आपण खरेच पुरोगामी आहोत का?
नरेन्द्र दाभोलकरांच्या हत्येचे वृत्त हे मला त्याच्याशी वैयक्तीक ओळख नसली तरी व्यक्तीशः आणि एकंदरीतच सामाजीक स्तरावर अस्वस्थता आणणारे ठरले. जर समाजास (त्यात मी केवळ सामान्य माणूस धरत आहे, राजकारणी नाही) त्यातून खरेच अस्वस्थता आली असेल, तर तो महाराष्ट्रासाठी आशेचा किरण आहे. २०१० च्या जर्मन बेकरीवरील दहशतवादी घातपातापेक्षाही पुण्यासारख्या शहरात घडलेली ही एकच हत्या जास्त गंभीर आहे असे कुठेतरी वाटते. हल्ल्यास भ्याड म्हणावे का थंड डोक्याने आखलेला कट हे काळच सांगेल.
मिसळपाव