Skip to main content

मला समजलेले चिऊ आणि काऊ

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 12/04/2012 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ प्रेरणादायी लेख http://www.misalpav.com/node/21326 प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की ही कथा केवळ चिऊ आणि काऊची नाही, ती आदीम `मानवप्रेमाची ' प्रतिकात्मक करूण कहाणी आहे. काऊचा अर्थ चिऊचा पती इतकाच नसून `कावलेला' किंवा मनातून कावलेला पण बाहेरून काऊ (इथे इंग्रजीतील `काऊ' म्हणजे `गायीसारखा गरीब' असा अर्थ आहे,....

सलगी

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 12/04/2012 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
कौल कौल छत्रामधुनी गीत अंबराचे गळते रोम रोम कोण पुकारी; हृदयी सल; ना आकळते जीर्ण; कुडाच्या ह्या भिंती जड होउन पाउल पडते आर्त कोळुनी जन्माचे पडछाया हसते रडते किती जाहले राहीले चाक रहाटाचे फिरते कोरडे जलाशय तरिही आंसवात मन भिरभिरते ऊर उतू वाहू पाहे बांधावर पाहुन नाते अंकुरात माया असुनी मातीशी सलगी नडते .................अज्ञात
काव्यरस

नस्त्या उचापती

लेखक अन्नू यांनी गुरुवार, 12/04/2012 04:49 या दिवशी प्रकाशित केले.
आज घरातील सर्व मंडळी काही कारणास्तव चार दिवसांसाठी बाहेरगावी गेलेली असल्याने मी घरात एकटाच पडलो होतो आणि त्यामुळेच घरातील 'स्व' जेवणाची जबाबदारीसुद्धा सर्वस्वी माझ्यावर पडली होती. तसा मी भात अगदी मस्त करतो (एकट्यापुरताच) परंतु रोज रोज भात खाण्यापेक्षा आज जरा वेगळं करुया असे वाटले. पण वेगळ म्हणजे नेमक काय करायच? कारण ऑम्लेट- भाताच्या पुढे माझी कधीच उडी गेली नव्हती; नव्हे तसं धाडसच मी कधी केलं नव्हत. (त्यात आळस हा घटकही किंचितसा कारणीभूत होताच!) पण आज मात्र काहीतरी असं धाडसी कृत्य करावच अस मनापासून वाटू लागल होतं.

बाठोणी (सासव)

लेखक गणपा यांनी गुरुवार, 12/04/2012 03:28 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल अर्धा संपत आलाय. काही दिवसातच घरा घरांतुन आंब्यांचा सुगंध दरवळु लागेल. तस बाजारात आंब्यांच्या राजाच आगमन झालेल आहेच. पण सध्या त्यांचे नगा-गणीक भाव पहाता महागाईने आधीच फाटलेल्या खिशाला ठिगळं लावायची पाळी यायची. त्यामुळे तुर्तास अजुन काही दिवस वाट पहाण्या शिवाय गत्यंतर नाही. माझं घर आणि आजोळ कोकणात (दोन्ही एकाच गावात समोरा समोर) असल्याने 'एप्रिल-मे'मध्ये घरी कधी आंब्यांचा दुष्काळ जाणवला नाही. एप्रिल महिन्याच्या मध्यावर मामा आंब्याची करंडी घेउन मुंबईतल्या घरी हजर असायचाच. मे महिन्यात शाळेला सुट्टी लागली की मग गावी आंब्यांचा फडशा पाडण्याच्या कामगीरीवर जातीने रुजु व्हायचो.

आम्ही आणि स्वाईन फ्लु

लेखक चाफा यांनी गुरुवार, 12/04/2012 02:44 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख फार पुर्वी म्हणजे जेंव्हा स्वाईन फ्ल्यु ने भारतभर हाहाकार माजवला होता तेंव्हा लिहीलेला आहे पण आता पुन्हा एकदा पुण्यात स्वाईनफ्ल्यु चे दुष्टचक्र सुरु झाल्याचं कळल्यावर इथे टाकतोय ********** " येतो गं अशु...." बाहेर पाडण्यापूर्वी मी सौ. ला हाक मारली. " अरे, पण मास्क घातलायस का?" सौ. ने आठवण करून दिली. हो ! आजकाल कुठे बाहेर पडायचं झालं तर डोक्यात हेल्मेट घातलेय की नाही यापेक्षा तिची मी मास्क घातलाय की नाही यावर जास्त नजर असते. कारण सगळ्यांनाच माहिताय. आजकाल जगभर धुडगूस घालणारा ‘स्वाईन फ्लू’. या रोगाने माझ्या जीवनशैलीत मरणाचा फरक करून ठेवलाय.

