माय
माय....
मला सुटता सुटेना
माझ्या लेकराची माडी ..
जोडले घरटे कधी रे
वळखीची काडी काडी..
माझ्या पंखातला चिमणा
नवं घरटं बांधतो ..
वेळ नाही माझ्यासाठी
मला दबकत सांगतो ..
नव्या घरट्यात असल
नव्या चिमणीचे राज्य
बघ माऊलीचे पंख
कसे घायाळ रे आज ..
आज माझच लेकरु
दावी आश्रमाचा रस्ता
कशी आली पहा येळ
आज मावळतीले झुकता
पिल्लाची नवी कोठी
किती मोठी रं असावी?
पण माझ्या अडगळीस
तिथे जागा का नसावी?
प्रभु एकच मागणे
पिल्ला दु:ख न मिळु दे
जरी मिटले डोळे माझे
तरी त्याला न कळु दे ..
सरणाच्या चितेवर
जेव्हा बाळ माझं रे रडेल.
तेव्हा चितेतल्या आगीत रे
माझा देह कळवळेल ..
– कवी पंचम (निशांत तेंडोलकर)
काव्यरस
मिसळपाव