Skip to main content

आठचा थाट

लेखक मांत्रिक यांनी शनिवार, 17/10/2015 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
आठचा थाट ( चारचा चहा, सहाचा वडा आणि बाराचा बार झाल्यावर त्यात आमचीही एक भर. सदर कथा पूर्णतः काल्पनिक असल्याने लई लोड घेऊ नये.) पाच वाजून गेले होते. सगळा स्टाफ चुळबुळत घड्याळाकडे पहात होता. तो देखील आता अस्वस्थ झालेला होता. त्याला जास्तच राग आलेला. कारण सकाळपासून काही तरी अगम्य पनवती त्याच्या मागे लागलेली होती. सकाळी येताना गाडी घराबाहेरच पंक्चर झाली. ऑफिसचा प्रवास लोकलमधली घामट गर्दी सहन करत करावा लागला. ऑफिसात गेल्यावर बॉसने उशिरा आल्याबद्दल झाडणी केली. वर पुन्हा दिवसभर सगळी तुंबलेली कामं अगदी आग लागल्यासारखी भराभरा डोकं वर काढू लागली.

मळली तर वाळवा

लेखक पगला गजोधर यांनी शनिवार, 17/10/2015 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा : सांगायलाच पाहिजे का ? ) रस्त्यांवरच्या डबक्यांपासून जरा जपून फिर भिजेल विजार खाशी तुझी, ढळता लक्ष्य जर जबरदस्तीने उडतात काय, शिंतोडे कधी सांग तूच आपल्या पाटलुनीला, नीट पोटरीवरी धर यंदा रस्त्यात हाकू नकोस, बीआरटी लेनमध्ये ने कामी येई अश्यावेळी, मधला डांबरी थर सुटच फुल्टू वेगाने तू, बाकी बघू मग कोण सापडे मामाला आणि, कोण निसटे भुर्र किती मळणार रे तूझी, ओली विजार आज मळली तर वाळवणे, हेच तुझे कार्यालयीन काज
काव्यरस

मी असा त्या बासरीचा सूर होतो

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 17/10/2015 06:36 या दिवशी प्रकाशित केले.
व्हाॅट्सप वर ही कविता पावली, सुरेश भटांची म्हणे. सुरेश भट मी असा त्या बासरीचा सूर होतो! नेहमी ओठांपुनी मी दूर होतो! प्रीतही आली फुलांच्या पावलांनी हाय, मी चिंध्यांत माझ्या चूर होतो! राहिल्या आजन्म चिंतामुक्त चिंता... मी घरोब्याचे जुने काहूर होतो! तू किती केलास भेटीचा अचंबा.. भूतकाळाचा जणू मी धूर होतो! मी न साधी चौकशी केली घनांची ऐन वैशाखातला मी पूर होतो! कोणत्या स्वप्नास आता दोष देऊ? जीवनाला मीच नामंजूर होतो! तेवते आहेस तू पूजेत कोठे? एकदा मीही तुझा कापूर होतो! मला असे वाटले हे कवी जन "Lateral Thinking" करतात. म्हणजे आपण नेहमी विचार करतो तसे क्रमश: न करता, आधी कवितेची चवथी ओळ लिहीतात म

ग़म इक चिठ्ठी जिसमें ख़ुशियों का सन्देश

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 17/10/2015 06:04 या दिवशी प्रकाशित केले.
79 साल मध्ये एक हिंदी फिल्म आली होती, सरगम. काहींना ते आठवत असेल, हिट पिक्चर होतं, गाणीही खुप गाजली. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत होतं. गीतकार होते आनंद बक्षी. 'परबत के इस पार' या गाण्यात ते लिहून गेले, ग़म इक चिठ्ठी जिसमें ख़ुशियों का सन्देश गीत तभी मन से उठता है जब लगती है ठेंस ह्या ओळी आनंद बक्षी साहेबांनी का लिहील्या असतील ? हा प्रश्न मला अनेक वर्षे पडला आहे. बरं,स्टोरीलाईनची गरज म्हणून लिहीलंअसेल म्हणावं तर बक्षी हे सिध्दहस्त कवी होते.

विधान परिषदेचे गणित भाग २

लेखक अनिकेत एस जोशी यांनी शुक्रवार, 16/10/2015 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या विरोधी बाकांवरची हवा खात असल्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुका एकत्र लढववाव्यात असा निर्णय तातडीने घेऊन टाकला. नुकतीच विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखेंच्या शासकीय निवासस्थानी अशोक चव्हाण विखे, माणिकराव ठाकरे हे काँग्रेसचे नेते व राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, अजितदादा पवार व जयंत पाटील असे एकत्र बसले व त्यांनी आघाडीची घोषणा करून टाकली. मुंबई मनपामध्ये मागच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष निरनिराळे लढले होते आणि शिवसेनेची सत्ता तिथे आली होती. दीडच वर्षात पुन्हा मुंबई मनपाच्या निवडणुका येत आहेत.

विधान परिषदेचे गणित: भाग १

लेखक अनिकेत एस जोशी यांनी शुक्रवार, 16/10/2015 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
परवा गांधी भवन या काँग्रेस मुख्यालयात नारायण राणेंची जी पत्रकार परिषद झाली, त्यात अन्य प्रश्नांबरोबरच "तुम्ही परिषदेची निवडणूक मुंबईतून लढवणार का?" हा एक प्रश्न आलाच. अर्थातच राणे हे मुरलेले राजकारणी असल्याने त्यांनी त्या प्रश्नाला सहज बगल दिली. शेजारी बसलेल्या प्रवक्ता सचिन सावंतांकडे इशारा करत "यांची शिफारस करू" असे राणे म्हणाले. पण माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सातत्याने विधीमंडळात पुन्हा प्रवेश करण्याची धडपड करतच आहेत हे सर्वांनाच माहीत आहे.

एक होती म्हातारी

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 16/10/2015 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
रांजणातलं गार पाणी पिऊन आबाला जरा तरतरी आली. अर्धा तांब्या पिऊन झाल्यावर राहिलेल्या पाण्यानं त्यानं तोंड धुतलं. पंच्यानं तोंड पुसत त्यानं अजुन एक तांब्या भरायला घेतला. "उनाचं लय पाणी पीव नकु रं, डोस्क धरतं अशानं" म्हातारी तुळशीपाशी बसुन शेंगा निवडत म्हणाली. आबानं एक ना दोन करत आख्खा तांब्या घटाघटा पिऊन टाकला.

एक होतं गाव .....

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 16/10/2015 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
गावाचं नाव विचारू नका. पण गाव अर्थातच कोकणातलं. तिथल्या प्रत्येक गावाची कुठची ना कुठची गोष्ट असतेच. तीही साधीसुधी नाही तर भुताखेताची. ही कथा सुद्धा त्यापैकीच. आता तुमचा विश्वास नसेल तर नका बापडे ठेऊ . काही सक्ती नाही . पण गोष्ट वाचायला काय जातं ? इथे पूर्वापार चालत आलेली जमीनदारीची परंपरा होती आणि त्या सोबतीनं नांदणारी गरिबी. एक प्रकारची पिळवणूकच होती ती. कदाचित काही जण सन्माननीय अपवाद असतीलही. पण ते खरोखर अपवादापुरते. जवळपासच्या पंधरा वीस गावांची देखभाल(?) करण्याची जबाबदारी यांच्याकडे असे. त्यांचा मोठ्ठा वाडा असे.