शेवग्याच्या शेंगांची भाजी ---

लेखक निवेदिता-ताई यांनी बुधवार, 11/04/2012 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य - चार-पाच कोवळ्या शेवगा शेंगा, एक चमचा तेल, फोडणी साहित्य, एक चमचा शेंगदाणे कूट, मिठ चवीनुसार, गोडामसाला एक छोटा चमचा, अर्धा चमचा साखर. कॄती -- शेंगाचे छोटे छोटे तुकडे करुन घ्या, पाच ते सात मिनिटे उकडत ठेवा,त्यावेळी त्यात मिठ घाला. चवदार होतात. शक्यतो लोखंडी कढई किंवा तव्यात फ़ोडणी करा त्यातच गोडा मसाला घाला, आता शेंगातील पाणी काढून टाका, त्या शेंगा फ़ोडणीत टाका, त्यावर मिठ व साखर घालून चांगल्य़ा परतून घ्या, व आता त्यात शेंगदाणे कूट घालून परत चांगले परतून घ्याजास्त कोरडे वाटल्यास आपण शेंगा उकडत ठेवल्या होत्या त्यातील थोडे पाणी घाला.ते पटकन आटून जाईल. ( मी काय केले आधी भाकरी केल्या व त्

भळ्ळकन ..

लेखक गवि यांनी बुधवार, 11/04/2012 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
रीअर व्यू मिरर मधून भळ्ळकन प्रकाश डोळ्यात घुसला.. कोणाचा तरी हॅलोजनवाला हेडलाईट असणार.. डोळ्यात चळचळीत पाणी आणि मनात कचकचीत शिव्या आल्या.. संस्कारांनी तोंडाला चाप लावलेत म्हणून त्या नुसत्या कानात खळखळ वाजल्या.. पुन्हा पुन्हा डोळ्यात घुसणारा लखलखता पारा.. कोण साला घुसतोय डोक्यात.. नडतोय खालीपीली **चा.. दिवसाच्या वेळेला हॅलोजन लावून शायनिंग मारतात... काळ्या पैशाची पैदास हरामखोरांची... मान वळवून मागे बघितलं तर तो सूर्य होता... मग मी गपगुमान खाली मान घालून चालू पडलो.. !!!! -(पूर्वप्रकाशित)

एका तलवारबाजाची कहाणी

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 11/04/2012 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
पांडवांच्या वनवासातले १२ वे वर्ष संपत आले तसे दुर्योधनाच्या चेहर्‍यावरचे चिंतेचे जाळे वाढतच चालले. पांडवांच्या मागावर सोडलेले गुप्तहेर जसे एकामागुन एक बेपत्ता होउ लागले तसे तसे तर त्याचे डोके काळजीने पोखरले जाउ लागले. कर्ण, द्रोण भीष्मादि दिग्गजांच्या बळावर त्याने पांडवांशी वैर तर घेतले होते परंतु एक कर्ण वगळता कोण किती एकनिष्ठ आहे याबद्दल त्याला शंकाच होती. भीष्म द्रोण तर ऐनवेळेस पाठिशी उभे राहतिल की नाही याची त्याला काळजी होतीच. पण सत्तेच्या लालसेने दु:शासन देखील विरोधात उभा ठाकणार नाही कशावरुन? पण ही शंका तो झटकन पुसुन टाकत असे. द्रौपदीच्या वस्त्राला हात घालणारा दु:शासन तर होता.

तुझी म्हातारी मेली तर मी काय करू..

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 11/04/2012 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा :- मला झालेला 'डायरीया'. मी तर रस्त्याने बोंबलत हिंडत होतो मी तर भेळपुरी खात होतो मी तर पोरीला गंडवत होतो बोंबलत हिंडत होतो, भेळपुरी खात होतो पोरीला गंडवत होतो तुला मिर्ची लागली तर मी काय करू.. मी तर उकीरडे फुंकत होते मी तर रवंथ करत होते मी तर डोळे मारत होते उकीरडे फुंकत होते, रवंथ करत होते डोळे मारत होते तुला मिर्ची लागली तर मी काय करू . आग लागो सार्‍या दुनीयेला, गेम टाकणार तुझ्यावर प्रेमदिवाणा..