Skip to main content

तुमचे शरीर अपचन कसे हाताळते?

लेखक आनन्दा यांनी शुक्रवार, 05/09/2014 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस मिपावर एक प्रशन विचारायचा म्हणतोय, आज विचारूनच टाकूया. मला दोन प्रश्न आहेत, तुम्हला अपचन होते तेव्हा तुम्ही काय करता? १. मला लगेच मळमळायला लगते, आणि मग उलटी होते २. करपट ढेकरा येत राहतात. आणि नंतर जुलाब होतात. ३. काही नाही, सकाळी ते असेल त्या परिस्थीतीत बाहेर पडते. ४. प्रचंड गॅस होतो, पोट फुगते, सगळे चक्रच बिघडते.. औषध घेतो हा पर्याय क्रुपया वापरू नये. औषधाशिवाय काय होते ते लिहावे. आता या प्रश्नाने गोंधळात पडला असाल तर पुढचा प्रश्न - तुम्हाला जेव्हा एखाद्या परिस्थिती पटत नाही, पण बोलण्यासारखी परिस्थिती नसते.

फेसबुकची वचवच- आणि वचावचा करणारं फेसबुक!

लेखक अन्नू यांनी शुक्रवार, 05/09/2014 15:52 या दिवशी प्रकाशित केले.

सध्या सोशल नेटवर्किंगची क्रेझ चालू आहे मग ती ट्वीटरवरची टीवटीव असो नाहीतर, फेसबुकवरची गपशप असो. सगळीकडेच अगदी या साईट्स हातपाय पसरत असलेल्या दिसत आहेत. त्यात ट्वीटरचा विचार केला तर तिथे जास्तकरुन सेलिब्रिटीजचीच टीवटीव आपल्याला ऐकायला येते. सामान्य माणुस मात्र जास्त टीवटीवत नाही, त्यामुळेच कदाचित तो फेसबुकवर पडीक असतो! फेसबुक. म्हणजेच थोडक्यात आपलं- FB ! –यात एक गोष्ट मात्र मला जास्त इंटरेस्टींग वाटते, ती म्हणजे फोटो अपलोडींग आणि टॅगिंग. इथे प्रत्येकजण आपल्या भावना जास्तकरुन वेगवेगळ्या इमेजेसमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो.

आदि कैलास ओमपर्वत दर्शन यात्रा,पार्वती सरोवर परिक्रमा.भाग-९

लेखक खुशि यांनी शुक्रवार, 05/09/2014 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
गुंजी. व्यासभूमीचे प्रवेशद्वार. कैलास यात्रेचा बेस कॅम्प. येथे डोंगरावर व्यास मंदिर आहे, छोटे पण सुंदर. येथेच त्यांनी श्रीगणेशाच्या हस्ते १८ पुराणे लिहिवली अशी आख्यायिका आहे. गुंजी, रौकाँग, नम्पा, नाभि आणि कुट्टी ह्या पाच गावांची मिळून होते व्यासभूमी. येथील रहिवासी व्यासऋषींचे वंशज आहेत. त्यांच्याप्रमाणेच बुद्धिवान आणि शिवभक्त. दर राखीपौर्णिमेला या गावांचा गुंजीमध्ये मोठा उत्सव होतो. पारंपारिक नृत्य, पूजा, प्रसाद असा पाच दिवसांचा कार्यक्रम असतो. त्यासाठी स्थानिक नागरिकांबरोबरच देश-परदेशात काम-धंद्याच्या निमित्ताने राहात असलेले सर्व नागरिक येतात.

गोजिरी

लेखक विअर्ड विक्स यांनी शुक्रवार, 05/09/2014 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
एक होती गोजिरी, रुसुनी बसली कोपरी काही केल्या बोलेना, तिच्यापुढे आमचे काही चालेना नाक आहे छोटेसे, गुस्स्यात होते थोडे मोठेसे खळी पडते गालावर, गुस्स्यात पडे कपाळावर आकाशी उडे जसे पाखरू, तसे नाजूक आहे माझे कोकरू शिंगांनी जरी देई मार, माया आहे मनी फार -विअर्ड विक्स (चाल बडबड गीताप्रमाणे लावावी. हे बडबड गीत म्हणून सुद्धा चालू शकते. परंतु हे गीत अल्लड, निर्मळ नि कोमल मनाच्या प्रेयसीला ही सादर करू शकता...)
काव्यरस

परिघ परिक्रमा

लेखक वडापाव यांनी शुक्रवार, 05/09/2014 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
बीजगणित हा माझा आवडता विषय. मला समीकरणांची उत्तरं शोधायची भारी हौस. पण 'डावीकडची बाजू उजवीकडच्या बाजूशी समान आहे हे सिद्ध करा' हा प्रश्न माझा स्वाभिमान दुखवत आलाय, आणि मला नाउमेद करत आलंय, नेहमीच. एकतर ज्या प्रश्नाचं उत्तर मला आधीपासूनच समोर दिसतंय तेच कसंतरी मटका मारून, नाहीतर पुस्तकात छापलेली पद्धत वापरून आपण आणणं अपेक्षित असतं. त्याचं कसलं कौतुक करायचं? आणि समजा ते उत्तर सिद्ध करता येत नसेल, मग तर माझं टाळकंच हटायचं. येत नाही म्हणजे काय! समोर एवढं ढळढळीतपणे दिसतंय म्हणजे यायलाच हवं. आपल्याला आधीपासूनच ठाऊक असलेल्या ठिकाणीच जर जायचं असेल तर प्रवासाचा उत्साह कसा निर्माण करावा माणसानं?

