Skip to main content

मराठी गुलामगिरी

लेखक पोप्य्लोन यांनी सोमवार, 29/10/2012 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
आता मराठी माणसांना गुलामगिरी शिवाय पर्यायच नाही . कारण आता मराठी मुले एजिनिअर आणि डाक्टर सुद्धा बनणार नाहित . देशात एकच परीक्षा असणार आहे , उत्तर भारतीय मुले सार्वजनिक कॉपी करुन महाराष्ट च्या उत्तम कॉलेजात प्रवेश मिलवितिल आणि आपल्या मुलांसाठी फक्त कारकूनाच्या नोकरया असतील . सीबीएसई अभ्यासक्रम हा उत्तर भारतीयांसाठीच बनविला गेलेला आहे . तसेच हिंदी मधून सुद्धा परीक्षा देता येते .

त्याची डिटॅचमेंट

लेखक इनिगोय यांनी सोमवार, 29/10/2012 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तरार्ध काही दिवसांपूर्वी "अटॅचमेंटमधली वेदना आणि डिटॅचमेंटमधला आनंद" याबद्दल झालेली चर्चा या छोट्याशा स्फूटाला कारणीभूत ठरली. ---------------------------------------------------------------------------- प्रिय, निसर्गाचा सगळा प्रवास डिटॅचमेंटकडे सुरू असतो, नाही का? वाळलेली पानं, फळलेला मोहोर, निगुतीने बांधलेली घरटी, मोठी झालेली पिल्लं, बरसून रिकामे झालेले ढग, कशातही गुंतून राहत नाही तो. आणि तरी सतत नव्याने प्रसन्न दिसत राहतो. 'समर्पयामि' हे माणसाला म्हणावं लागतं. तर कधी 'पुरे झालं आता' असं बजावायला लागतं.

“ पुणे ते पानिपत ” भाग ५ : शिंदे छत्री - माधव राष्ट्रीय उद्यान - शिवपुरी

लेखक सारथी यांनी सोमवार, 29/10/2012 02:28 या दिवशी प्रकाशित केले.
“पुणे ते पानिपत” भाग १-शनिवारवाडा–अहमदनगर–घृष्णेश्वर: http://www.misalpav.com/node/22952 “ पुणे ते पानिपत ” भाग २ : सिंदखेड राजा - बऱ्हाणपूर - शाही किल्ला - http://www.misalpav.com/node/22967 “ पुणे ते पानिपत ” भाग ३ : असीरगढ - ओंकारेश्वर – रावरखेडी : http://www.misalpav.com/node/22988 “ पुणे ते पानिपत ” भाग ४ : उज्जैन –बजरंग गड – शिवपुरी :http://www.misalpav.com/node/22997 आठवा दिवस : १०

रागिणी सुहावनी- किरवाणी

लेखक चौकटराजा यांनी रविवार, 28/10/2012 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
आपले भारतीय संगीत व आयुर्वेद यांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. असला पाहिजे. भारतीय संगीत म्हणजे शास्त्रीय संगीत . यात उत्तर भारतीय संगीत व कर्नाटक संगीत असे दोन प्रवाह आहेत. दोन्हीत एका सप्तकात मूल व विकृत असे मिळून बारा स्वर आहे असेच मानतात.या बारा स्वरांच्या रचनेला काही बन्धने आहेत. नियम आहेत त्याना राग असे म्हणतात. अनेक वर्षांच्या वैचारिक व आस्वादात्मक प्रयोगप्रक्रियेनंतर याचे एक शास्त्र बनले आहे. काय बहुतांशी कानांना रंजक वाटले व काय अरंजक वाटले याचा चिकित्सक शोध घेऊन आजचे राग संगीत बनले आहे.

आमच्या गावातील एक आश्चर्य

लेखक मंदार कात्रे यांनी रविवार, 28/10/2012 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गावात एक बाबू देवरुखकर म्हणून व्यक्ती आहे, वय ४५ . तसा मंदबुद्धीच आहे, गावात हमाली ,पेपर टाकणे वगैरे उद्योग तो करतो. पण त्याची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे . लहानपणी शाळेत असताना त्याला मारकुटे मास्तर होते .त्यांच्या माराच्या भीतीने हा बाबू सगळी पुस्तके तोंडपाठ करून टाकी .म्हणजे अमुक धडा वाच,असे सांगितल्यावर पुस्तक नुसते समोर धरून तोंडपाठ धडा घडाघड म्हणून दाखवी.पण धड्यावरील प्रश्न विचारले असता त्यांची उत्तरे त्याला येत नसत ..............साहजिकच सतत नापास होत असल्याने चौथीतून त्याला शाळा सोडावी लागली. पण गणितात मात्र प्रचंड हुशार!

