Skip to main content

भोग

लेखक अवतार यांनी मंगळवार, 27/06/2023 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
अंतरीचा ठाव माझ्या अजून मी घेतोच आहे अनंत जन्मांचे हे देणे अजून मी देतोच आहे वृक्ष छाया तापलेल्या धरणीला देतोच आहे पोळलेल्या हृदयावर मी ती छाया घेतोच आहे धीर देऊन भ्यालेल्यांना मीही तरी भितोच आहे अमृताच्या प्याल्यातूनही विष मी पितोच आहे इतरांची मी कीवच करतो परंतु मीही तोच आहे आयुष्याची शाई संपली तरीही मी लिहितोच आहे मरणाची मी वाट पाहतो तरीही मी मरतोच आहे जिंकिले जरी षड्रिपू तरी अजून मी हरतोच आहे खेळापासून सावल्यांच्या मैलन मैल पळतोच आहे सावली जरी माझी पडली परंतु मी जळतोच आहे थकलेल्या पाऊलवाटांवर परत मी फ़िरतोच आहे तरीही त्या अंतरात माझ्या अजून मी शिरतोच आहे पुष्कळ झाले पुरे करा अजून म

मातीचे पाय

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 27/06/2023 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
पायांना स्पर्शून आले ते हात मळाले होते लख्ख उमगले तेव्हा ते पाय मातीचे होते मी केवळ पाहत होतो पायांच्या खालची धूळ ती ललाटास लावावी हे एकच माथी खूळ मी इथवर पाहून आलो पाऊलखुणा विरणाऱ्या आधी खुणावत, मागून कपटी विकट हसणाऱ्या आता, पुन्हा चालावे पुढे, की परत फिरावे? सोस ना-लायक पायांचे पुसून अवघे टाकावे? प्रेमळ शब्दांची ओल मनात झिरपत नाही व्हावे नतमस्तक ऐसे पायही दिसत नाही ते सारेच निघून गेले जे पाय धरावे सुचले मातीचे पाय मातकट मागे माझ्यासह उरले - संदीप भानुदास चांदणे ( रविवार, २५/०६/२०२३)

तुका आकाशाएवढा (ऐसी अक्षरे ...मेळवीन-११)

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 27/06/2023 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
मेघदूत पुस्तक जवळच्या पुस्तकांच्या दुकानात मिळते का?हे पाहायला गेले.मेघदूत उपलब्ध नव्हते.पण पुस्तकांची मांदियाळी पाहून भारावून गेले,नजर गेली गोनीदांच्या पुस्तकांकडे ...त्यात दिसले ‘तुका आकाशाएवढा’ हे पुस्तक.वारीही जवळ येत होती,या पुस्तकानिमित्त विठ्ठल नामही स्मरणात राहील,तेव्हा पुस्तक घेतले.तारीख होती एक जून ..गोनीदांचा स्मृतीदिन !दुग्धशर्करा योग जुळून आला.तुका आकाशाएवढा याचे पहिली आवृत्ती १९८१ साली प्रसिद्ध झाली होती. तुकोबांचे बालपणीचे मित्र संतू तेली जनागडे यांनी मित्रा बरोबरीचे बहुमुल्य क्षण आठवणीच्या रुपात सांगितले आहे असे लेखण यात आहे.

भेट तुझी माझी होता.

लेखक भागो यांनी मंगळवार, 27/06/2023 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
वैशालीतली भेट! मी टिंबक्टूला कंपनीच्या कामासाठी गेलो होतो. टिंबक्टूच्या सुलतानाला त्याच्या झनानखान्याचा डेटा बेस बनवून पाहिजे होता. वयोमानपरत्वे सुलतानाची स्मरणशक्ति त्याला दगा द्यायला लागली होती. कुठल्या दिवशी कुठल्या बेगमकडे वार आहे हे समजेना. एकूण किती मुलं आहेत? आज कुणाचे डोके उडवायचे आहे? इत्यादि. तर ते काम आमच्या स्वस्त आणि मस्त कंपनीकडे आले होते. मी टिंबक्टूहून परत आल्यावर “तो धबधबा बघितलास का?” हा प्रश्न सगळे विचारणार अशी माझी अपेक्षा होती. पण तीन दिवसाच्या धावपाळीत माणूस काय काय बघणार हो?

“ चिअर्स! "

लेखक मी-दिपाली यांनी सोमवार, 26/06/2023 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
“ काय घेणार ? रम, वोडका, वाईन की या पावसात चिल्ड बिअर ? ” तिने नेहमीच्या उत्साहात विचारलं. “ कॉफी, ” त्यानेही नेहमीसारखं थंडपणे उत्तर दिलं. “ खूप बोअर आहेस रे तू. ” “ आता जे पॅकेज आहे, ते आहे तुझ्यासमोर. Want to go for return or exchange ? ” “ नको, चालवून घेईन. वैसे भी ' तेरे संग एक सिम्पलसी कॉफी भी किक देती है, तेरे संग'.. ” ती खट्याळ चेहरा करून गात म्हणाली. “ तुझ्याकडे प्रत्येक सिच्युएशनवर गाणी कशी असतात गं ? मागच्या वेळी कुठला तरी विचित्र खेळ शोधून काढला होता. त्यात कमोड सीटवरचं गाणंही आठवलं होतं तुला. काय तर...' कुछ हुआ क्या? ', ' अभी तो नही... कुछ भी नही ' अशक्य आहेस.