आपण का लिहिता?

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 05/09/2014 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज आपण अंतर्जालावर लिहितो. पण का लिहतो? हा एक प्रश्न किती दिवसांपासून मनात येतोय. आपण लिहितो त्या मागे काही कारणे असतातच. म्हणून हा प्रश्न. माझ स्वत:चे म्हणाल तर वयाच्या पन्नासी नंतर अंतर्जालावर आपण लिहू शकतो हे आणि लोक ते वाचतील ही. मी मोडकी-तुटकी का होईना मराठीत लिहायचा निर्णय घेतला. अर्थात लिहिताना पुष्कळ समस्या आल्या पण लिहिणे सुरु ठेवले. माझा लिहिण्याचा उद्देश्य समाजातले आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक सत्य लोकांसमोर ठेवणे. सत्याबाबत म्हणाल तर सहा आंधळ्यांनी, सहा प्रकारे हत्तीचे वर्णन केले.

स्वामी चेकाळदर्शी उवाच: प्रतिगामीस्य किम् लक्षणं?

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 05/09/2014 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या चेकाळपंथी आशारामा, स्वतःच्या सोयीसाठी केलेल्या गोष्टींनासुद्धा धर्मतत्वाचा मुलामा चढवायची, आपली जुनी हौस कायम आहे वाटते. उपजत धार्मिक, निस्वार्थी, निर्मोही अशी स्वतःच बनविलेली, स्वतःची प्रतिमा डागाळू नये म्हणून आपली तत्वशून्य वागणूक लपविण्याचे प्रयत्न आपणाला हातचलाखीने आजही तुरुंगातूनच करावेच लागतात.

अफगाणिस्थान..........

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 05/09/2014 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
अफगाणिस्थान.......... ब्रिटिशांचे यशस्वी माघार घेतलेले सैन्य.....एकांडा डॉ. ब्रायडॉन. Simple, Free Image and File Hosting at MediaFire जलालाबादच्या ब्रिटिश तळावर राकट चेहऱ्याच्या कर्नल डेनीने सगळ्यात उंच इमारतीवरुन आपली दुर्बिण समोरच्या वैराण प्रदेशावर रोखली व तो प्रदेश काळजीपुर्वक न्याहाळला. दुरवर दिसत असलेल्या डोंगरापर्यंत त्याला काहीच हालचाल दिसली नाही. त्याने एक सुस्कारा सोडला.

ब्रह्मांड

लेखक मराठे यांनी शुक्रवार, 05/09/2014 02:49 या दिवशी प्रकाशित केले.
शहरांत रोज होणार्‍या हजारो अपघातांसारखच त्या गाडीचा अपघात झाला. बहुतांश अपघातांप्रमाणेच इथेही चालवणार्‍याचीच चूक होती आणि त्याचाच मृत्यु. त्याच्या मागे बायको आणि दोन मुलं. नशिबाने ती वाचली. अ‍ॅम्बुलंस आली, आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण काही उपयोग झाला नाही. शरीर छिन्नविछिन्न झालेलं होतं, मेला ते एका अर्थी बरंच झालं. आणि मग तू मला भेटलास. "काय.. काय झालं? कुठे आहे?, भेदरून जाऊन तू विचारलंस. "तू मेला आहेस" मी शांतपणे सांगितलं, उगाच शब्दांना सोन्याचा मुलामा देण्यात काय अर्थ होता? "माझ्या समोर तो ट्रक अचानकच आला... मी कचकाऊन ब्रेक मारला..." "हो" मी म्हणालो. "मी ..

दयेव...

लेखक धन्या यांनी शुक्रवार, 05/09/2014 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
"तुमी कदी घरी जानार हाव?" मी बाबांना विचारलं. घरी म्हणजे गावी, कोकणात. आठवडाभराने गणपती येणार होते. दोन काका, तीन आत्या सारेच मुंबईला. आम्ही पुण्याला. तयारी करण्यासाठी कुणीतरी लवकर गावी जाणं आवश्यक होतं. "येग्दिवस तरी आदी जाया लागंल. आरास कराय पायजे ना." बाबांचं उत्तर. आरास म्हणजे गणपतीच्या बैठकीची सजावट. मी कॉलेजला जायच्या वयाचा होईपर्यंत आमच्या गणपतीची आरास म्हणजे एक दिव्य प्रकार होता. गणपती एव्हढया उंचीवर बसवला जायचा की आम्हा लहान मुलांचा हात गणपतीच्या पायापर्यंतही पोहचत नसे. साधारण १९६० च्या आसपास माझे आजोबा आणि त्यांचे दोन भाऊ यांनी फक्त साडे पाचशे रुपयांत घर बांधले.