अरे माझ्या देवा... Oh My God..

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 28/10/2012 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
ओह माय गॉड.. अरे देवा ... असे आपण कितीतरी वेळा, कितीतरी ठिकाणी, कितीतरी गोष्टीत सतत वापरत असतो. आता या मागील किंतु, हेतू, परंतु हा विविधांगी, माणसानुरूप, कालानुरूप बदलत असतो, हा भाग निराळा. अमुक काही झालं , कि हे देवा, अस्सं झालंच कसं? काय करणार देवाची करणी.. याच देवाच्या करणीवर आक्षेप घेणारा असा अभिनय मांडलाय 'परेश रावल' यांनी वरील "ओह माय गॉड" या चित्रपटात. उत्तम सादरीकरण, दिग्दर्शन, सर्वांचा आपापल्या वाटेला अभिनय. पण मूळ खांब म्हणजे परेश रावल. देवाची भूमिका साकारलीय दस्तुरखुद्द 'अक्की" म्हणजे आपला अक्षय कुमार याने. तर हि कथा एक हिंदी नाटक " किशन वि.

उद्रेक भीषण स्फोटाचा

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 28/10/2012 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
उद्रेक भीषण स्फोटाचा (१६-जुल-२०११) -- पण भावनांचा कधी होणार मुंबई अमुची पुन्हा हादरली ? (प्रत्येकाच्या मनात आज हा प्रश्न नसून उद्गार बनले आहेत). प्रत्येक मुंबईकराच्या मनात हा प्रश्न आणि त्याच नेहमीच 'टिपीकल' उत्तर, आता 'कॉमन' होऊ लागलं आहे. आता हें 'कॉमन' का होत चाललंय? हें तुमच्या सारख्या सुज्ञास सांगायची गरज नको. मुंबईकर खरोखरच निगरगट्ट, कोरडे, कोडगे होत चालले आहेत का ? त्यांच्या भावना मृत चालल्या किंवा मेल्या आहेत का ? स्फोट झाला ? कुठे? कधी? कसा ?, असा आहे का, ठीक आहे. मुंबई पुन्हा लागली आपल्या कामावर दुसऱ्या दिवशी !

बाप्पा मोरया रे

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 28/10/2012 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवीन हो माथा....(असली गाणी ऐकायला मिळाली की समजावं बाप्पा येतोय हो लवकरच) गणेश चतुर्थी जवळ आली की सर्व वातावरण कसं आनंदाने भरून जातं. सगळीकडे ही लगबग सुरु होते पहा. मग सर्वांना मनापासून म्हणावसं वाटत, "आला पहा माझा तो श्री गणेशा, सा-यांचा तारणहार तूच प्रथमेशा; चाहूल लागली तुझी गजवदना, लगबग झाली सुरु तुझ्या रे स्वागता". (सौजन्य: "आमोद - एक आनंद कल्लोळ", के डी.) मग मखरापासून सुरुवात ते अगदी सजावटीतल्या एखाद्या डोंगराच्या शिखरापर्यंत, नुसता आनंदाचा कल्लोळ माजतो, हें पाहून सुखद वाटत. देवासाठी काय करू अन काय काय करू, असं सर्व गृहिणींना वाटत.

लोकल पारायण

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 28/10/2012 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
नवसाला देव पावतो तसं अक्षरशः आजकाल देवा पाव रे आणि मला ती अमुक लोकल वेळेवर मिळू दे रे बाबा. मुळात लोकलमध्ये चढलो म्हणजे तू पावलास नाहीतर तुझी अवकृपा का रे देवा !, असं काहीसा झालय माणसांच इथल्या. मुंबई, चाकरमान्यांची राजधानी म्हणावी. जो लोंढा येतो तो इथेच. अरे अरे कुठे चाललास रे ! कुठे म्हणजे काय मम्बयीला रे. का हो कहा जात हो, अरे गुड बख्त बम्बई नाही मालूम का, हम उहा जात हे . सर्रास हे आजकाल कानी पडतं, वृत्तपत्रात वाचायला मिळतं, टी.व्ही वर पाहायला मिळतं.