Skip to main content

सैतानाचा आरसा - शतशब्दकथा

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 23/09/2013 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
मी एखाद्या पिसाटा सारखा बेफाम धावत होतो. पुढे ती जीवाच्या आकांताने सैरावैरा पळात होती. माझ्या नजरेत विखार होता. तिला मी रोज पहायचो. आज तिला सोडायचे नाही असा निर्धारच मी केला होता. रडत, धडपडत, अडखळत, भेलकांडत धावताना ती मदतीसाठी केविलवाणे किंचाळत होती. एका क्षणी मी अगदी जवळ पोचून निर्दयपणे तिची ओढणी खेचली. ती घाबरुन अजूनच जोरात धावायला लागली. तिच्याकडे पहात धावताना मी एका दगडाला अडखळलो, तेवढ्यात ती एका बंगल्यात घूसली. गेट लावायची तिची धडपड सुरु असतानाच मी तिथे पोचलो आणि चवताळून त्या दिशेने झेप टाकली. तिने धाडकन गेट बंद केले.

नवीन नाटक - अलिबाबा आणि चाळीशीतले चोर

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 23/09/2013 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा वाजपेयी, मुशर्रफ, माधुरी दिक्षीत आणि मार्गारेट थॅचर रेल्वेच्या एकाच बोगीतून प्रवास करत असतात. सर्वजण प्रसिद्ध व्यक्तिमत्वे आणि त्यातले तिघेजण राजकारणी. त्यामुळे ते अतिशय प्रगल्भपणे व राजकीयदृष्ट्या योग्य भूमिका घेउन गप्पा मारत असतात. अचानक एक मोठा बोगदा येतो. रेल्वे बोगद्यात शिरल्यावर डब्यात अंधार येतो आणि अचानक डब्यातले दिवे जातात. आता पूर्ण अंधार झालेला असतो. अचानक कोणीतरी कोणाचे तरी चुंबन घेतल्याचा आवाज येतो व त्यापाठोपाठ कोणीतरी कोणाच्या तरी जोरात थोबाडीत मारल्याचा आवाज येतो. नंतर एकदम शांतता पसरते. बोगदा संपतो आणि डब्यात उजेड येतो. सर्वांना मुशर्रफचा गाल लाल झालेला दिसतो.

असले कसले जेवण केले

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 22/09/2013 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
असले कसले जेवण केले जेवण केले अन हात धुतले धुतलेले हात टॉवेलला पुसले घरी येतांना खुप भुक लागली लगेच आयत्या ताटावरती बसले आमटीत होते पाणीच पाणी जळक्या पोळ्यांचेही आकार कसले! ईईई आळणी भेंडी करपा भात तसेच खावून उपाशी मी उठले काय नशिबी आले माझ्या जेवण हे बेचव असले कित्ती हौसेने आयटीतला नवरा केला तेथेच आयटीतली बाई मी फसले सांगितले कितीदातरी त्याला नको बनवूस जेवण असले कसले पुढल्या जन्मी एखाद्या शेफशीच करायचे लग्न मनी ठसले एकदाचे जेवण केले अन हात धुतले धुतलेले हात टॉवेलला पुसले - डू द लुंगीडान्स, पाभे
------------------------ दिर
काव्यरस

लंच बॉक्स !

लेखक सुधीर मुतालीक यांनी रविवार, 22/09/2013 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
… खूप दिवसांनी एक खल्लास सिनेमा बघितला. लंच बॉक्स. मस्त आहे. आजवर मी बघितलेल्या लव स्टोरी मधली एकदम हळुवार स्टोरी आहे. अगदी अंगावरून मोरपीस फिरवणारी. गुदगुल्या आणि रोमांच. यांचा एकत्रित लेप धमाल आणतो की नाई? अगदी तसं वाटतं लंच बॉक्स बघताना .रितेश बत्रा नावाचा कुणीतरी दिग्दर्शक आहे. नवखा आहे. त्याचा पहिलाच पिक्चर. या पिक्चरची आणखी एक गंमत आहे. नट नट्या पेक्षा निर्मात्यांची संख्या ज्यास्त आहे.

नोकरी कि धंदा ?

लेखक स्वतन्त्र यांनी रविवार, 22/09/2013 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या माझ्या घराचे बांधकाम चालू आहे.मी बर्याच ठेकेदारा मार्फत काम करून घेतले.उदा. टाइल बसवणारे लोक UP मधून आलेले आहेत. त्यांचा ठेकेदार साधारण १७ वर्ष पुण्यात आहे. सुरवातीला बिगारी काम करून ३-४ वर्षातच ठेकेदारी करू लागला. शिवाय तिकडून येथे मजुरी काम करायला येणारे लोक बरेच असल्यामुळे त्यांना मजूर मिळवायला विशेष अडचण येत नाही. काही लोक जे इथे ३० -३५ वर्ष आहेत त्यंनी तर इतकी संपत्ती साठवून ठेवली आहे कि आपण सामान्य माणस फक्त कल्पनाच करू शकतो. या वरून मला पडलेले काही प्रश्न. सध्या अधिक पैसा कशात आहे ?

