Skip to main content

क्षण

लेखक rutusara यांनी मंगळवार, 29/09/2015 02:54 या दिवशी प्रकाशित केले.
“सांगा कसं जगायचं ? कण्हत कण्हत…की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा !” पाडगावकरांची एक अत्यंत गोड कविता. पहिल्यांदा वाचली तेव्हा खूप आवडली. त्यानंतर प्रत्येक वेळेला त्याहून जास्तच आवडत गेली. खरंच किती सुंदर कल्पना आहे. गाणं म्हणत जगायचं ….प्रत्येक दिवस म्हणजे एक नवीन गाणं.. आणि त्या गाण्याला जिवंत करतो आपण, आपल्या आजूबाजूची माणसं आणि आपले अनुभव!

एका 'कोसला'प्रेमीचे प्रेमप्रत्र

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 29/09/2015 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
(हे विडंबन नव्हे, ही 'कोसला'ला दिलेली एक मन:पुर्वक छोटेखानी सलामी - जव्हेरगंज) ******** प्रती :- शंभरातील एकास... प्रिये मी हा असा उकिडवा बसलोय. तुलाच पत्र लिहीत. बनियन बाहेर वाळत घातलाय. आंघोळ अजुन व्हायची आहे. साबणही संपलाय. तुझी खुप आठवण येते. उदाहरणार्थ बादलीत पाणी वगैरे काढलयं. सकाळी तुला बघितलं. भाजी मंडईत. घासाघीस करत होतीस. गुलाबी परकर पोलकं चांगलं होतं. बरी दिसलीस. मी तिथेच शेजारी ऊभा होतो. उदाहरणार्थ झिपऱ्या वगैरे नीट बांधत जा. परवा मागच्या बाकावर बसणारा प्रभुणे तुझ्याकडे बघत होता. तुला द्यायला त्यानं फुलपण आणलं होतं. मी म्हणालो, ती आपली लाईन आहे.

सनसेट बुलेव्हार्ड

लेखक अजिंक्य विश्वास यांनी सोमवार, 28/09/2015 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
सनसेट बुलेव्हार्ड नुकतेच रॅंडम वेब पेजेस्‌ सर्च करत असताना एक लिंक हाती लागली. ’ २४ मूव्हीज्‌ विथ ग्रेट ओपनिंग सीन्स’ ही लिंक हाताला लागली आणि सहज चाळत असताना ’सनसेट बुलेव्हार्ड’ चे नाव समोर आले आणि सर्र्क्कन अंगावर काटा आला. मी कित्येक लोकांना ’कुठले चित्रपट पाहू?’ हा प्रश्न विचारला नसतानादेखील मी ह्या चित्रपटाचे नाव सुचवले आहे. मला खुद्द शिरीष कणेकरांच्या ’बिली वाईल्डर’ बद्दल लिहिलेल्या ’एकमेवाद्वितीय’ ह्या लेखामुळे ह्या चित्रपटाचे नाव कळाले. दिग्दर्शकाचे नाव कळाले.

चित्रपट परिक्शण - किस किस को प्यार करु

लेखक समीर_happy go lucky यांनी सोमवार, 28/09/2015 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
लोकप्रिय विनोदी मालिकाकार कपिल शर्मा हे अभिनेते बनले असून “किस किस को प्यार करू” या अब्बास-मस्तान यांच्या विनोदपटातून त्यांचे रुपेरी पडद्यावर आगमन झालेले आहे. अब्बास-मस्तान ही जोडगोळी म्हणजे सामान्य प्रेक्षकांना आठवेल बाजीगर,खिलाडी,अजनबी अन रेस. पण किस किस को प्यार करू मध्ये नाट्यमय कथा नाही, action नाही, संगीत नाही.

आपण नेमके कोण आहोत?

लेखक राजू यांनी सोमवार, 28/09/2015 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
असेच काही क्षण जगणे शिकवणारे.... नेहमी प्रमाणे भेटल्यावर नमस्कार करुन " अण्णा ५० रुपये दे रे " असे हक्काने चौधरी बोलला म्हणजे आज चौधरी एकदम जोरात आहे १० - १२ दिवस एकदम शांत असणारा चौधरी सकाळ पासूनच देशी लावून आहे हे लगेच समजून आले. चौधरी म्हणजे पिंपरी - चिंचवड मध्ये घंटागाडी कामगार हा गेले २० वर्ष कंत्राटी कामगार म्हणून काम करणारा असा इतर कामगारातला एक कामगार. कधीही ड्रेनेज, गटर तुंबले कि याला सांगायचे येऊन ते काम एक रुपया न मागता करुन जाणार.

अकबर बिरबल (मोत्यांची शेती)

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 28/09/2015 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचा भाग: अकबर बिरबल (मेहुण्याची शिफारस) -------------------------------------------------------------------------------------------------------------------------- अकबर बिरबल (मोत्यांची शेती) -------------------------------------------------------------------------------------------------------------------------- [दृश्य: अकबराच्या लाडक्या बेगमच्या महालातील सुंदर शयनकक्ष.

निरोप दे आता

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 28/09/2015 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
या आधी मी मला आवडलेल्या काही इंग्लिश कवितांच्या/ गीतांच्या मराठी रुपांतराचे प्रयत्न केले होते.

पूर्वेच्या समुद्रात ६

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 28/09/2015 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
महाबली पूरम ला जातानाचा पूर्व किनारा रस्ता (EAST COAST ROAD) यावर तेथल्या राजकारणी आणी चित्रपट अभिनेते यांचे प्रासादतुल्य बंगले त्याच्या बाजूच्या मोठ्या मोठ्या बागा त्यातील हिरवळी हे पाहून आपण भारतात आहो

श्रीगणेश लेखमाला : एक सिंहावलोकनात्मक चिंतन

लेखक सुधांशुनूलकर यांनी सोमवार, 28/09/2015 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
सार्वजनिक श्रीगणेशोत्सव म्हणजे गेल्या शतकभरापासून चालत आलेली महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपराच. या उत्सवाच्या तीन-चार महिने आधीपासूनच सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उत्सवाच्या तयारीला सुरुवात करतात. मिपाच्या संपादक आणि साहित्य संपादक मंडळाचंही तसंच काहीसं झालं. १२ जून २०१५ ला आदूबाळनी मंडळापुढे श्रीगणेशोत्सवानिमित्त एका करियर विषयक लेखमालेचा प्रस्ताव मांडला. तिचं आयोजन, लेखक, याविषयी बरीच चर्चा झाली. सं.मं.च्या आणि सा.सं.मं.च्या सर्वच सदस्यांनी चर्चेत भाग घेऊन आपली मतं मांडली, मोलाच्या सूचना केल्या आणि ही लेखमाला करायची असं ठरलं.