Skip to main content

पैसा

लेखक संजय क्षीरसागर यांनी शुक्रवार, 22/06/2012 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
श्वासात अडकला पैसा अन पैशात अडकला श्वास; श्वासाने सार्थक पैसा की पैशाने चाले श्वास? स्वच्छंद जगायला नक्की किती पैसा लागतो? हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकानं मला विचारलाये आणि स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा अशी प्रत्येकाची मनोधारणा आहे पण वस्तुस्थिती तशी नाही. एक गोष्ट सांगावीशी वाटते की जे लिहितोय तो माझा अनुभव आहे आणि तुम्हाला स्वच्छंद जगायचं असेल तर त्याचा जीवनात प्रयोग करून बघायला हवा. तुमच्या कोणत्याही प्रश्नाला आचरणात आणता येईल असं उत्तर माझ्याकडे आहे पण इथे उलटसुलट चर्चा करून उपयोग होणार नाही, तुमच्या प्रयोगाचे निष्कर्ष उपयोगी ठरतील.

नेत्यांना शिक्षणाची अट हवी का?

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 22/06/2012 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
आपण अनेकदा ऐकतो की अशिक्षित मंत्र्यांमुळे पुढार्‍यांमुळे देशाचे कसे वाट्टोळे झाले आहे. आमदार, खासदार यांना निवडणूकीला उभे रहाण्यासाठी शिक्षणाची अट कशी आवश्यक आहे वगैरे वगैरे. आता आपण काही आजी-माजी मंत्र्यांच्या/आमदारांचे/खासदारांचे/नेत्यांचे शिक्षण बघुया डॉ. मनमोहन सिंग (माजी रिझर्व्ह बँक गव्हर्नर, माजी केंद्रीय अर्थमंत्री, सध्या पंतप्रधान):अर्थशास्त्रात बॅचलर आनि मग मास्टर्स (संपूर्ण कारकिर्दीत प्रथम क्रमांक). ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधून डॉक्टरेट अटल बिहारी वाजपेयी: (माजी पंतप्रधान, माजी परराष्ट्र मंत्री): एम. ए. शरद पवार: बी.

तीट!

लेखक चैतन्य दीक्षित यांनी शुक्रवार, 22/06/2012 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
तनुवेलीवर यौवन फुलले, पाहुनिया तुज हे जग भुलले, हरले! सगळे प्रयत्न हरले ! सांभाळावे कसे मनाला? सांग तूच गे मला, शिकावी कुठे कलंदर कला ? नुकती सरली वर्षे सोळा ज्वानीचा ह्या नूर निराळा... भाव कसा मग असेल भोळा? नजरेच्या एका घावातच जीव जाहला खुळा ॥ सावळकांती, आखिव बांधा, चालीमधला झोक न साधा, मदनालाही होइल बाधा तुला पाहता, श्वास आतला आतच गं थांबला ॥ पदराआडुन हसते काही, बघणार्‍या मग भानच नाही, तुझाच तो होउनिया राही संन्याशाला संसाराचा लावशील तू लळा ॥ मनी तुझ्या जे काही दडले, ओठ सांगताना अवघडले, ते न इथे कोणाला कळले. ह्या मौनाची 'तीट' लावुनी, देव जरा शांतला ॥ - चैतन्य दीक्षित
काव्यरस

देव वाटला- असुर निपजला !!

लेखक विदेश यांनी गुरुवार, 21/06/2012 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
धर्म लाज संस्कार शरम सोडुन बनला कसा नराधम - फासुन व्यवसायास काळिमा पैसा-पैसा करसी अधमा ! अर्भक दिसले- शस्त्र उचलले माणुसकीचे नांव न उरले ! जिरला टाहो गर्भातच तो माउलीस ना पान्हा फुटतो - स्त्रीभ्रूणहत्या नित्य करावी कशी कळावी मातृथोरवी ! धन्य होतसे का तव माता - कृष्णकृत्य तव तिजला कळता ? म्हणेल माता नक्की तुजला, देव वाटला- असुर निपजला !!

या आगीमदी काय दडलय काय....

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 21/06/2012 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
आज म्हणे मंत्रालयाच्या ४, ५ आणि ६ व्या मजल्यांना आग लागली. दक्षिण मुंबईकडे जाणारे अनेक रस्ते संध्याकाळी बंद केले गेले - आग विझविणार्‍या यंत्रणेला मार्ग मिळावा म्हणुन. आग कशी लागली. कुठुन लागली वगैरे चर्चांचे गुर्‍हाळ अनेक वाहिन्यांवर धडाक्यात सुरू आहे. आगीत नक्की काय काय जळलय? - अर्थातच फायली! चला मंडळी पाहुया आता कुणा कुणाचं नशिब उघडतय ते. शहर रचना विभागातले नकाशे आणि फायली गेल्या तर मज्जाच मज्जा! बनवा हवे ते नकाशे आणि पाडा नवे भूखंड. उगाच कुणावर नोंदी फिरवल्याचे आरोप नकोत. झालं गेलं आगीला मिळाल.

मिपा म्हणी

लेखक श्रीरंग_जोशी यांनी गुरुवार, 21/06/2012 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
या मागची प्रेरणा मित्रांनो आपल्याला वाटत नाही का की रोजच्या बोलण्यात पारंपरिक म्हणींचा वापर कमी होत चाललाय. चला तर मग, आपण या म्हणी आठवणींच्या कप्प्यातून बाहेर काढूया. हो पण, जश्या च्या तशा नाहीत, तर त्यांना मिपा म्हणींचे स्वरूप देऊन उदा :
  • धाग्यापेक्षा प्रतिसाद जड
  • उथळ लेखनाला प्रतिसाद फार
  • अडला कवी संपादकांचे पाय धरी
  • धागा नको पण प्रतिसाद आवर
  • आपलेच धागे अन आपलेच प्रतिसाद
  • सदस्याची धाव प्रतिसादापर्यंतच
  • व्याकरण नको पण भाषाशुद्धी आवर