॥ नामा म्हणे प्रदक्षिणा ॥

लेखक अनिल तापकीर यांनी शनिवार, 21/09/2013 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञानेश्वर माउलींच्या जीवनावरील कादंबरी वाचन श्री पद्माकर गोवईकर यांनी "मुंगी उडाली आकाशी " या ध्वनिफितीत अतिशय सुंदर केले होते. मी ते सतरा अठरा वर्ष्याचा असताना ऐकले होते. आणि वारंवार ऐकत होतो. त्यामध्ये एक प्रसंग होता की आळंदीच्या ब्राम्हणांच्या छळाला कंटाळून विठ्ठल पंत मुलांना घेऊन ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा करायला त्य्रंबकेश्वर येथे जातात व ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा करतात. तेथे असा उल्लेख केलेला ऐकला होता कि ब्रम्हगिरिचि प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते. कारण ब्रम्हगिरीचा पर्वत म्हणजे साक्षात शंकर आहे.

अडगळीतल्या आठवणींचा पसारा.. (४)

लेखक शिवोऽहम् यांनी शनिवार, 21/09/2013 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
अडगळीतल्या आठवणींचा पसारा.. (३) The evil that men do lives after them The good is oft interred with their bones.. फ्रंटलाईन् हे कडव्या डाव्या गटातले पाक्षिक, हिंदु समुहाचं. सरकारी पॉईंट्-ऑफ-व्ह्युपेक्षा वेगळं, अगदी १८० अंश विरुद्ध. मातब्बर लेखक मंडळी. एन् राम, असघर अली इंजिनिअर, नूरानी ही नावं आठवतात. त्यावेळी प्रवीण स्वामी, जयती घोष, चित्रा सुब्रह्मण्यम हे तरूण रक्ताचे पत्रकार उमेदवारी करत होते तिथे. नंबुद्रीपादही लिहीत असत कधीतरी. डेन्स मॅटर असे. चित्रेही असत. मद्रास रबर फॅक्टरीच्या, टी. व्ही.

परंपरा

लेखक rakhee यांनी शुक्रवार, 20/09/2013 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
आताच एक खूप सुंदर लेख वाचला लोकसत्ता मध्ये Dr राजीव शारंगपाणी यांचा . "लोढणी टाका " आयुष्य मजेत जाईल. http://www.loksatta.com/lokrang-news/add-to-liability-190768/ खरच आपण कळत नकळत किती ओझी वाहत असतो नाही !! गणपती, गौरी अनेक गोष्टी फक्त पूर्वापार चालत आल्यात म्हणून करतो . आजच्या जीवनात त्याचा काही एक मेळ बसतो का ? गणपती बसवणे लोकमान्य गंगाधर टिळकांनी ज्या कारणाने सुरु केला तो हेतू आता उरला आहे का ? मात्र आता आपण गणपती बसवून फक्त पैशाची नासाडी करतो . प्रदूषण वाढवतो . loud speaker लाऊन धिंगाणा घालतो .

देव नावे भिक्षा चालुच राही....

लेखक निश यांनी शुक्रवार, 20/09/2013 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
देव नावे भिक्षा चालुच राही पोटांस ह्यांच्या तडस नाही. ह्यांना झाला भस्म्या माणुसकीचा माणसांची श्रध्दा खात सुटती. देवही आता ह्यांच्या दयेचा भुकेला ह्यांच्या घरी सदा तुप आणी लोणी. देवही असा पराधीन झाला लागली नजर त्याला ह्या डोमकावळ्यांची. सत्तेचा ह्यांना अस माज आला माणसाचा ह्यांनी गुलाम हो केला. देवास नाही गरज पैशांची तो तर भक्तांच्या भक्तीचा भुकेला. भ़क्तीचा ह्यांनी बाजार मांडला देवासही ह्यांनी कैदेत डांबला. म्हणे दास निश जागे व्हा तुम्ही देव चराचरी तुम्हां आम्हां ठायी. देव चराचरी तुम्हां आम्हां ठायी. (देवाचा बाजार मांडुन तुंबड्या भरणार्‍या भोंदु लोकांचा निषेध करावा म्हणुन ही कविता

ओदिशा - ३ : नृसिंहनाथ आणि हरिशंकर

लेखक सुधीर कांदळकर यांनी शुक्रवार, 20/09/2013 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
१७-११-२०११. चारच्या सुमाराला नृसिंहनाथ मंदिराच्या आवारापाशी पोहोचलो. राहायला इथे ओरिसा पर्यटन खात्याचे यात्री निवास आहे. अगदी गलिच्छ निघाले. मंदिराचे अतिथी निवास मात्र कमी वाईट निघाले. सकाळी गरम पाणी नाही पण विजेवरचा हीटर मिळेल म्हणाला. खोलीचे भाडे नाममात्र. रु. ३५०/-. मंदिराला देणगी पण द्या म्हणाला. जेवणाला हॉटेले नाहीतच. फक्त टपर्‍या. त्याही ग्रामीण. पण अगदीच गलिच्छ. स्वच्छतेचे तसे वावडेच. त्यापेक्षा मंदिरातच ‘भोग’ चे जेवण मिळते ते जेवा म्हणून अतिथी गृहाचा सेवक म्हणाला. जेवणाची वेळ दुपारी १२.०० आणि रात्री ८.००. मंदिरातल्या आवारात फलकावरही ही वेळ लिहिलेली होती.