Skip to main content

एक ओळ फक्त.........!

लेखक Piyush mrudung यांनी सोमवार, 03/12/2012 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
** कधी कधी शब्दांपेक्षा सहवासाचा एक क्षणही पुरेसा असतो, मनातलं खूप काही बोलायला----------------------- मृदुंग ** बस तुझ्या माझ्या आठवणींचा सुगंध छळतोय..............! आठवणीतच पण माझ्या मनात दरवळतोय .................! ----------------------- मृदुंग ** तू आहेस तर सगळंच आहे... तू नाहीस तर काहीच नाही... क्षणभरचे पापण्यातले स्वप्नच... आता जगायला पुरेसे आहे... ------------ मृदुंग ** प्रत्येक इछेची 'विलक्षण' इच्छा असते, सुरुवातीला नव्हे शेवटीच त्याचे लक्षण दिसते....------© मृदुंग ** "लक्ष ' ण" कळायला लक्ष वेळा लिहिले, तरी सुद्धा सुरुवातीला लक्ष देऊन नाहीच पहिले.....

दम (दिलेली) बिर्याणी.

लेखक स्पंदना यांनी सोमवार, 03/12/2012 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
" हे बघ तू उगा मला त्या गणपा अन सानिकाची कारणे नको देउ." माझा नवरा मला जेवता जेवता सुनवत होता. "अरे पण ऐक तरी...." मी मध्येच त्याच बोलण तोडायचा प्रयत्न केला. पण तोवर माझ्या नवर्‍याने सानिकाच्या पराठ्याचा तुकडा तोडुन तो गणपाच्या खिम्यात खुपसला होता. तुकडा भरुन गणपाचा खिमा तोंडात कोंबत त्यान पुन्हा मला फैलावर घ्यायला सुरुवात केली." ये बद, तुगलन मनजे काय सापसपाई कलनाली...ऑम ऑम्...वाटली का तुला? अग सुगरण म्हणजे कशी अशी लोणच्यासारखी स्वयंपाकघरात मुरलेली पाहिजे. खाराशिवाय जस लोणचं तशी तेलाचे, तिखटामिठाचे डाग असल्याशिवाय सुगरण" नवर्‍याने तारे तोडावे तसे शब्द तोडले. कप्पाळ माझ!!!

स्वप्नघरांच्या भिंती

लेखक रविंद्र रुपन् यांनी सोमवार, 03/12/2012 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
रामचंद्र गुहा हे भारतातील सर्वात लोकप्रिय इतिहासकार आहेत. ‘इंडिया आफ्टर गांधी’ हे त्यांचे महत्त्वाचे पुस्तक. भारत म्हणजे प्रचंड अंतर्विरोध व कमालीची बहुविधता. असे असूनही हा देश एकत्र कसा राहू शकला, हा त्या पुस्तकाचा विषय. गुहा याचे श्रेय येथील सामान्य माणसाची जिद्द, लोकशाही, संविधान, धर्मनिरपेक्षता, एकसंघ बाजारपेठ अशा अनेक घटकांना देतात. सरतेशेवटी ते म्हणतात,
“जोपर्यंत हिंदी सिनेमे पाहिले जातात व त्यांची गाणी गायली जातात, तोपर्यंत भारत टिकून राहील.”
हिंदी सिनेमा व त्यातील गाणी यांना आपल्या आयुष्यातून वेगळे करताच येणार नाही.

मी काय करू??..........

लेखक बटाटा चिवडा यांनी रविवार, 02/12/2012 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
मी काय करू??.......... तो रिटायरमेंट घेणार आहे म्हणे.. मग मी काय करू?? त्यांचं स्मारक इथं नाही तिथं बांधणार म्हणे मग मी काय करू?? त्याच्या त्या मुव्ही मध्ये ती मर्डरर नाहीये म्हणे मग मी काय करू?? म्हणे तो तर डेंग्यू ने मेलाय मग मी काय करू?? तो म्हणे भारताचा नेक्स्ट पंतप्रधान मग मी काय करू?? आणि तो म्हणे भारताची नवीन WALL मग मी काय करू?? फेसबुक BAN होणार आहे म्हणे मग मी काय करू?? अरे पेट्रोल महाग ..Gas महाग महागाईची भडकलीये आग तसं म्हंटलं तर मी काहीच करू शकत नाही.. कारण ना मी "हृदयसम्राट", ना मी कोणाचा "माही" तुटपुंज्या कमाईत जगतोस रे कसा तू.. अशी कोणीच विचारपूस करत नाही

गाण्याचे व चालीचे इस्लामी करण.

