पोटभर जेवा !
तर मंडळी देशात सगळं कसा आनंदी आनंद आहे ! अहो कसा नसणार आपल्या नेत्यांनी पोटभर जेवणाची सोय केली आहे.राज बब्बर म्हणतात १२ रु आजपण मुंबईत पोटभर जेवण मिळते. तर त्यांच्याच पक्षातील रशिद मसुद यांनी तर फक्त ५ रु दिल्लीत पोटभर जेवण मिळेते. दिल्ली मुंबई पेक्षा इतके स्वस्त आहे आणि ५ रु च्या जेवणासाठी मुंबईत १२ रु मोजावे लागतात त्यामुळे मुंबईतल्या महागाईचा मी निषेध नोंदवतो.
मी म्हणतो देशातल्या लोकांना या गोष्टीचा आत्ता पर्यंत पत्ता कसा लागला नव्हता ? इतकी स्वस्ताई तुम्ही किती वर्षापुर्वी अनुभवली होती बरं ? आठवुन सांगाल काय ? काय फार विचार करायला लागतोय ? नक्की कधी ते आठवत नाही ?
मिसळपाव
