Skip to main content

किल्ले विसापूरः एक भन्नाट अनुभव

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 12/06/2012 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
किल्ले विसापूर, पवनमावळच्या संरक्षक दुर्गचौकडीपैकी एक. चौकडीमध्ये आकाराने सर्वात मोठा आणि सर्वात उंच. चहूबाजूंनी कातळकड्यांचे नैसर्गिक संरक्षण असलेला पुराणपुरूष. भटकायला जायचा प्लान अचानक ठरला तो रात्री आलेल्या मित्राच्या एका फोनमुळे. सकाळी ९ वाजता मळवली स्टेशनावर पुणे लोणावळा लोकलमधून उतरलो. कुठे जायचे हे नक्की नव्हतेच. शेवटी भाजे, कार्ले, लोहगड ही असंख्य वेळा जाणे झालेली ठिकाणे वगळून विसापूर गाठायचे ठरले. लोहगडावर तर २०/२५ वेळा जाणे झालेले आहे पण त्याचाच जुळा भाऊ असलेल्या विसापूरला मात्र एकदाच आणि तेही बर्‍याच वर्षांपूर्वी गेलो होतो.

जानी दुष्मन एक अनोखी प्रेम कहानी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 12/06/2012 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे वाईट चित्रपटांच्या काही कॅटेगर्या असतात. वाईट, खुप वाईट आणि अशक्य वाईट. याच्या व्यतिरिक्त एक क्याटेगरी आहे जी केवळ २-४ चित्रपटात संपु शकते. जानी दुष्मन त्यापैकी एक. चित्रपटाचे नाव खुप जालीम आहे. तुमचा एखादा जानी दुष्मन असेल तर त्याला खुर्चीला बांधुन ठेवुन हा चित्रपट दाखवावा. त्याला अजुन टॉर्चर करायचे असेल तर याच चित्रपटातले "जावेद भाई सो रह्यले है" हे गाणे चालीवर पाठ म्हणुन दाखवायची शिक्षा द्या. एकतर तो दुष्मनी सोडुन देइल किंवा दुनिया. दोन्ही तुमच्या साठी चांगलेच आहे.

मन भरून गेले प्रेमाने मी रिताच होतो ना?

लेखक रसप यांनी मंगळवार, 12/06/2012 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
मन भरून गेले प्रेमाने मी रिताच होतो ना? नव्हतीस कधी तू माझी पण मी तुझाच होतो ना ? "चल विसरुन जाऊ झाले-गेले, जगू नवे आता" म्हटलेस तरीही गुरफटून मी उगाच होतो ना ? तुज बरेच काही दिले सुखी करण्याला नशिबाने पण मनात गुपचुप जपलेली मी व्यथाच होतो ना ? मज वेडा मानुन सोडुन जा, हरकत नाही माझी 'तो' प्रेम तुझ्यावर करणारा मी खुळाच होतो ना? माझ्या पायाशी हरून ही दुनिया लोळण घेवो तू समोर माझ्या आल्यावर मी खुजाच होतो ना ? तुला नेहमी तुझ्या घराची चौकट प्यारी होती केलेस मनातुन प्रेम तरी मी 'दुजा'च होतो ना ? ....रसप.... ११ जून २०१२ http:

एका वेश्येचे मनोगत..............

लेखक अमितसांगली यांनी मंगळवार, 12/06/2012 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
मीना शेषु व त्यांची संग्राम हि संस्था वेश्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी, शिक्षणासाठी लढत आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी सातारा शहरात आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांचे भाषण ऐकून मनात आलेले विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

" | पालखीच्या सोहळ्यात | "

लेखक विदेश यांनी मंगळवार, 12/06/2012 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
"| पालखीच्या सोहळ्यात |" नामामधे रंगलो मी, ध्यानामधे गुंगलो मी माउलीत दंगलो मी, पालखीच्या सोहळ्यात | ओठी विठ्ठलाचे नाम, पाठी विठ्ठलाचे धाम चित्ती विठ्ठलच ठाम, पालखीच्या सोहळ्यात | कुणी गातसे अभंग, कीर्तनास चढवी रंग तो सुटेना संतसंग, पालखीच्या सोहळ्यात | एकमेका आलिंगूनी, सर्व जाऊ आनंदूनी भक्तिरसात न्हाऊनी, पालखीच्या सोहळ्यात | धावे सांजवेळी गाय, तैसे ओढतात पाय डोळ्यांपुढे विठूमाय, पालखीच्या सोहळ्यात ||

येणार

लेखक शकु गोवेकर यांनी मंगळवार, 12/06/2012 07:36 या दिवशी प्रकाशित केले.
डा.मंग ला पुरंद रे या सिद्ध हस्त लेखिका.त्यांनी लिहिलेले एक पुस्तक परवा वाचनात आले. त्या पुस्तकाला डा.जयंत नार ळी करांनी प्रस्तावना लिहिली आहे, साधार ण पणे अनिवासि भार तिया ना NRI किंवा Non Resident of India अशी उपाधी लाव ण्यात येते पण मंगला ताईनी व डां.

विचित्र....

लेखक स्वतन्त्र यांनी सोमवार, 11/06/2012 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण महिन्यापूर्वी भावाचा गाडी स्किड होऊन अपघात झाला.जरा मानेला मार आणि खरचटणे या पलीकडे विशेष काही झाले नाही.अचानक त्याला १० दिवसानंतर जीभ जड होऊन बोलायला त्रास होऊ लागला. लगेच CT स्कॅन आणि MRI करण्यात आले.मानेतल्या शिरेवर दाब आल्याने जिब जड झाल्याचे निदान झाले.ह्या सर्व तपासण्यांसाठी त्याला हॉस्पिटलात Admit करावे लागले.कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी हि बातमी आमच्या नातेवाईकांच्या कानावर पडलीच. मग काय रोजच त्याला भेटण्यासाठी रीघ लागू लागली. प्राथमिक चौकश्या सुरु झाल्या. पहिले जेमतेम १० मिनटे,भावाची विचारपूस करण्यात जात होती.

मी आणि चित्रकला.

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 11/06/2012 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
माझे आणि चित्रकलेचे वावडे. अशा ह्या अनाडी विद्यार्थ्याचे चित्रकले-बाबतीत काही प्रश्न आहेत.कूणी उत्तरे देवू शकतील काय? १. चित्रकलेचा कागद कसा निवडायचा? २. ब्रश कसे निवडायचे? ३. रंग कसे निवडायचे? ४. चित्रकला हे शास्त्र आहे की कला आहे? ५. माझ्या सारख्या "ढ" विद्यार्थ्याला पण ही कला आत्मसात करता येईल का? की मुळातच ही देवाची देणगी आहे? तसे असेल तर नादी न लागलेलेच उत्तम.