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 02/12/2012 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
गाण्याचे व चालीचे इस्लामी करण. हल्लीची गाणी ऐकली एक गोष्ट ध्यानात येते ती म्हणजे गाण्यांचे झपाट्याने चाललेले इस्लामी करण... पुर्विच्या गाण्यात गावाताल्या छो~या "रामा रामा गजब हुइ गवारे" म्हणत थिरकताना दिसत. मात्र हल्ली रामा रामा शब्द जाऊन मौला.अल्ला..बंदा हुजुर...गरीब नवाज..खुदा ...असे शब्द व कव्वाली टाईप चाली वा सुफी चाली जास्त दिसतात असे निरिक्षण आहे..व त्या वर नाचणा~या नायिका... राक स्तार सिनेमच्या जाहिराति बघताना असो वा खान कंपनीचे सारेच सिनेमे असो वा इतर सिनेमे असो हे जादाच जाणवते... रेहमान बद्दल असे ऐकिवात आहे कि तो हिंदुच्या पवित्र गीता वा त्या प्रकारच्या गाण्याना चाली लवणार होता पण त्य

चारोळ्यांचे रुचकर लोणचे.

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 01/12/2012 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
(मा जागुतै यांची क्षमा मागून) साहित्य : दोन छटाक नवोदित मिपाकर (किंचित) कवी दोन चमचे यमके दोन चमचे चंद्र/ चांदणे/ पाऊस / आभाळ यापैकी आयत्यावेळी जे हाताला लागेल ते. काही लाडिक खरडी. एक चिमुट तरल भावना किंचित ठेचून. अर्धी वाटी तिखट प्रतिसाद पाव वाटी आंबट प्रतिसाद. २-३ गोग्गोड प्रतिसाद. (हे शक्यतो नवमिपाकरांचे असावे ) फोडणीसाठी बेताचे उपरोधिक प्रतिसाद. कृती : प्रथम नवोदित कवी लाडिक खरडीमध्ये घोळवून एक महिना मुरत ठेवावेत. या काळात आंबट तिखट प्रतिसादांचा अभ्यास करावा.

चारोळी: पाऊस प्रणय रात्र!

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 01/12/2012 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
~~~~ धुंद संथ पाऊस धारा... ~~~~ मंद थंड भावुक वारा! ~~~~ अधीर मन उत्सुक गात्र... ~~~~ अनंत क्षण प्रणय रात्र!
काव्यरस

"शिवराय"

लेखक अनिल तापकीर यांनी शनिवार, 01/12/2012 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
त्रासली गांजली जनता, नाही कोणी वाली | तारावा हिंदुधर्म, साकडे देवास घाली | दाही दिशा माजले दैत्य,गिळती महाराष्ट्रासी | झाली मंदिरे जमीनदोस्त,भग्न केले देवांसी | लेकी सुनांच्या अब्रूला,नाही राहिले रक्षण | वतनदारांना तर प्रिय आपलेच वतन | संत महात्म्यांनी केला देवाचा धावा | या धरतीला ताराया अवतार घ्यावा | संतांची गरीब रयतेची, देवास आली दया | म्हणूनच देवांनी पाठविला शिवराया | शिवरायांनी ऐसे अघटीत केले | शून्यातून स्वराज्य उभे राहिले | अफझलचा कोथळा बाहेर काढीला | औरंग्याचा तर माजच जिरवला | आदिलशहा निजामासी जागीच रोखले | इंग्रजांसी मुंबईच्या वखारीतच कोंडले | संतांचे देवालयांचे केले रक्षण | खळ, नि दु
काव्यरस