादळात याद तुझी काजळात आजही तू आठवात तेवते मी सांजवात.. - संध्या
काव्यरस

....पुन्हा!!

लेखक वेणू यांनी शुक्रवार, 23/03/2012 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
सांज साजरी सखी लाजरी, आठव बोचरी रुतली पुन्हा... पेटलेले रान उन्हाला तहान सुन्न वहीचे पान, मिटले पुन्हा... दमलेला श्वास श्रमलेली आस, अवघडले त्रास दुर्मुखले पुन्हा... तू असण्याचे भास मनाचे खोटे कयास, निराशेने खास गाठले पुन्हा... आशेनेच फसवणे जगासवे हेलकावणे, मिळवून गमावणे घडले पुन्हा... शुभ्र तेवती वात काळावरही मात, एक नवी सुरुवात भरारले.... पुन्हा!! -बागेश्री

मैफिल नववर्षाची

लेखक जयवी यांनी शुक्रवार, 23/03/2012 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
आसमंती हा बहर बसंती सरे पानगळ शिशिराची कोकील कंठी सुरु होतसे मैफिल ही नव वर्षाची नवे सूर अन् नवे तराणे नव्या दिशा, उन्मेष नवा नवीन स्वप्ने, नवी भरारी नवी दृष्टी अन् जोश नवा नवसूर्याचे तेज लेऊनी सृष्टी गाई गीत नवे उधळण होता सप्तसुरांची इंद्रधनुवर रंग नवे गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा !!