Skip to main content

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ३)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 30/10/2016 06:28 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्याच्या लहानपणातल्या प्रेमासंबंधाच्या सतावणार्‍या त्या आठवणी सुम्या,तिची मुलगी आणि नवरा घाईगर्दीने कोकणात गेली होती कारण,सुम्याची आई बरीच आजारी होती.एक महिना तीं कोकणात राहिली.आईला मुंबईला आणून चांगल्या डॉक्टरला दाखवायचं असा त्यांचा विचार होता.पण हा विचार ऐकून आई खूप नाउमेद झाली.आणि दोन दिवसातच तिचा अंत झाला. सुम्याला आता बेत बदलावा लागला.म्हातार्‍या वडीलाना आपल्याबरोबर मुंबईला घेऊन जाण्याचा विचार त्यांनी केला.आणि त्याप्रमाणे कोकणातलं घर बंद करून वडीलांना घेऊन मुंचईला आले.

मिर्च मसाला

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 30/10/2016 02:42 या दिवशी प्रकाशित केले.
चल बे गां# दो भेल बना.. रात्रीच्या शांततेत झालेल्या शिवीगाळाने मी जरा दचकलो. अचानक विचारांची तंद्री तुटल्याने नाही म्हटले तरी जरा चरकलो. हात धोता है क्या भो#&के, कही खुजलीवाले तो नही है .. माझे लक्ष जाई पर्यंत तिथून आणखी एक शिवी आली होती.. दोन बेवडे एका भेल विकणारया बारा चौदा वर्षाच्या मुलावर 'चढत' होते. काहीतरी मोठा जोक झाल्यासारखे खिदळत होते. टपली मारल्यासारखे त्याला हूल देत होते. रात्री दहा साडेदहाची वेळ! ईतर मुंबईला एव्हाना जाग असते. पण चुनाभट्टी स्टेशनचा शांत झालेला परीसर. वरवर निपचित वाटणारया गर्दुल्यांचा वावर. भुंकणारया कुत्र्यांचा सुळसुळाट.

जीवनातील चंद्रकोर

लेखक सोहम कामत यांनी रविवार, 30/10/2016 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाच्या जीवनात असते, एक चंद्राची कोर, हृदयाच्या कोपर्यात दडते ती, जणु निरागस पोर । कधी नटखट कधी चंचल, कधी लाजाळूचे पान, तिच्या गालाच्या खळीपुढे, हरपते मनाचे भान । हृदय चोरून नेते ती, जाणते मनाचे बोल, ती आहे माझ्यासाठी, चांदणे अनमोल । भारावून टाकते मनास, तिची नखरेल अदा, तिच्या मनमोहक रूपापुढे झाला, माझा जीव फिदा । स्वप्नातील ती परी आता, बनली आहे मनाची आस, सतत तिचेच विचार असतात, सतत तिचाच लागे ध्यास । विचारांच्या या सानुल्या विश्वात ती, जाते मोरपीस फिरवून, तिच्या त्या कटारी नैनडोहात, माझे डोळे जातात हरवून । तिचा मंजुळ आवाज माझ्या, हृदयाला जाऊन छेडतो, तिचा लाजाळू चेहरा मला,

तू ........

लेखक विनायकपाटील८९ यांनी शनिवार, 29/10/2016 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
अवखळ अवखळ या भावना...। तुझ्याविना जिव माझा आहे रिकामा ।। तू साद दे मी ऐकतो... बघता तुला मी हरवितो... ही स्पंदने.....तुझीच आता.....।। अवखळ अवखळ या भावना...। तुझ्याविना जिव माझा आहे रिकामा ।। शोधत होतो तुला, चारही दिशा जरी । कळले ना कधी, होते जवळी तरी ।। शब्द जेव्हा तुझे, येती कानावरी । प्रेमळ दवबिंदू जणू, बनती पानावरी ।। श्रावण सरीनीं मला भिजु दे आता । भेटल्याचा तू आनंद कळू दे जगा ।। परी समान स्पर्श तुझा जाहला मना । परीस स्पर्श ऐकून होतो मिळाला पुरावा ।। अवखळ अवखळ या भावना...। तुझ्याविना जिव माझा आहे रिकामा ।।
काव्यरस

सहज सुचलं म्हणून

लेखक वटवट यांनी शनिवार, 29/10/2016 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
सहज सुचलं म्हणून सुचून जाते एखादी ओळ... अपेक्षित असते साधीच ठिणगी, उठतो युगांचा लोळ... मग भांबावून जातो आपणच अन् होतं कसंनुसं... प्रश्न पडतो आपल्यालाच.. हे असलं सुचलं कसं?? पण एकदा सुचल्यावर हात नाही झटकता येत.. मुळात कविता आपला हात सहजासहजी नाही कोणाच्या हातात देत.. मग ह्या असल्या सुचण्याची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागते.. आणि ही बया त्यावर फार विचित्र गोष्टींचं दानही मागते.. कधी चंद्र, कधी रात्र... आणि अश्रू तर ठरलेलेच.. साधं सरळ काहीच नाही...

शुभ दीपावली

लेखक रातराणी यांनी शनिवार, 29/10/2016 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
p4 सहस्रधारा प्रकाशाच्या लेवुन अवतरली दीपावली प्रसन्नतेने सजते मनोमनी आज आनंदाची रंगावली दरवळला मृदुल सुगंध उटण्याचा भारावुनी दशदिशा अभ्यंगस्नात लज्जित तारका नभी शोभते नवउन्मेषा सौंदर्याची करीत उधळण उजळली ही धरा देखणी अवघा आसमंतही गातसे चैतन्याची सुमधुर गाणी अंधकाराचे करीत निर्दालन भूतली प्रकटे तेजोवलय सकल जनांत नांदो शांती आशिष हाच मागते हृदय

बंगळी

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शनिवार, 29/10/2016 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
सपरीवर झुलत रायते एकटी बंगळी बही झुल्वत जात होते तिले हात थे थांबले कई? माह्या बी घराले कुलूप लागला गाव सामसूम चिमन्या बी मयालीत आता बसून रायल्या नही जीवच काडते गा असे सोंग झाले सनाइचे डीजे वाजते, कापते भीत थरथर तई तई दोस्तीची जुनी येल सुकते असी लागते नजर का होते? जडीसीन कोनी कसा टाकते मही?

गेली जिन्दगी

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शनिवार, 29/10/2016 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
p2 झामलझामल करण्यात गेली जिन्दगी तर्रीपोहा खाण्यात गेली जिन्दगी फिटयाली केली त्या फुटाळ्यावर कधी बाकी बर्डी फिरण्यात गेली जिन्दगी नाईटा मारत पास झालो तर सही क्यूबिकलच्या सपन्यात गेली जिन्दगी दिपवाळी आली वेगळ्या चिंतेसकट अन् तिकटा बुक करण्यात गेली जिन्दगी कोठे फासे लावून बसला पारधी? एकच हरणी मिळण्यात गेली जिन्दगी - संकेत ------------------------- शब्दार्थ: झामलझामल करणे:- टिवल्याबावल्या करणे फिटयाली:- उनाडक्या

केसरिया बालमा

लेखक चुकलामाकला यांनी शनिवार, 29/10/2016 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
केसरिया बालमा p3 हळूच खुणवे  लिहिता लिहिता कोपर्‍यातला  हिरवा ठिपका  दोन दिशांना दोघे आपण नव्हती ओळख  नव्हते नाते ऑर्कुटवरुनी संवादाचे  इथेच रुजले हिरवे पाते  व्हर्च्युअल जरी भांडण अपुले किती अबोले  लटके रुसवे पण केसरिया तो  हिरवा होता  अंतर सारे  क्षणात मिटवे   रंग बदलला जगण्याचा मग, फूलपाखरू झालो आपण, नवीन क्षितिजे नवीन नाती नवरंगातच न्हालो आपण ..... ..... ..... अजूनही

(ओम नमः) शिवाय

लेखक तिमा यांनी शनिवार, 29/10/2016 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
हिन्दी चित्रपट बघायच्या बाबतीत मी फार चोखंदळ आहे. सहसा परीक्षण वाचल्याशिवाय पहात नाही. तरीही कित्येकदा अपेक्षाभंग होतोच. तर नेहमीच्या पद्धतीला फाटा देऊन एकतरी अ‍ॅक्शन चित्रपट, परीक्षण न वाचता, कुठलाही पूर्वग्रह न ठेवता पहायचा असे ठरवले होते. त्यामुळे 'शिवाय' ची जाहिरात बघितली आणि सरळ तिकीटेच बुक केली. नरकचतुर्दशीच्या सुमुहूर्तावर थेटरात स्थानापन्न झालो. रिकाम्या खुर्च्या मनांत धडकी भरवत होत्या. पण एकदा चित्रपट सुरु झाला आणि आम्हाला, दर क्षणाला, साक्षात त्या भगवान शंकराचे दर्शन होऊ लागले. अजय देवगण हा साक्षात 'शिवाय' म्हणजे शंकराच्या रुपात हिमालयाच्या उंच शिखरांमधे लीलया बागडत होता.