Skip to main content

लाईफ ऑफ पाय : मला भलताच आवडलेला चित्रपट

लेखक विसुनाना यांनी गुरुवार, 17/01/2013 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणजे काय आहे की - या समस्त जगातील कोणत्याही गोष्टीचे, वस्तूचे अथवा प्राणीमात्राचे समिक्षण करण्यास मी एक अत्यंत नालायक मनुष्य आहे (हेही समिक्षण त्यात आले असावे.) याचे कारण असे की एखादी गोष्ट /वस्तू / प्राणीमात्र मला आवडले की भलतेच आवडते आणि वाईसे वर्सा. मग त्यात उडदामाजी असलेले काळे-गोरे मला दिसत नाही.

सोलर मॅक्सिममच्या वातावरणावर होणार्‍या परीणामांबाबत

लेखक चैतन्यकुलकर्णी यांनी बुधवार, 16/01/2013 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
सोलर मॅक्सिममच्या वातावरणावर होणार्‍या परीणामांबाबत आपल्याकडे वर्तमानपत्रे व सरकारकडून कोणतीच माहिती दिली जात नाही. वस्तुतः सध्याच्या काळात वातावरणावर परीणाम करीणारी महत्वाची बाब म्हणून समोर येत असताना सरकार जनतेला स्पष्टपणे सांगताना दिसत नाही. मध्य-पश्चिम भारत, विषेषत: महाराष्ट्र, कर्नाटक भागात दर १० वर्षांनी दुष्काळाचे नवीन चित्र सामोरे येत असताना, सरकारने याविषयी संशोधन करून जनतेला त्याबाबत सावध करायला पाहिजे.

स्त्रीस श्रद्धांजली

लेखक सांजसंध्या यांनी बुधवार, 16/01/2013 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंबर मधे बलात्कार झालेल्या एका आठ वर्षाच्या मुलीचं टाकून दिलेलं प्रेत मिळाल्याची बातमी नुकतीच वाचनात आली, पाठोपाठ लखनौजवळच्या गावात ट्रेनमधे सामूहिक बलात्कार करून विवाहितेला झाडाला फाशी दिल्याची बातमीही ! अशा दोन चार ओळीच्या अनेक बातम्या दिसू लागल्या..
काव्यरस

प्रकाशन सोहळा..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 16/01/2013 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, नमस्कार, माझ्या सगळ्या मित्रमैत्रीणींना कळविण्यात अत्यंत आनंद होतो आहे की, माझी आई प्रख्यात लेखिका सौ. मंजुश्री गोखले, हीच्या २५ व्या पुस्तकाचे म्हणजेच, "ओंकाराची रेख- जना" या कादंबरीचा प्रकाशन सोहळा, शुक्रवार दि. १८ जाने २०१३ रोजी, संध्याकाळी ५.०० वाजता, चित्तरंजन वाटिका, मॉडेल कॉलनी, पुणे.. येथे संपन्न होणार आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.

कुंकू का लावतात

लेखक शुचि यांनी बुधवार, 16/01/2013 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
रामायण वाचल्यानंतर "रामाची सीता कोण?" असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतेच. अमेरीकेत खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की "हिंदू स्त्रिया, कपाळावर कुंकू का लावतात?" मी बरेचदा , व्यक्ती आणि तिचा कल पाहून "फॅशन" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेते. तर काहींना सांगते की "लग्नानंतर लाल कुंकू लावयच" परंपरा आहे. मग पुढचा प्रश्न येतो "पुरुष गंध का लावतात?" आणि मी निरुत्तरशी होते. पण काही मित्र मैत्रिणी हे जवळचे असतात मग त्यांना सविस्तर सांगते की योगशास्त्राच्या तत्वज्ञानानुसार, शरीरात अनेक अध्यात्मिक चक्रे असतात.

अलिबागचा समुद्रकिनारा / सुर्यास्त / गणपती विसर्जन: काहि छायाचित्रे!

लेखक पांथस्थ यांनी बुधवार, 16/01/2013 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा वाचल्यावर आठवले कि आपणहि काहि महिन्यांपुर्वी अलिबागला जाउन आलो आहोत आणि छायाचित्रेही काढली आहेत. पण त्यावेळी वेळ नसल्याने अथवा काहि कारणाने मिपावर टाकणे राहुन गेले. मी गणपतीच्या काळात (२०१२) पुणे-अलिबागला एक चक्कर टाकली होती त्या दरम्यान अलिबागला काढलेले हे काहि फोटो. गणपतीच्या ५व्या दिवशी हे फोटो अलिबागच्या समुद्र किनार्‍यावर काढलेले आहेत.

पाकिस्तानमध्ये काय होईल?

लेखक ऋषिकेश यांनी बुधवार, 16/01/2013 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानची निर्मिती ही धर्माधिष्ठित असली तरी प्रत्यक्षात त्या भागात एकाच प्रकारची संस्कृती नव्हती. किंबहुना भारताइतकेच प्रांताप्रांतात असणारे चालीरीतीतील बदलच नव्हे तर भाषा, आचार, विचार याबाबत संपूर्ण पाकिस्तानात वेगवेगळे मतप्रवाह, जनसमुदाय होते - आहेत. भारताला जसे एका घटनेने (संविधानाने या अर्थी) बांधले आहे तसे पाकिस्तानचा 'बायंडिंग फॅक्टर' हा धर्म वाटला, असला तरी त्यांहून मुख्य फॅक्टर होता 'भिती'.

कोबी पराठा.

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 16/01/2013 02:55 या दिवशी प्रकाशित केले.
लहाणपणी "कोबी" अन त्याची भाजी हे एक माझ्या नाकासाठी छळवादी प्रकार होते. का कुणास ठाउक पण कोबी काही माझी लहाणपणाच्या आठवणीतली,"रम्य, चविष्ट,तों.पा.सु." भाजी नाही. मग वयाने मोठ व्हाव लागल, अन पानात पडेल ते मुकाट खाण हे रितीला धरुन मान्य कराव लागल. तरीही, कोबी असला की मी दही-साखर, तिळकुट, तोंडी लावणे, यावर जास्त भर देत शक्यतो कोबी शेवटपर्यंत राखुन ठेवत असे. मग झाल लग्न; अन रोजच्या," आज काय करायच?" या प्रश्नाबरोबर टिफीन फ्रेंडली भाजी म्हणुन मला या"गड्ड्याला" शरण जावं लागल.

रक्तामधील घटकांचे आणि रक्ताभिसरणाचे नियंत्रण

लेखक आनंद घारे यांनी मंगळवार, 15/01/2013 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
शरीरामधल्या रक्ताची विविध प्रकाराने तपासणी करून आणि रक्तदाब, नाडीचे ठोके वगैरे अनेक गोष्टींचा अभ्यास करून त्याचा उपयोग रोग्याच्या शरीराची अवस्था समजून घेण्यासाठी आणि त्याच्या व्याधीचे निदान करण्यासाठी केला जातो. हे करतांना त्याच्या रक्तामध्ये काही दोष किंवा तृटी आढळल्या तर त्यावर औषधोपचार करतात. काही बाबतीत रक्ताच्या तपासणीमध्ये सगळे काही व्यवस्थित निघाले तरी व्याधीच्या निवारणीसाठी त्याच्या गुणधर्मांमध्ये थोडा बदल करणारी औषधयोजना केली जाते.