Skip to main content

मराठी व्याकरण

लेखक पालव यांनी शुक्रवार, 14/11/2014 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
काल मुलाला इन्ग्रजी चे ग्रामर शीकवत असताना त्याने मला मराठीत पन असे काही ग्रामर असते का विचारले. मराठी व्याकरण शीकुन आता २०-२५ वर्शे लोटली आहेत. आता फार थोडे आठवते. शाद्रुल्वीक्रीडीत, गण, यमक, अलन्कार, अनुप्रास भुजन्ग्प्रयाअस असे बरेच काही होते. ह्या वीषयावर काहि काथ्याकूट ह्यापुर्वी मी. पा वर झाला आहे का? काही दुवा असला तर जाणकारानी शेअर करावा. मला आठवनारी काही अपुर्न उदाहरने ....व्रुत्ते/अलन्कार नववधु---- नववधु प्रीया मी बावरते लाजते पुधे सरते मागे फीरते कले मला तु प्रन सखा जरी कले तुच आधार सुख जरी मन्दारमाला--- सतत करीत मन्दारमाला गुरु एक त्याचाही अन्ती वसे

भगवद गीतेतील ११४ वा श्लोक; श्रद्धा आणि अंधश्रद्धेचे महात्म्य

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 14/11/2014 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या पाल्याच्या शाळेत अलिकडे परि़क्षेचे का कशाचे फॉर्म भरून घेताना विद्यार्थ्यांनी आपले वय वर्षे बरोबर काऊंट करावेत म्हणून एक छान शक्कल लढवली, भगवद गीतेचा श्लोकांमधील ११४ वा श्लोक कसा जादुई आहे पहा, ११४ मधून तुम्ही तुमच्या जन्मवर्षाची शेवटचे दोन आकडे मायनस केले की तुमचे वय वर्षे अचूक कॅल्क्यूलेट करता येतात. हा भगवद गीतेचा प्रसार केलेल्या वर्गातील विद्यार्थी, इ.स. २००० पुर्वीच जन्मलेले असणार होते. बर्‍याच विद्यार्थी विद्यार्थीनींनी आपली आपल्या आई वडलांची मित्र मैत्रिणींची वय वर्षे मोजून पाहिली आणि चकीत झाली.

एक अडनिड गावाची गोष्ट... १

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 14/11/2014 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा आहे का? नाही ही कथा नाही, पण जे काही घडले होते ते एखाद्या कथेतीलच असते. तर किती बरं झाले असते. असं झाले असते, तसे झाले असते असे म्हणून आता काय उपयोग! जे घडायला नको होते ते घडले होते. देवासारखी माणसं शैतानागत वागली म्हणायची की भूताने झपाटली म्हणून तशी वागली ते त्या बिरोबालाच ठाऊक. पण जे काही घडलं भयंकर होते, असे कधी घडेल आणि त्या पापाची फळे अशी येथेच भोगावी लागतील, याची किंचित जरी कोणाच्या मनात शंका आली असती, तरी हा अनर्थ टळला असता. पण... दूरवर पसरलेलं जंगल, उत्तरेकडे आई-बापाचे दोन डोंगर, आणि त्या दोन डोंगराच्या कुशीत वसलेले, लहानसं, पण तसे संपन्न असलेले गावं!

रिवर्स अपर्थेड

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 14/11/2014 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी ब्राम्हण नाही, परंतु सध्याचे आरक्षणावरूनचे वातावरण अवतीभवती बघितले कि खालील विचार माझ्या मनात येतात. सध्याचे आरक्षण (लेटेस्ट आरक्षण सहित) जर मान्य करावे, तर ब्राम्हण समाजाला सुद्धा २% आरक्षण शिक्षण व नोकरीत द्यावे/मिळावे हि माझी प्रामाणिक कळकळ आहे.

न वढलेली बिडी आणि खाल्लेला मार ! १

लेखक Vijay Shankar Mane यांनी शुक्रवार, 14/11/2014 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
इज्या ! ........... हि मुठी मानस बिड्या वडून नाकात्न कसा धूर काडत असतील र ....... पक्या, हनम्या ,दिल्या आन मी रानात्न येताना पक्या म्हणाला ! हे बेन दुसर्याला झाडव चढवायचं आन मग आपुन मजा बगायची खालन ह्यात लय तरबेज हुत इचार करून हान्म्या म्हणाला यक डाव बिडी वडून बगायला पायजे ! मी म्हनालू आयला खरच्कि गड्या माजा आज्या पण मस्त धूर काढतो नाकात्न आयला इज्या तुजा आजा दुपारी झोपल्याव यक बिडी आणकी हळूच काढून बंडलात्न मी जरा इचार केला आन म्हनालू जर घाव्लू बिव्लु तर वल्या फोकाटीन आय मारल सांच्याला . आर घाव्ल्यावर मारलं पण घावल तर पायजे ना...

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ५

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 14/11/2014 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्‍या विश्रांती सत्रानंतर आज पाचवा डाव खेळला जाईल. आनंदला जर सामना जिंकायचा असेल तर आजचा डाव अनेक कारणांनी अतिशय महत्त्वाचा आहे. एकतर गुणसंख्या २-२ अशी समान आहे आणि आनंदची आज पांढरी मोहोरी आहेत. शिवाय उद्याचा डाव सहावा आहे तिथे सामना निम्मा संपतो.

खुशबू की दुनिया - आवडते परफ्यूम्स

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 14/11/2014 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
'मारवा' यांच्या (गंभीर्/चिल्लर्/थिल्लर - वर्गीकरण माहीत नाही) प्रश्नावरून प्रेरित होऊन म्हटलं आवडते परफ्यूम्स विषयावर एक धागा काढावा. सो; हा धागाप्रपंच. माझ्या बाबांकडून मी उचललेल्या अनेक आवडींपैकी ही एक. परफ्यूम्स. प्रचंड आवडतात, मी याच्या व्यसनाधीन आहे असंही म्हटलं जातं. पण I am okay with it. मला लागतात. मी वाण्याकडे जातानाही सेंट फवारून जातो. काय करणार आता. तर, आत्तापर्यंत मी कमी अधिक क्वालिटीचे अनेक सेंट्स वापरलेत, वापरतो. त्यातल्या काही निवडक सेंट्स ची इथे यादी करत आहे. प्रतिसादागणिक यादी वाढत जाणं अपेक्षित आहे. आवडीनुसार उतरत्या क्रमाने: हे क्रम बदलत असतात.

ऐका सत्य नारायणाssssची कथा!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 14/11/2014 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
थोडी पार्श्वभूमी.... मी १९९७ पासून हे पौरोहित्याचं काम करायला लागलो..पहिली ४/५ वर्ष ही इतरांच्या हाताखाली तयार होण्यात गेली.पुढे जसजसा या सर्व कर्मकांड आणि धर्माबाबतचा विरोधी मतांचा अभ्यास वाढत गेला..तसतसा मी स्वतः या निष्कर्षाप्रत आलो,की आपल्या जवळ असलेलं हे साधन जनकल्याणाच्या हेतूनी वगैरे जन्माला आलेलं आहे.हा एक लोकप्रीय गैरसमज आहे. महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब अंबेडकरांसारख्यांनी वैदिक धर्मावर/कर्मकांडांवर केलेले आरोप हे आकसापोटी नाहीत..तसेच त्यात परकीय शक्तिंचा हात इत्यादी काहिही नाही.