भारताबाहेरचा भारत -अंदमान ४

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 26/06/2023 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
मागचे भाग भारताबाहेरचा भारत -अंदमान १ भारताबाहेरचा भारत -अंदमान २ भारताबाहेरचा भारत -अंदमान ३ काल दमून भागून हॉटेलवर परतल्यावर अर्थातच अजून काहीही करायची इच्छा उरली नव्हती. वातावरणही पावसाळी होते, त्यामुळे उरलेला दिवस आराम केला आणि रात्री लवकर जेवून गॅलरीत गप्पा मारत बसलो. मग गुडूप झोपलो.

माया

लेखक अवतार यांनी सोमवार, 26/06/2023 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
अस्पर्शित संध्याकाळ घनव्याकूळ हे आकाश मेघांना भिडतो वारा तुटती थेंबांचे पाश वाळूत गिरविली स्वप्ने लाटांनी पुसली जाती हलकेच उतरतो चंद्र तिमिराच्या पंखावरती क्षितिजाने सूर्याचा मग हात घेतला हाती अंबरात नक्षत्रांच्या त्या स्निग्ध बावऱ्या ज्योती पाण्यावर येई अलगद ही चंद्रफुलाची छाया मनात आठवते मग आईची प्रेमळ माया
काव्यरस

आणीबाणी : लुटमारीचे 'उद्योग' !

लेखक सुधीर मुतालीक यांनी रविवार, 25/06/2023 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
त्या भयानक कालावधी मधली ही बाजु फारशी चर्चेमध्ये नसते... २५ जुन १९७५ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशात रीतसर आणीबाणी जाहीर केली. जगाच्या इतिहासात आजवर ज्ञात असणाऱ्या चमत्कारिक आणि भयानक पाशवी राजसत्तांपैकी एक स्वतंत्र भारताच्या नशिबी आली हे या देशाचे दुर्दैव. त्या संपुर्ण कालावधीमधली इंदिरा गांधी यांची हुकुमशाही, संजय गांधींची पाशवी अरेरावी आणि पोलिसांच्या क्रौर्याची परिसीमा या विषयी अनेकवेळा अनेक ठिकाणी लिहिले गेले आहे. त्या भयंकर परिस्थितीमधून गेलेले लोक आजही अनेक किस्से सांगत असतात.

और तुम्हारे कंधे का तील..

लेखक प्राची अश्विनी यांनी रविवार, 25/06/2023 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या नजरेतलं लाडीssक आमंत्रण स्विकारून, गालावरच्या मिरीमिठाचा तो खरखरीत स्पर्श अनुभवत, थोsडं खाली उतरलं की तुझ्या खांद्यावरचा तो एक धीटसा तीळ, खुणवून बोलवणारा. त्याला आंजारायचं गोंजारायचं आणि मग तुझ्या पाठीवरून अजून खाली जायचं. कंबरेवरच्या जुन्या व्रणांवर हळूच ओठ टेकवले की उमटणारी थरथर मुरवून घ्यायची अंगभर.. आणि मग ओठांनीच जोडत बसायचे तुझे सगळे तीळ. अगदी निवांत... जर थकले तर क्षणभर विसावायला असतोच की तुझ्या खांद्यावरचा तो हक्काचा तीळ.. .... मधेच मान वर करून पहावं तर मिशीतल्या मिशीत हसत आभाळभर मायेनं मलाच निरखणारा तू.. किती गोड चित्र असतं हे माहितीये? .... चंद्रमाधवीच्या एकशे सोळा रात्रींना

पावसाळी भटकंती - कमळगड

लेखक प्रसाद गोडबोले यांनी रविवार, 25/06/2023 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांसोबत पावसाळी भटकंती - कमळगड मिपाकरांसोबत आता भटकंतीचे योग जुळुन येणे दुर्मिळ होत चालले आहे . बहुतांश लोकं आपापल्या व्यापात , संसारात मग्न आहेत , काहींची वयं झाली , काही राज्याबाहेर गेले , काही देशाबाहेर गेले , काही मनाबाहेर गेले. त्यामुळे आता जास्त फिरणं होत नाही , झालं तरी लिहिणं होत नाही . लिहिलं तरी कधी काय सेन्सॉर केले जाईल ह्याची शाश्वती नाही . प्रवासवर्णन भटकंती वगैरे तर नाहीच नाही ! बाकी माझं आपलं एक वैयक्तिक मत आहे की भटकंती किंव्वा प्रवासवर्णन कसं असलं पाहिजे की आपलं लेखन वाचुन , फोटो पाहुन इतरांना वाटलं पाहिजे की यार हा ट्रेक करायला हवा , ह्या ग्रुप सोबत आपण जायला हवं .